आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

जीवनाच्या रगाड्यातून

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी.

            काय मिळते त्याना शरीराला एवढे कष्ट देवून ?. आणि कित्येक भक्तगण असे आहेत की जे त्या पंढरपूरची वारी दर वर्षी न चुकता करतात. हे केवळ मानसिक समाघान आहे कां ? कां ह्याला अंधश्रद्धा म्हणतां येईल ? विठोबा कोण ?, परमेश्वर कोण ? भक्ती म्हणजे काय ?, कशाने काय प्राप्त होते ?, असे एक नाही असंख्य प्रश्न आज तागायत अनुत्तरीत राहीलेले आहेत. ज्याला जसे ज्ञान प्राप्त झाले, जसे वातावरण मिळाले, त्या परिस्थितीप्रमाणे तो प्रश्नांची उकल करीत गेला. अनेक विचार, परंतु एक वाक्यता केंव्हांच झाली नाही. विज्ञानाच्या शोध बुद्धिने इंद्रियांना जे कळले, काहींनी त्याला महत्व दिले. कल्पनेच्या विचारांच्या झेपेमुळे सत्य काय असू शकेल. त्या अज्ञात शक्तींच्या अस्तित्वाला कांहीनी महत्व दिले. गम्मत म्हणजे ज्याचा शोध घेणे, ह्यात प्रगती करण्यापेक्षा, तथाकथीत विचरवंतच आपसांत संघर्ष करताना दिसतात.

                  माझ्या समोर आज तरी एक प्रश्न आला. जो मी वर व्यक्त केला. कां इतक्या प्रचंड संखेने लोक पंढरपूरला यात्रेसाठी जमा होतात ? पंढरपूरलाच नव्हे तर कोणत्याही घार्मिक स्थळ यात्रेला, कुंभमेळाला लोक भक्तीभावाने जमतात. पन्नास, शंभर लोक संख्या असेल तर कदाचित अंधश्रद्धा हे नाव देवून स्वतःचे भावनिक सांतवन केलेही असते. परंतु जेंव्हा संख्या लाखोच्या घरांत जाते, तेंव्हा आश्चर्य व कौतूक पण वाटू लागते. कित्येक उच्च शिक्षित, वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणारे, विद्वान मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसतात. कांही तरी या मध्ये सत्य असेल, प्रेरणा असेल, जी इतक्या समुदायाला खेचून घेते.

                 पुंडलीक आणि विठ्ठोबाची जी घटना घडली, त्याचा मी गांभिर्याने विचार करु लागलो. निसर्गाचा सहभाग आणि मानवी योजना ह्यांत काय असतील ह्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. सारे कांही घडत असते ते निसर्गाच्या नियमाना धरुनच.

निसर्गाच्या तीन गुणधर्म वा नियममांचा मी विचार केला.

१ निसर्ग सदा सर्वकाळ निश्चीत व सत्य स्वरुपांत असतो. ( Nature is always regular and definite )

२ निसर्गाचा मार्ग नेहमी चक्रमय ठरलेला असतो. म्हणूनच आपण जीवनाला जीवन चक्र म्हणतो. चक्र याचा अर्थ नैसर्गिक अविष्कार वा घटना घडतात, व त्याची पुनरावृत्ती होत राहते. जे घडले ते पुन्हा घडणे ही किमया ह्या निसर्ग चक्रामुळेच साधली जाते. ( Nature repeats itself )

3   अत्यंत महत्वाचा गुणधर्म निसर्गांत दिसून येतो, तो म्हणजे नैसर्गिक चमत्कार .

Miracle by Nature

     काय अर्थ याचा  ?  केव्हां केव्हां निसर्ग- चाकोरीमध्ये अशी एखादी घटना घडते की त्याचा शोध बोध कदाचित् त्या झालेल्या क्षणी होत नसतो. सामान्यजन त्या घटनेला आश्चर्य समजतात. चमत्कार समजतात. दिव्यता भव्यता समजतात. परमेश्वराची अमर्याद शक्तीच हे करु शकते हे ठरवितात. थोडक्यांत चमत्कार आणि नमस्कार हे समिकरण जन्माला येवूं लागते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निश्चीतता येवू लागते. इत्यादी इत्यादी. परंतु एक मात्र सत्य दिसून येते, ते म्हणजे निसर्ग एखाद्या घटनेमधून चमत्काराचे दर्शन घडवित असतो.

                                 पौरानीक कथांचे ग्रंथ वाचताना भक्त पुंडलीकाची कथा वाचीत होतो. पुंडलीक एक महान व्यक्तीमत्व. एका प्रेरणेने भारुन गेलेले. आपल्या जन्मदात्या आई-वडीलाना आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणारा. त्यांची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव समजणारा. ईश्वरी अस्तीत्वाला देखील त्याने माता पित्याच्या समोर दुय्यम स्थान दिले होते.  कित्येक वर्षे त्याची माता पिता सेवा चालू होती. जीवनातील सर्वस्व त्यागुन फक्त आईवडील सेवा हे वृत त्याने धारण केले होते. त्याचे हे श्रम व प्रेम एवढे महान होऊ तागले की ते ईश्वरी दरबारांत मान्यता प्राप्त होऊ लागले.

ईश्वर नेहमी चांगल्या गुणांची सदैव दखल घेत असतो. हा अध्यात्मिक इतिहास आहे. सती सावित्रीची पतीभक्ती व सेवा ह्यानी देखील ईश्वराला झुकावेंच लागले. पुंडलीकाने केवळ माता-पिता सेवा-भक्ती केली.  हेच त्यांचे सामर्थ्य परमेश्वराच्या प्रसन्नतेत झाले.

                    पुंडलीकाची माता पिता सेवाभक्ती यानी प्रेरीत होऊन, परमेश्वराने त्याला श्री विठ्ठलाच्या रुपांत दर्शन देऊन धन्य केले. पुंडलीकाचे ह्रदय मन भरुन आले. त्याने सविनय नमस्कार केला.परंतु हाच त्याच्या भक्तीच्या कसोटीचा क्षण होता. ज्या क्षणी पांडूरंगाने पुंडलीकास दर्शन दिले, त्यावेळी पंढरपूर नजीक चंद्रभागेच्यातीरी, त्याचे आईवडील त्याच्या मांडीचा आसरा घेत झोपले होते. समोर उभा प्रत्यक्ष परमेश्वर श्री विठ्ठल आणि मांडीवर निद्रेत आईवडील. तो त्यांची झोप मोडू शकत नव्हता. शेवटी पुंडलीकाने विठ्ठलाला नमस्कार करीत, जवळ असलेली एक विट त्याच्या पुढ्यांत टाकली. त्याला त्यावर उभे राह्यण्याची विनंती केली. आईवडीलांची झोप चाळवली गेली. ते जागे झाले. त्याना ईश्वरी दर्शन होणे शक्यच नव्हते. कारण त्यांच्यात ते दिव्य सामर्थ्य नव्हते. त्यानी जाग येताच स्नानाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुंडलीकाने त्यांना मान देवून, तो त्यांना चंद्रभागेतीरी घेऊन गेला. जाताना त्या परमात्म्याला श्री विठ्ठलाला विनंती केली की त्याने त्याच विटेवर उभे राहून पुंडलीक येण्याची वाट बघावी. तो आईवडीलांना स्नान घालून परत येईल.                   आजतागायत आठ्ठाविस युगे झालेली आहेत. श्री विठ्ठल आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून, त्याच महान आईबाप सेवक भक्ताची,  पुंडलीकाची वाट बघत आहे. त्याच्या वाटेवर लागलेले विठ्ठलाचे डोळे आजही आम्ही बघून, ईश्वर दर्शनाचा आनंद लुटतो. लाखो लाखोच्या संखेने तेथे जमा होतो.

              निसर्गाचे वर वर्णन केलेले तीन नियम  आणि पुंडलीक-विठ्ठलाची  पौरानिक कथा याची कांही सांगड असेल कां ?  हा विचार डोकाऊ लागला. एक चमत्कार झाला. एक आश्चर्य सर्वानी बघीतले, जाणले, अनुभवले. ईश्वर स्वरुप तर बघण्याची भव्यता कुणातच असण्याची शक्यता नव्हती. ती फक्त पुंडलीकातच होती. तोच ते भव्य दिव्य बघू शकत होता. परंतु त्या वेळच्या, त्या सभोवतालच्या अनेकांना फक्त त्या ईश्वरी चमत्कारांची चाहूल लागली असेल. एक प्रकाश, एक शितल आल्हादकारक वातावरण, बेहोष करणारा दरवळणारा सुगंध, एक उत्साहाची चैतन्याची लाट, समाधान शांतता यांच्या लहरी, हे सर्व त्या ईश्वर आगमन प्रसंगी एक झलक, नितांत आनंद म्हणून झाले असेल. ज्याचे शब्दानी कुणालाही वर्णन करता येणार नाही. अशी वातावरण निर्मिती त्या क्षणी निर्माण झाली असावी. हा अनुभव कल्पनातीत व अप्रतीम असावा. पुंडलीकाने तो बघीतला, भोगला. इतरांनी कदाचित् त्यांचा संवाद, संपर्क, हाच एखादा नैसर्गिक चमत्कार वाटला असावा. जो की तो अनुभव इतर जन केंव्हाच विसरु शकणार नव्हते. क्षण शांत झाला, परंतु तो अनुभव कुणाच्याने सोडविना.

                        कालचक्राप्रमाणे वर्ष सरता, पुन्हा लोक त्याच ठिकाणी, त्याच वेळी जमा झाले. चाचपडत राहीले. शोध घेत राहीले. कारण जर तो आनंद चेतनामय चमत्कारी, विलक्षण अनुभवी क्षण नैसर्गिक असेल, तर निसर्ग चक्रानुसार तो पुन्हा बरसेल. पुन्हा मिळेल. ह्या आशेत. त्याच जागी त्याच वेळी जो पुंडलीकावर बरसला.  तसा कदाचित् पुन्हा बरसेल. प्रत्येकजण त्या नितांत आनंदाचा  Ecstasy of Joy  चा एक साक्षिदार, भागीदार, होऊ इच्छितो. त्याच्या दयेचा एखादा शिंतोडा कदाचित् आपल्याही अंगावर पडेल ह्या अपेक्षेने. त्याच भावनेने लाखोंच्या संखेने जमतात. त्याच स्थळी म्हणजे पंढरपूरला  त्याच वेळी म्हणजे आषाढी एकादशीला, ज्या काळी पुंडलिकाला विठ्ठोबानी दर्शन दिले असेल. सर्व भक्त शोध बोध घेत असतात.

               निसर्गाच्या  नियमित, चक्रमय, आणि पुनुरावृत्ती ह्या गुणधर्मच्या शोधांत. आम्ही सर्वजण तेथे जमतो. तो निश्चीत बरसेल आणि तो बरसतो देखील. जो तो आपले नशिब आजमावतो. कुणावर तो बरसला असेल हे समजण्यास आजतरी मार्ग वा साधन नाहीत. हेच त्या स्थळाचे ( पंढरपूर ) व वेळेचे ( आषाढी एकादशी ) महात्म्य असेल कां  ? अशाच अनेक धार्मिक यात्रांच्या, कुंभमेळाच्या मागे दडलेली कारणमिमांसा व नैसर्गिक चक्ररचना कारणीभूत असू शकेल कां ?    

डॉ. भगवान नागापूरकर 

९००४०७९८५० 

bknagapurkar@gmail.com

एक आदर्श शिक्षिका

जीवनाच्या रगाड्यातून

एक आदर्श शिक्षिका

डॉ.देशमुख हे आम्हास Physiology  हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध दोन वेगवेगळ्या विषयावर दोन विश्वविद्यालयांत सादर करुन,  वेगवेगळ्या डॉक्टरेट पदव्या मिळविल्या होत्या.  विषयाचे जरी अथांग ज्ञान मिळाले असले तरी शिक्षकीपेशामध्ये ते अयशस्वी झालेले जाणवले. वर्गांत शिकवण्यासाठी येण्यापूर्वी नोकर १०-१२ पुस्तके टेबलावर ठेऊन जात असे. पुस्तकांत Book-Mark ”  ठेवलेले असे. प्राध्यापकांची शिकवण्याची पद्धत आगदीच वेगळी होती. एखादा विषय, त्याची व्याख्या, प्रस्तावना, संदर्भ, चर्चात्मक टिकाटिपनी, सारे ते निरनिराळी पुस्तके काढून बुकमार्कने पान उघडून चक्क वाचून दाखवित. सोप्या, वेगळ्या भाषेत त्यावरचे भाष्य ते केंव्हाच करीत नव्हते. कुण्या विद्यार्थ्याने एखादी शंका विचारली तर त्याचे उत्तर कोणत्या पुस्तकांत कोणत्या Chapter मध्ये आहे, हे ते सांगत.  विद्यार्थाना ते अत्यंत रुक्ष वाटत होते. त्या प्रचंड ज्ञानी प्राध्यापकाकडून तसूभर ज्ञान मुलाना मिळाल्याचे समाधान दिसून आले नाही.                    

डॉ. मँडम नाडकर्नी मेडीकल कॉलेजमध्ये बालरोग ( Pediatric ) ह्या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून नुकत्याच रुजू झाल्या होत्या. तरुण, तडफदार व्यक्तीमत्व होते. त्या केवळ एका महीन्यांच्या काळांतच विद्यार्थ्यांच्या चहात्या झाल्या. त्यांचे भाषा प्रभूत्व होते. अतिशय सरळ सोप्या आणि साध्या शब्दांत विषय फुलविण्याची विलक्षण कला साध्य असलेली. प्रत्येक विषयाची सुरवात एकदम प्राथमिक स्थरावर जाऊन करीत. विषयच्या मुळापासून समजावण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. कोणताही मुद्दा जोपर्यंत वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या लक्षांत येणार नाही, तो पर्यंत सर्व अंगाने त्या तो फुलवित होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी, त्यांची समज, त्यांच्या अंगगुणांची झेप, व तो विषय ग्रहन करतो कां ?  ह्यात त्या बारकाइने लक्ष देत होत्या. चित्र, फोटो, ग्राफ, आलेख, प्रोजक्षन, एखाद्या बालरुग्णाला वर्गात आणून प्रात्यक्षिके दाखवित असे. विषय आगदी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आकलन झाला किंवा नाही हे तगमगीने जाणण्याचा त्या प्रयत्न करीत असत.

प्रत्येक विद्यार्थाचा नावानिशी परिचय करुन घेत होत्या.

त्या इतर वेळीही  Extra Classes  घेत होत्या. केंव्हाही क्लासेस, केंव्हाही  Laboratory, Wards, Out Patient Department, ह्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्याना बालरोगाविषयी मार्गदर्शन करीत असत. विद्यार्थी देखील त्यांच्याबद्दल सतर्क होते. मिळणारय़ा प्रत्येक क्षणाचा ते उपयाग करुन घेत. ज्या ज्या वेळी जमेल, कॉलेजमधला प्रत्येक विद्यार्थी डॉ. नाडकर्णीचे कोठे लेक्चर आहे याची नोंद ठेवत होता. सर्व विद्यार्थी अटेंड करण्याचा प्रयत्न करीत असे.

विद्यार्थ्यावरचे, शिकवण्यावरचे प्रेम, आपलेपणा, तगमग, ध्यास हे त्यांचे गुणधर्म दिसले. कोठेही राग नाही. तिटकारा नाही. कंटाळा नाही. शिक्षकी व्यवसायातील एक आदर्श व सन्मानित व्यक्तीमत्व.

प्रत्येक शिक्षक  ज्या स्थरावर शिकवण्याचे कार्य करतो, हे त्याचे ज्ञानदान असते. त्या वेळच्या त्या स्थराच्या विद्यार्थ्यासाठी तो ज्ञानानी परिपूर्ण असतो.  विद्यार्थ्याला शिक्षक किती ज्ञानी आहे, ह्याच्याशी कांही घेणे वा देणे नसते. देणारय़ाची क्षमता केवढी ह्यापेक्षा, तो ते ज्ञान विद्यार्थ्यांच्या समज बुद्धीत कसे घालतो, ह्यातच त्या शिक्षकांचे यश असते.

डॉ. देशमुख हे प्रचंड ज्ञानी असले, तरी मला डॉ. मँडम नाडकर्णी खरय़ा ज्ञानदात्री वाटल्या.                 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              

प्रेम- अहंकाराचे अंकुरण

जीवनाच्या रगाड्यातून

प्रेम- अहंकाराचे अंकुरण

संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेगाड्या बघताना करमणूक होत होती. तसा तो भाग निर्मनुष्य.

         अचानक माझे लक्ष वेधलं गेल ते थोड्याशा अंतरावर खेळणाऱ्या कांहीं शाळकरी मुलांवर. पांच सात मुले पळापळी, पकडा पकडी, मस्ती करीत होती. मला त्यांच्या खेळामध्ये थोडासा विचित्रपणा दिसून येत होता. रेल्वेरुळाखाली टाकलेल्या खडीचे दगड उचलून ते रेल्वेच्या हेडवायरला नेम धरुन मारीत होते. कुणाचा अचूक नेम लागतो, ह्याची त्यांची चढावोढ लागलेली दिसून येत होती. बहूतेक नेम चुकत होते. परंतु रेल्वेरुळामध्ये लहान लहान खडीचे बरेच दगड होते. ते त्या दगडांचा सर्रास वापर करुन त्या हेडवायरला लक्ष्य करीत होते. त्याच्या दिशेने दगड फेकीत होता. सारा खेळ भयानक होता. तो रेल्वेरुळ मार्गाला घातक देखिल होता.  दूर अंतराहून मी हे सारे बघत होतो. मी बेचैन झालो. त्या मुलांच्या खोडकर खेळण्यावर अंकूश ठेवण्यासाठी जवळपास कुणीही दिसून येत नव्हते. शेवटी आपणच त्या विचित्र खेळाला टोकावे, मुलांना समज द्यावी ह्या उद्देशाने मी उठलो.

            मुले थोड्याशा अंतरावर होती. मी दुरुनच ओरडलो.  “ये मुलानो, काय चालले आहे ?, रेल्वे मार्गाचे व हेडवायरचे नुकसान करु नका. जा धरी जा आता. ”    त्यांचे लक्ष माझ्याकडे जाताच त्यानी आपला खेळ बंद केला. मी त्याना हाताने जा म्हणून खुणावत होतो. अचानक त्याच्यातील एकाने पुढे येवून हातातील दगड माझ्याच दिशेने भिरकावला. मी ओरडून त्यांच्यावर रागावलो. परंतु आश्चर्य म्हणजे ती मुले निघून जाण्याऐवजी, सर्वांनीच हाती दगड घेवून ते माझ्याच दिशेने फेकूं लागले. एक अनपेक्षित व भयावह परिस्थिती निर्माण झाली. शेवटी मला माझे वय आणि शक्तिच्या मर्यादा जाणून, मीच तेथून माझा पाय काढता घेतला.

               लहान शाळकरी मुले. खेळकर वय. परंतु त्यांच्यामधली विध्वंसक वृत्ती बघुन मी चक्रावून गेलो. असे म्हणतात की प्रेम आणि अहंकार ह्या फक्त दोन स्वभावगुणधर्माचे रोपण हे जन्मापासूनच निसर्ग करीत असतो. इतर गुणधर्म त्यांच्या पासूनच उत्पन्न होत असतात. चांगला स्वभाव, चांगल्या वृत्ती, सद्सदविवेकबुद्धी अशा गुणांची वाढ ह्या प्रेमाच्या बिजामधून होत असते. त्याचप्रमाणे राग लोभ मोह इत्यादी षडरिपूं वा विद्धवंसक वृत्तिंची वाढ ही अहंकार ह्या मुळ स्वभावापासूनच होत जाते. जीवनचक्रामध्ये अत्यंत प्रभावी, परंतु गरजेचे असलेले हे दोन स्वभावगुणधर्म प्रेम व अहंकार होत. ह्या जीवन नाण्याच्या दोन बाजू असतात. खेळातल्या चितपट ह्या संकलपणेप्रमाणे जीवनाचा मार्ग ते आखत असतात. कधी अहंकाराचा तर कधी प्रेमाचा विजय होत असताना आपण बघतो. निसर्गाचे एक वैशिट्य म्हणजे तो प्रत्येकाच्या जीवनाच्या अंतीम टप्यावर, प्रेमाचाच विजय नोंदवितो. आजची ही खट्याळ वाटणारी मुलेही निश्चीतच स्वभावानी बदलतील ह्याची मला खात्री वाटते. 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

घास घास घेणे

जीवनाच्या रगाड्यातून

घास घास घेणे

लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप  त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ती खाण्यामध्यें रेंगाळतात. लहान बालकांना जेवण भरविणे ही अत्यंत आवघड कला असते. सहनशिलता फक्त आईला समजलेली दिसते. मुल उपाशी राहू नये म्हणून ती सतत त्याच्या पाठीमागे राहून ते भरविते. आईच्या मुलाना जेवण खावू घालण्याच्या अनेक युक्त्या असतात. येनकेन प्रकारे घास भरवणे व त्याच्या पोटांत तो जाईल याचा तीचा प्रयत्न असतो.

               जेऊ घालताना गोष्टी सांगणे, कड्यावर घेवून घरभर, गच्चीवर वा अंगणात फिरत त्याला भरविणे, तुला जेवणानंतर चॉकलेट वा बिस्कीट देईन ही लालूच लावणे, खेळणी देणे, किंवा  घाक दाखविणे, रागावणे, अशा अनेक प्रकारे निरनिराळ्या युक्या ती आयोजीत असते. मला येक युक्ती खुपच आवडली. आई मुलाला खिडकीबाहेर चिमणी, कावळा वा पक्षी दाखविते. ‘ तो बघ कावळा. किती उंच गेला. त्या झाडावर तो बसला ‘  मुल उत्सुकतेने व बारकाईने त्याचे निरीक्ष करते. मुलाचे लक्ष त्या पक्षाकडे लागते. हीच वेळ म्हणजे आपला मुलाचा लक्षवेध आई नेमका टीपते. ती तो क्षण साधत मुलाला घास भरवते. मुल देखील आपला हट्ट, लहरीपणा, रेंगाळू वृत्ती बाजूला ठेऊन, तोंडाचा आ करीत तोंड ऊघडते. घास भरविला जाऊन तो खाल्ला वा गिळला जातो. अर्थात ही क्रिया एक प्रकारे आपोआप होवून जाते. हालाच पुस्तकांत Distraction of Mind, method of feeding  अर्थात लक्ष विचलीत करुन घास भरवीणे म्हणतात. येथे मात्र लक्ष्य विचलीत करण्यासाठी निरनिराळे पक्षी, प्राणी, वा पदार्थ ह्यांचा कल्पकतेने उपयोग करावा लागतो.

               आजकालचे वैद्यकिय  बालविकास शास्त्र अशा पद्धतीना अयोग्य समजतात. परंतु ह्या गोष्टी कालांतरापासून चालत आलेल्या आहेत. घास भरविण्याच्या पद्धतीलाच विरोध केला गेला आहे. जेवणाचे ताट मुलाच्या समोर ठेवा. ते मुल आपल्या हाताने व मनानेच खाईल. ठराविक वेळ त्याच्या जेवण्यास द्या. मुलगा खेळतो, रेंगाळतो, जेवत नाही. खाणयाच्या पदार्थांची सांडलोंड करतो. तुम्ही तुमचे  मन घट्ट करा. व ठरविलेली वेळ होताच त्याचे ताट उचलून ठेवा. लगेच त्यास देऊ नका. कोणतेही भाष्य करु नका. ठरलेल्या वेळीच पुन्हा त्याला जेवनाचे ताट द्या. कोणतेही मुल उपाशी रहात नसते. तुमच्या अशाच वागणूकीने त्याला जेवणाची जाणीव होईल. आणि मुल सहजतेने जेवण घेईल. जेवणाला एक नैसर्गिक प्रक्रिया समजा. तुम्ही त्याला जेवढे खाऊ घालण्याचे प्रयत्न कराल, आग्रही बनाल, मुल तेवढेच रेंगाळते. हट्टीपणा करते. ह्यालाच  Attention Seeking Device म्हणतात. आपल्याकडे ह्यात मुले जींकतात व पालक हारतात.

                 मला अचानक माझ्या बालपणीची गोष्ट आठवली. एकत्र कुटूंब पद्धत होती. काका मामा यांची सर्व मुले एकत्र जेवण्यासाठी बसत होतो.  जेवताना एक खेळ खेळत असू. प्रत्येकाने आपल्या ताटांत एका बाजूला एक घास काढून ठेवायचा. जेवण करता करता इतरांकडे लक्ष ठेवायचे. कुणाचे लक्ष नाही हे बघून तो बाजूस ठेवलेला घास चटकन खाऊन टाकायचा. इतरांचे लक्ष चुकवून आपला बाजूस ठेवलेला घास खाण्यात जो सफल होईल तो जींकला. ह्यात तुम्ही जिंकण्याच्या प्रयत्यांत तुमचे जेवण चालू ठेवता. कारण तुम्ही सरळ

जेवत आहांत हे इतराना भासविणे, त्याना फसवणे, व आपला घास त्याच जेवणांच्या प्रक्रियेत खावून टाकणे ही कला ठरते. खेळ छोटासा, परंतु मनाला एक वेगळीच दिशा देत जेवण पू्र्ण केले जायचे. हा खेळ म्हणजे जेवण्यामधील Distraction Method  च नव्हे कां ?  आम्ही त्याला ‘ घास घास घेणे ‘   म्हणत असू. 

डॉ. भगवान नागापूरकर

 ९००४०७९८५०

जग आणि देह – एक साम्य

जीवनाच्या रगाड्यातून

जग आणि देह एक साम्य

शरीरावरील एक मोठे ऑपरेशन ( Major Surgery ) बघत होतो. छातीचा व पोटाचा भागावरील कातडी- मासाचे आवरण काढताच देहामधले निरनिराळे अवयव दिसू लागले. निरनिराळ्या आकाराचे, लहान मोठे, वझनानी कमी जास्त दिसत होते. देहामध्ये वेगवेगळ्या पोकळ्यामध्ये प्रत्येकाला पातळ पडद्यामध्ये गुंडाळून, एकमेकाजवळ  ठेवलेले होते. प्रत्येक अवयवामध्ये पोकळ्या , वाहीन्या दिसत होत्या. देहाबाहेरील नैसर्गिक रचनाचे ह्या सर्व आतल्या आवयाचे  विलक्ष साम्य असल्याचे जाणवले. पर्वत, नद्या, जंगले, तलाव, प्राण्यांची हलचाल हा जसा बाहेरचा देखावा दिसतो, आगदी तसाच रचनात्मक पद्धतीने शरीराच्या आंत दिसला. वेगळेपणा जो भासत होता तो केवळ बघण्याच्या दृष्टीकोणामुळे. दोन्हीमध्ये जसे सौंदर्य होते, तसेच भयानकता देखील जाणवत होती. वाहीन्यामधून वाहणारे द्रव, रक्त, सारे शरीरभर वाहत होते. अवयवांत जमा होत होते. मोठ्या बहीरगोल भिंगामधून (  Magnifying lens )  त्याचे चित्र जणू निरनिराळ्या लोक व प्राणीच्या वस्त्याप्रमाणे जंगलाप्रमाणे भासत होते. त्यांची जा- ये हालचाल ह्या जरी सुक्ष्म असल्या तरी जणू वस्त्या, गांव, सडक, नदी, तलाव, इत्यांदींची अगदी हूबे हूब प्रतीकृती त्या सर्व देहातील स्थुल व सुक्ष्म रचनेमध्ये अगदी स्पष्टपणे जाणवत होती. एका भागातले अन्न, पाणी, हवा, वा इतर जीवनघटक पदार्थ एका अवयवातून दुसरय़ा अवयवामध्ये वाहीन्याच्या जाळ्यामार्फत नेल्या जातात. जे त्यावेळी काढून टाकण्यात आले, त्यालाच तज्ञानी हानीकारक वा रोगाची वाढ म्हटले गेले. शरीरातील अवयव रचनेचा व ह्या रोग रचनेचा देहांत असांच सदैव संघर्ष होत असतो. शरीरातील टिश्यू नष्ट होणे, पुन्हा नविन निर्माण होणे, ह्या क्रिया सतत चालतात.   जगातील वातावरणात वा परिसरांत देखील अशाच लोक, प्राणी, झाडे, जंगले, पर्वत, ह्या सर्वांत सतत हालचाली निर्माण होणे वा नष्ट होणे चालत असतात. रचनेमधले वर्णन जरी भिन्न वाटले तरी ह्या जगामधले आणि देहामधले सर्व स्थुल वा सुक्ष्म घटक पदार्थ कार्यानी, कार्याच्या लक्ष्यानी एकच असल्याचे भासतात. ते म्हणजे उर्जा निर्मिती व सर्व प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग करणे हेच नव्हे काय  ?

जगाची जशी भौगोलिक रचना असते, ती पदार्थाची अथवा निर्जीव साधनांची असते. त्याच वेळी जो इतिहास बनत असतो तो सजीव प्राणीमात्रांचा. मानवी देहांत देखील अशाच प्रकारे इतिहास भूगोलाची सतत पुनरावृत्ती होत राहते. शरीरातील अवयवांची वाढ होत जाणे आणि त्याच वेळी अनेक रोगांची देहावर आक्रमणे होणे त्याच प्रकारचे ठरते. ह्यांत तोड-मोड-जोड होत राहते. नष्ट होणे वा विकास पावने सतत घडत जाते.

             शरीरामध्ये सुक्ष्म भाग हा पेशी असतो. अगणित पेशींची ग्रंथी बनते. अनेक ग्रंथींपासून अवयव बनतात. अनेक अवयव एकत्र येऊन शेवटी शरीर बनते.  

 पेशींच्याच स्थरावर उर्जा शक्ती निर्माण होते. बाहेरुन मिळणारे घटक पदार्थ हवा, पाणी अन्न ह्यांच्या  मदतीने उर्जा निर्मीती होते. देहाच्या सर्व हालचाली क्रिया ह्या शक्तीनेच पूर्ण केल्या जातात. जगामध्ये देखील प्रत्येक पदार्थात सुक्ष्म घटक अणू असून त्यात देखील उर्जा निर्मीत वा साठवलेली असते, जीला अणू उर्जा म्हणतात.  तीची शक्ती प्रचंड प्रमाणात असते.

निसर्गामधल्या दिसणारय़ा, जाणवणारय़ा आणि न दिसणारय़ा, आद्रष्य असलेल्या सर्व हालचाली व क्रिया ह्या केवळ ह्याच उर्जेमुळे होत असतात. जगाला ह्या उर्जा शक्ती मोठ्या गृहाकडून, सुर्याकडून मिळते.  ह्यामुळे मानवी देहाचे, कार्याचे, व जीवनचक्रांचे सारखेपण साधर्म ह्या जगांप्रमाणे भासते हे म्हटल्यास चुक ठरणार नाही. म्हणूनच सत्य वचन आहे की     ” जे पिंडी ते ब्रह्मांडी “

   आणि जर देहाप्रमाणे जग असेल, जगाप्रमाणे विश्व वा ब्रह्मांड असेल तर कल्पना करता येईल की सारे  ‘विश्व’   हे एक प्रचंड, अनंत, भव्य दिव्य  ‘देहधारी’   शक्तीस्वरुप आहे. ती केवळ कल्पना असली तरी त्याचे वर्णन अवलोकन ज्ञान हे मानवी विचारांच्या कितीतरी बाहेर आहे. त्यामुळे ‘ परमात्मा ‘ आहे  येवढेच आम्ही म्हणू शकतो. तो कसा  कोठे  ह्याची उकल करणे शक्यच नाही. तो केवळ  ‘उर्जामय ‘ असल्यामुळे, त्याला जाणता येते येवढेच समाधान.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

एक अफलातून व्यासंग

जीवनाच्या रदाड्यातून

  एक अफलातून व्यासंग 

 एक ज्येष्ठ नागरिक सकाळींच माझ्या घरी आले. मी त्यांचे स्वागत केले. त्यानी आपल्या पिशवीतून एक लहान कुंडी व रोपन केलेले तुळशीचे झाड मला देऊं केले. त्याबरोबर एक छापलेले भेट कार्ड देखील होते.

” मला हा छंद आहे. मी हे विकण्यासाठी तुम्हाला देत नाही. एक सदिच्छा भेट म्हणून ही स्वीकारा. मला समाधान वाटेल. माझे सर्वाना आशिर्वाद व शुभेच्छा असतील. “   त्यानी कुंडी व कार्ड ठेवले.  घायीत असल्याचे सांगुन ते निघून गेले.

मी त्या तुळशीच्या रोपाकडे बघू लागलो. ते कार्ड मी वाचले.

 ”तुळशीच्या झाडाचे घरांमधील अस्तित्व ही कौटुंबिक संस्कार क्षमता निर्माण करणारी संकल्पना आहे. तीला ईश्र्वरी- नैसर्गिक देण समजा. तीच्या वाढीमधून निर्माण होणाऱ्या अदृष्य लाटा,  ह्या सर्व घराला कुटूंबवत्सलता  आणण्यास मदत करतील. मुलांच्या बालमनावर संस्कार करतील. तरुणाना चैतन्य शक्ती प्रदान करतील. आणि ज्येष्ठाना मनाची शांतता मिळवण्यास सदैव मार्गदर्शन करतील. घराचे, कुटुंबाचे व सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील  ही तुळशीदेवी व ईश्र्वराचे चरणी प्रार्थना.”

त्यावर त्या सद् गृहस्थाचे नांव पत्ता होता.

मी भारावून गेलो. दैनंदिनीच्या धावपळीत आणि कार्यबाहुल्यांत मग्न राहून, सारे लक्ष्य व्यवहारी जीवनांत गुंतून राहीलेले जाणवले. जीवनाचे सत्य, अंतिम ध्येय हे कशासाठी करावयाचे याचा विसर पडत असल्याचे त्या क्षणाला वाटले. ह्रदय भरुन आले.

 मी त्या अनामिक परंतु महान वाटणाऱ्या  व्यक्तिशी संपर्क साधला. त्यांच्या घरी मी जे बघीतले व एकले ते सारे आश्र्चर्यचकीतच वाटले. त्यानी नुकतीच वयांची सत्तरी पूर्ण केली होती. आपल्या शारीरिक व मानसिक प्रकृतीची  ते फार काळजी घेत असत. माणसांत जेवढी क्षमता असेल ती सारी शरीर स्वास्थ जपण्यांत खर्च करावी, त्याकडे लक्ष्य द्यावे ही त्यांची संकल्पना असे. धडपडीचे जीवन जगणे हा काळ संपलेला आहे. जे जमले, जसे जमले, ते हस्तगत केले. आतां त्याच मिळालेल्या जीवन मुल्यांत रममान असावे, ही त्यांची धारणा.

             आपल्या शारीरिक आरोग्यासाठी त्यानी एक व्यासंग स्वतःला लाऊन घेतला होता. त्यांत ते तन-मनानी कार्यारत असत. ज्या घरांत ते रहात होते, ते जुन्या पद्धतीचे होते. मागील दारी अंगण होते. थोडीशी बागेसाठी मोकळी जागा होती. दररोज ते बराच वेळ तेथे व्यस्त असत. जागा साफसुफ करुन, मातीमध्ये खत घालून, बरीच आळी केलेली होती. त्यामध्ये तुळशीच्या वाळलेल्या मंजिऱ्या अर्थात बिया टाकून त्याचे व्यवस्थीत रोपण केलेले होते. लागेल तेवढे पाणी दिले जायी. योग्य ती मशागत होई. थोड्याच दिवसांत तुळशीची टवटवित रोपे आलेली दिसत. त्यानी लहान लहान प्लँस्टीकच्या कुंड्या आणलेल्या होत्या. त्यामध्ये ते तुळशींचे रोपण करीत असत. ह्या तुळशीच्या कुंड्या आणि भेटकार्ड ते केवळ सदिच्छा समजून निरनीराळ्या घरी नेवून देत. पैशांची केव्हांच अपेक्षा केली नाही. त्यांची ही सप्रेम-भेट लोकांनी मान्य करावी,  ह्यातच ते समाधान मानीत होते. अर्थात ह्या संस्कारीक व भावनिक भेटी कशा विनामुल्य राहतील. लोक देखील परत भेट ( Return Gift ) समजून भरभरुन पैसे देत असत. त्यांच्या अफलातून अशा योजनेसाठीची ती गंगाजळीच नव्हे काय ? .

    मी देखील त्यांच्या घरांतील तुळशीवृंदावनाची पुजा करीत, दक्षिणा ठेवून समाधानाने घरी आलो.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

गांवमामा

जीवनाच्या रगाड्यातून

गांवमामा

हा  एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग

गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने  गांवमामा   झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय  प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव,  मदत  करण्याची आंतरिक  इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे  मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना  आपल्या वागनुकीने  सर्व समाज अर्थात  ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानकीबाई एवढाच  परिवार. लहान कुटुंब व सुखी कुटुंब ह्या व्याख्येमध्ये सीमित.शेती हा प्रमुख व्यवसाय होता. गांवातील लहान सहान कामे करून पैसे मिळत ते मिळवीत.  मुलगा मोठा झाला. शहारांत जाऊन वेगळा व्यवसाय करू लागला. शेती करण्यात त्याला न रुची ना सवड. लग्न झाल   स्वत: चा वेगळाच संसार  शहरामध्ये थाटला. आधुनिकतेमध्ये  जाण्यात आनंद घेत असे  ज्या गोष्टी  खेड्यात त्याला मिळत नव्हत्या  त्या  सर्व शहरी जीवनात मुबलक मिळू लागल्या.   त्याला दोन मुले झाली.  गोविंद मामा व जानकीबाई  दोघेच खेड्यात रहात होते.  सर्व गावाला भूषण  असलेले व सतत आनंद देणारे गोविंदमामा गांव मंडळीना उत्तम संस्कार  देण्यात यशस्वी झाले. परंतु आपल्या स्वता:च्या मुलाला आपुलकी व सह जीवनाचा पाठ शिकऊ शकले नाही. तो अलिप्त रहाण्यात  समाधान  मानीत  होता. 

गोविंद मामांचे अकाली निधन झाले. त्यांच्या पत्नीवर जणू आकाश कोसळले. परंतु काय करणार. मुलाचा आधार  असून तिला मिळाला नाही. अच्यानक एक दिवशी  त्यांना  शासकीय पत्रक  मीळाले.  त्यांच्या खेडे गांवाजवळून  एक पाण्याची  मोठी धरण योजना  शासनाने आखली होती. गोविंद मामाची शेती त्या योजना अंतर्गत शासकीय कार्यसाठी  जमा केली जाणार असल्यची नोटीस होती. जानकीबाई साठी ते संकटच  होते. गोविंदमामानी जे प्रेम गांवात पेरले होते, त्याला चांगलीच फळे येणार होती. सर्व गांवकरी  एकत्र जमा झाले. त्यांना धरण  योजने बद्दल सहानुभूती होती. ती योजना राबवावी परंतु त्याच वेळी जानकीबाईना  त्यांच्या  शेतीची योग्य  व चांगली  किंमत दिली  जावी हा  त्यांचा  प्रयत्न. होता. सर्वजन एक झाले. प्रकरण थेट  मंत्र्यापर्यंत  मंत्रालयात गाजले. प्रचंड धावपळ व प्रयत्न झाले. जानकी बाईंच्या नावे त्या शेतीच्या मोबदल्यात २६ लाख रुपयाचा धनादेश जरी केला गेला. शेती जी कोणतेही उत्पन्न देत नव्हती, केवळ डोंगराळ  भागाजवळ  असल्यामुळे धारण योजनेत गेली. परंतु एक प्रचंड रक्कम जानकी बाईना देवून गेली. गोविंद मामाचे प्रेम आणि  गांवमामा बनण्याचे योग्य इनाम देऊन गेले. त्यांच्या पश्च्यात  जानकीबाई त्या ठेवीच्या  व्याजावर समाधानी जीवन जगत होत्या.  

डॉ. भगवान नागापूरकर 

९००४०७९८५०

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !

जीवनाच्या रगाड्यातून

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !

रविवारचा दिवस, ठरल्या प्रमाणे सर्वत्र पल्स पोलिओ देण्याचा दिवस होता. दारावर शासनाच्या आरोग्य खात्यातील दोन कर्मचारी, पोलिओ लस देण्यासाठी आले होते. त्यांनी घरांत पांच वर्षापर्यंत कुणी बालके आहेत कां ? म्हणून चौकशी केली. मी लगेच पुढे झालो व माझ्या नातीस बोलावले.  तिने नुकतेच चार वर्षे पूर्ण केले होते. तिला त्यांनी पोलिओचा डोस पाजला. त्यांनी  तिचे नांव लिहून घेतले. पुन्हा त्यांनी विचरण केली की ” घरांत आणखी कुणी लहान मुल  आहे कां? “    आम्हाला न सांगताच , मानसी, माझी नात घरात गेली व लगेच परत आली. ती त्यांना विचारू लागली ” काका  माझ्या सोनुलापण पोलिओचा डोस देणार कां? ” थोडेसे कौतुक परंतु संभ्रमित होऊन ते तिच्या प्रश्नाकडे निरखून बघू लागले. आपल्या हातातील बाहुली उंचावून  दाखवीत ती म्हणाली ” ही माझी सोनू “ 

 आणि सर्वजणच हास्याच्या लाटेत वाहून गेलो. कालचक्राचा वेग बघून  खूपच  आश्चर्य  वाटते. लहान मुलांचे बोल ऐकून  त्यांच्यातील वैचारिक समज ही अनेक वेळा चकित करून टाकते. केंव्हा केंव्हा त्यांत विनोद ही निर्माण होतात. दूर दर्शन आणि त्यावरील जाहिराती मुलांना मुखोतगत होऊ लागल्या 

आहेत. त्या सुरांत म्हणताना एक आनंद लुटीत असल्याचे अनेकदा दिसते.  नातीने जी विचारणा केली होती, त्यात सत्य होते, चौकस बुद्धी होती, त्यात सहजता होती. विनोदी  बोलण्याची इच्छा नव्हती, परंतु जे तिने विचारले, त्यात विनोद झाला होता.  

जेष्ठाच्या  ह्याच चौकशीला मार्मिकता व गम्मत म्हणून  ठरविले   गेले असते.   कसे कां होईना  ऐकनाऱ्याला ते आनंदच देणार नाही कां?

 डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५० 

सैतनामधील प्रेमओलावा !

 रस्त्याच्याकडेला एक फळविक्याची गाडी,  दर दिवशी असायची. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. एक टाटासुमो गाडी तेथे आली. त्यातून ८/१० जण उतरले. तरुण धिप्पाड थोडेसे रांगडे दिसत होते. हातात काठ्या व सुरेचाकू  दिसले. एक भयावह दृश्य वाटले. त्या परिसरांत कांही   अघटीत होणार ह्याची चाहूल लागली. अनेक जाणारी येणारी माणसे थांबली आणि मार्ग बदलून जाऊ लागली. मी देखील आंत जाऊन खिड्की बन्द करुन काचेतून वातावरनाचे निरिक्षण करु लगलो. उत्सुकता, भिती आणि   स्वसंरक्षण  ह्याची मनात घालमेल सुरु होती.  शिवाय रोजच्या विविध बातम्यानी,  गुण्डगिरिनी, आतंकवादी  वातावरणानी सर्व काही अनिश्चित होते. 

जीवनाच्या रगाड्यातून

सैतनामधील प्रेमओलावा !

 रस्त्याच्याकडेला एक फळविक्याची गाडी,  दर दिवशी असायची. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. एक टाटासुमो गाडी तेथे आली. त्यातून ८/१० जण उतरले. तरुण धिप्पाड थोडेसे रांगडे दिसत होते. हातात काठ्या व सुरेचाकू  दिसले. एक भयावह दृश्य वाटले. त्या परिसरांत कांही   अघटीत होणार ह्याची चाहूल लागली. अनेक जाणारी येणारी माणसे थांबली आणि मार्ग बदलून जाऊ लागली. मी देखील आंत जाऊन खिड्की बन्द करुन काचेतून वातावरनाचे निरिक्षण करु लगलो. उत्सुकता, भिती आणि   स्वसंरक्षण  ह्याची मनात घालमेल सुरु होती.  शिवाय रोजच्या विविध बातम्यानी,  गुण्डगिरिनी, आतंकवादी  वातावरणानी सर्व काही अनिश्चित होते. 

” पडते  घे विनाकारण विरोध करु नकोस , सत्याच्या व तत्वाच्या मागे जाण्याचा मोह टाळ. यात कदाचित बळीपण जावे लगेल. “  हा संदेश व्यक्त होत होता. स्वत:चा बचाव हेच त्या अघटीत परिस्थितीला उत्तर होते.

ते सर्व राकट आडदांड त्या फळगाडी भोवती जमले. त्यांचा आरडा ओरडा विक्षिप्त  चाळे, आक्रमक भूमिका, या वागण्याने परिस्थितीचे गांभीर्य त्या फळवीक्रेत्याने देखिल जाणले. तो चटकन बाजूस सरकला.  खाली मान घालून बसला. भीती व जीव वाचवणे, आणि होणाऱ्या नुकसानीबद्दल डोळे भरून आलेले अश्रू लपविणे, हेच तो करु बघत होता. सर्वांनी त्याची गाडी अक्षरश: लुटली. भराभर फळांच्या टोपल्या आपल्या गाडीत टाकल्या आणि सर्वजण गाडीत बसून  होर्न वाजवीत, सुसाट निघून गेले.  सामसूम झाल्याची चाहूल लागताच मी चटकन पश्यात बुद्धीची सहानुभूती व्यक्त  करण्यासाठी  त्या फळवाल्याकडे धावलो.  तो गाडीजवळ मटकन बसला होता. त्याचे लक्ष त्या सुसाट गेलेल्या गाडीकडे होते. डोळातून अश्रू वहात असलेले  दिसत होते. मी सहानुभूती व्यक्त करीत म्हणालो  ” काय ही सैतानी वृतीची माणसे. जंगली व दादागिरी करणारी. गरिबांना लुटणारी. ह्यांना तर गोळ्याच घालून ठार करावयास हवे.”  

” थांबा साहेब! प्रसंगावर  चुकीचे बोलू नका ”  तो फळविक्या बोलू लागला.   देव  माणस होती ती. प्रथम दैत्या प्रमाणे वागली खरी. परंतु त्यांच्या वृतीमध्ये देवत्व दिसून आले.” 

मला त्या क्षणी विचित्र वाटणाऱ्या त्याचा शब्दाचा बोध झाला नाही. मी चक्राऊन गेलो. त्यांनी इतका धिंगाणा घातला, लुटालूट केली तरी त्याबद्दल सहानुभूती? त्याने कांहीच उत्तर दिले नाही. फक्त जवळच्या टोपलीकडे बोट दाखवू लागला. माझी दृष्टी तिकडे वळली. त्यात शंभर रुपयांच्या नोटांची गड्डी  पडली होती. ” हे सहा हजार रुपये आहेत साहेब. ही  गड्डी माझ्या हाती देत ते वेगाने निघून गेले.

ही माझ्या रोजच्या मालाच्या व धंद्याच्या कमाई पेक्षा दुप्पट रक्कम आहे.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५० 

नेत्रहीनता !

जीवनाच्या रगाड्यातून

नेत्रहीनता !

ठाण्याहून नाशिकला महत्वाच्या कामासाठी चाललो होतो. हायवेवर गाड्यांची प्रचंड प्रमाणात जा ये चालू होती. लवकर पोहचणे जरुरी होते. त्यामुळे गाडी वेगातच चालली होती. अचानक माझी नजर दूर अंतरावरील एका गाव फाट्यावर गेली. एक माणूस हलके हलके मुख्य रस्ता ओलाड्ताना दिसला. तो एकटाच असून, बेफिकीर भासत होता. कोणत्या क्षणी एखादे वाहन जवळ येऊन धडकेल ह्याचा भरवसा नव्हता. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती हायवे क्रॉसिंग करताना डावीकडे उजवीकडे बघेल,  स्वत:ला विश्वासात घेईल, व मग रस्ता ओलांडेल. परंतु हा कसलीही तमा न बाळगता शांतपणे इकडे तिकडे नजर न टाकता, रस्ता ओलांडत होता. दररोज  पेपरमध्ये अनेक  अपघतांच्या बातम्या वाचण्यात येतात. अशाच बेफिकीर वृतीमुळे व वाहन चालकाच्या  नजर चुकामुळे त्याक्षणाला काहीही होण्याची शक्यता असते. काळजी अर्थात दोघानीही घ्यावयाची असते.  क्षणार्धात अनेक विचारांचे काहूर मनांत येऊन गेले. मला भासणाऱ्या त्या मूर्ख माणसाला चांगलीच  हडसून खडसून समज द्यावी, झापावे, हा विचार आला. एकदम मी ब्रेक दाबून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. अगदी मुठ वळून त्या माणसाच्या पाठीमागे घावलो.  प्रथम त्याला ग्राम्य भाषेत एक शिवी हासडली. ” ये साले तुमको क्या मरना है हायवेपर. शरम नही आती,  इस बेफिकीर ढंगसे रस्ता क्रॉस करते हो.”  मी त्याचा जवळ  धाऊन गेलो. त्याला एक लाफा देण्याच्याच पोज मध्ये होतो. माझा आवाज एकूण ऐकून तो थांबला. त्याने माझ्या आवाजाच्या दिशेने मान वळविली. मला एकदम धक्का बसला. तो माणूस नेत्रहीन होता. क्षणात माझा राग पूर्ण विरघळून गेला. आपल्याच विक्षिप्त विचारांची लाज वाटू लागली.

 प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. नेत्रहीन  असला, द्रीष्टीहीन असला तरी मनाने केव्हांच जगण्याच्या प्रक्रीयेमध्ये बेफिकीर नसतो. आपण डोळस असूनही आपल्या विचारीनी अंध असतो. ही जाणीव झाली. मी चटकन शंभर रुपयाची एक नोट त्याचा हाती ठेवली.

” हे काय आहे?”  हे तो विचारत असतानाच मी त्याचा द्रीष्टीहीनतेचा  फायदा उठवत हळूच माघारी फिरलो.                            

डॉ. भगवान नागापूरकर 

९००४०७९८५०