Monthly Archives: डिसेंबर 2017

एक विलक्षण अहवाल

एक विलक्षण अहवाल

अमेरिकेतील वास्तव्यांत, एक वाचनालयांत वैद्यकीय शास्त्रातील दोन अहवाल वाचण्यांत आले. त्यांचा मतीतार्थ थोडक्यांत असा होता.
PhD. ही शैक्षणिक क्षेत्रातली सर्वोच्य पदवी. कोणत्यातरी विषयाचा अभ्यास, माहीती, संकलन करुन ते नाविन्य विद्यापिठापुढे सादर करुन मान्यता मिळवणे. व जगापुढे ठेवणे. कित्येक विषय नाविन्यपू्र्ण व चमत्कारी असतात. परंतु ज्ञानामध्ये हातभार लावणारे असतात. वैद्यकीय क्षेत्रातल्या तीन विद्यार्थ्यानी एक विषयाचा अभ्यास व Statistics गोळा केले होते. तो अहवाल वाचण्यांत आला.
Sex अर्थात लैंगिकता हा त्यांचा विषय. Sex efficiency, Tolerance, Bodily stimulation, Ecstasy of Joy, Period of excitation, Post sexual exhaustion, Frequency of sexual acts, Duration of sexual act, इत्यादी अनेक प्रश्नांचा त्यांत उहापोह करण्यांत आला होता.
त्याच प्रमाणे अमेरिकेच्या एका वैद्यकीय मासिकांत अतिशय मनोरंजक परंतु माहीतीपर असा लेख वाचण्यांत आला. तेथील एका Statistic Survey Of human body in Sexual Performances ह्याला अनुसरुन तो विषय हाताळण्यांत आला होता. पौर्वात्य जगतांत सेक्स अर्थात लैंगिकता हा अत्यंत साधा व सामान्य विषय आहे. त्याला कोणत्याच अंगानी त्या विषयाच्या कार्याबद्दल तशी कुणालाही उत्सुकता वा मौज हा प्रकार नसतो. जसे कान, नाक, डोळे, इत्यादी अवयवांचे नैसर्गिक कार्ये, त्याच प्रमाणे लैंगिक इंद्रिये व त्यांचे कार्य. ह्या प्रणालीकडे लोक असे बघतात. आमच्याकडे मात्र लैंगिकता हा प्रचंड उत्सुकतेचा, सन्मानाचा, नैतिकतेचा, आणि अध्यात्मिक प्रांतातला विषय बनून राहिला आहे. जीवनात सखोल महत्व लैंगिकतेला ( Sexuality )दिले गेले आहे. माणसाचे चारित्र्य व लैंगिकता ह्यांचे संबंध गुंफले गेले आहे. ह्यांतही स्त्री लैंगिकता व तिचे चारित्र्य ह्यांना खुपच एकत्र गुंफले आहे.
लेखाचा अहवाल सांगतो की Sex अर्थात् लैंगिकतेमध्ये स्त्रियांची लैंगिक क्षमता ही पुरुषांपेक्षा जास्त असते. लैंगिक उत्तेजना पुरुषामध्ये जलद होते, तशी शमूनपण त्वरीत जाते. उलट स्त्रीयांची लैंगिकता उत्तेजित होण्यास अवधि लागतो, परंतु ती बराच काळपर्यंत चेतनामय राहते.
स्त्री एका वेळी अनेक पुरुषाना देखील लैंगिक समाधान देण्यास सक्षम असते. ह्या उलट कोणताही पुरुष एका स्त्रिला देखील परिपूर्ण लैंगिक समाधान देण्यास असमर्थ राहतो. वैद्यकीय शास्त्राने लैंगिक कार्य प्रणालीची जी उकल शास्त्रीय माहीती व Statistic Information वरुन केली आहे, ती जरी ज्ञान प्रधान व मनोरंजक असली तरी कांही व्यवहार, संकल्पना, धार्मिक पकड, ह्या विषयावर प्रकाश टाकणारी आहे. विशेषकरुन स्त्रियावर होत असलेल्या लैंगिक अत्याचारामधील एक वेगळेच दालन त्याने उघडण्याचा प्रयत्न केला आहे.
पूर्व कालीन गणिका अथवा आजकालच्या वेश्या ह्या व्यवसायाला समाजाने मान्याता दिलेली आहे. ह्याचे एक महत्वाचे कारण, लैंगिकतेच्या संखेच्या मोजमापात स्त्रीयांची क्षमता. ह्या उलट चित्र आहे ते पुरुषी लैंगिकतेचे.
२ तो लैंगिकतेमध्ये प्रचंड उत्साही वाटला तरी फार अल्प काळांत क्षमताहीन होऊन जातो. सर्व उत्साहाचा शक्तीपात होऊन जातो. बंदूकीचे महत्व त्याच्यामध्ये असलेल्या गोळीवरच ठरत असते. गोळी एकदा का सुटली वा गेली, की त्याचे हत्यार एकदम निकामी ठरते. ती व्यक्ती लगेच हातबल होताना दिसते. बंदूकीची गोळी कदाचित् त्वरीत उपलब्ध होऊ शकेलही. परंतु खऱ्या जीवननांमध्ये पुरुषाना लागणारी लैंगिकतेसाठीची गोळी ( अर्थात विर्य रस ) निसर्गालाच निर्माण करावी लागते. आणि ही आवधी घेणारी प्रक्रिया असते. कांहीना अनेक दिवस तर कांहीना बराच काळ. पुरुषाची प्रकृति, स्वास्थ, वय, वातावरण, परिस्थीती, आहार इत्यादी अनेक घटक त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. म्हणून तेवढा काळ तो खऱ्या अर्थाने लैंगिक क्षमताहीन झालेला असतो. त्याची लैंगीकता ही ह्याच कारणाने फार अल्पजीवी ठरते. त्याला वेळेचे गणित अर्थात उपलब्धता आणि क्रिया ह्यांचा ताळमेळ जाणून घ्यावाच लागतो. फक्त चालबाजी, दादागीरी, शारीरिक हातपायातले बळ, शाब्दीक वायफळ बडबड आणि घृणास्पद हालचाली ह्यातच तो आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुरुष प्रधानकी त्यांत भर घालते. हे सारे तो वैद्यकीय अहवाल वाचल्यावरच जाणवते. व पटू लागते.
एक पुरुष, तसे म्हटले तर एका स्त्रिला देखील लैंगिक सुख समाधान देण्यात कमी पडतो. काय गम्मत आहे बघा. बहू पत्नीची प्रथा. ह्याच पुरुषानी आपल्या शारीरिक ताक्तीने, धर्मबंधनाने, वा इतर कोणत्या कारणास्तव, निर्माण केली. कोणते संपूर्ण लैंगिक सुख समाघान त्या परिस्थीतीत स्त्रियांना मिळाले असेल. बहूपत्नी ही प्रथा आजही कांही समाजात आहे.
नुकताच आपल्याकडील एक शासकिय समाज शास्त्राचा अहवाल वाचण्यांत आला. विचीत्र व विलक्षण असा. अभ्यासक म्हणतात की आजच्या घडीला भारतात दोन कोटी तरुण पुरुष असे आहेत की जे शरीराने सशक्त , सुद्दढ, व नॉर्मल आहेत. परंतु ते नपुसक आहेत. ते लैंगिकतेमध्ये लैंगिक क्रियासाठी सक्षम नाहीत. About two cores of young healthy men are sexually incompetent in performing intercourse. हे प्रमाण प्रचंड आहे. कारणे देखील बरीच असू शकतील. परंतु परिस्थीती चिंताजनक, निराशमय आहे. वैवाहीक जीवनाचा आत्माच मुळी लैंगिकता हा असतो. भले तो समयबद्ध असेल. परंतु प्रेरणा देणारा व जगण्याचे आमिश दाखवणारा निश्चीतच असतो. वाढत जाणाऱ्या व होऊ घातलेल्या विवाह बंधनातील वितूष्ट अर्थात घटस्फोट (Divorce ) ह्याच्या कारणामधील “लैंगिक क्षमता ” हेही एक कारण असल्याचा अहवाल सांगतो. आजपर्यंत पुरुष प्रधान सकल्पनेने अशा अनेक व्यंगावर, वागणूकीवर, जबरदस्तीने पांघरुण घातले होते. स्त्रिला ते सहन करावे लागले. व्यसन, दारुबाजी, बाहेरख्यालीपणा, ह्या गोष्टी लैंगिकतेमध्ये प्रचंड बाधा आणतात.
आता विचार मालिका बदलत आहे. मात्र दोघानीही ह्या विषयी समजदारी व संयमाने मार्ग आक्रमण करावा. भावनिक विचारांचा त्यांत गुंता नसावा. लैंगिक शिक्षण अशाना मार्ग दर्शन करेल. हाच त्या अमेरीकन उच्य शिक्षीत विद्यार्थ्यानी आपल्या विषयामधून काढलेला निशकर्ष मला समजला.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

महाराजानी मिळवले देवत्व

महाराजानी मिळवले देवत्व

एकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, फुले, उदबत्ती, निरंजनचा दिवा तेवत ठेवलेला होता. त्या महाराजाविषयी चौकशी करता ते शेजारच्याच गावचे एक ग्रहस्थ असल्याचे कळले. सामान्य जनाप्रमाणे त्यांचे व्यवहार चालू असतात. एका बँकेमध्ये नोकरी करुन उदार्निवाह चालवितात हे कळले. परंतु अध्यात्मिक प्रांतात, ईश्वरी ज्ञानाबद्दल जाणकार होते. वाचन, अभ्यास, व अनुभव ह्यातून त्यानी ज्ञानसंपदा केलेली होती. ईश्वरी श्रद्धा, संकल्पना, ज्ञान आणि वाणी कौश्यल्य ह्याचा अप्रतीम संगम प्राप्त ती व्यक्ती होती. निसर्गतः ह्या व्यक्तीचा समोरच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांवर एकदम परिणाम होणारच. व्यक्तीचे ज्ञानच फक्त प्रभावित करणारे असते. त्या ज्ञानी व्यक्ती बद्दल आदर वाटू लागतो. त्याचे प्रत्येक शब्द आपणास पटू लागतात. प्रत्येकजण अशा व्यक्तीचे मोजमाप आपल्या स्वतःच्या ज्ञान साधनेतून करतो. त्याला संपर्कात ठेवतो. आदर्श मानतो. मोजमापाचे कोणतेही परिमाण नसते. फक्त वाटले, पटले, भावले, ह्या शब्दानी त्यावर मुलायमा लावला जातो. त्याचे तुम्ही वर्णन करु बघता. त्याला चांगल्या, उत्कृष्ट स्थानी मानता. देवत्वाची कल्पना ही अशाच चक्रातून सुरु होते. दुसरा ऐकून तोही प्रभावित होतो. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्या तथाकथीत थोर व्यक्तीला कृपावंत, दयावंत, सुखदाता, दुःख हर्ता इत्यादी विषेशने लाऊन, त्याच्या बद्दल वाटणारे प्रेम आदर्श व्यक्त करताना आपलाही अहं जागृत केला जातो. मला कोणीतरी देवतुल्य व्यक्ती सापडला, हा भाव निर्माण केला जातो. तसे जीवन हे सुख दुःख यांच्या परिणामांचेच चक्र असते. मात्र व्यक्ती नेमके सुखदायी घटना टिपून त्या देवत्व दिलेल्या व्यक्तीवर लादतात. त्यांच्यामुळे हे सारे मिळाले, प्राप्त होऊ शकले ही अशांची समज. बस ह्याच आहिक मिळकतीची यादी सतत सर्वासमोर ठेऊन, वाचून त्या व्यक्तीला दिले गेलेले देवत्व द्दढ करण्याचा प्रयत्न होतो. एकापासून दुसरा, नंतर तिसरा, मग चौथा — सर्व त्या मार्गानी धावण्याचा प्रयत्न करतात. येथे प्रमुख ध्येय बनते ते सुख मिळवणे वा दुःख कमी करणे. आदर भावना, प्रेम, हे तर देवत्वासाठीचे रंग आहेत. सारा व्यवहार हा फक्त अशाच मुखवट्याने झाकलेला असतो.
प्रत्येक सजीवाला भावना दिलेल्या आहेत. हा एक सिद्धांत आहे. तो त्याचा जीवन जगण्याचा व आशेचा एक मार्ग असतो. भावनाप्रधानता हा नैसर्गिक गुणधर्म असतो. मानवाला मात्र ‘विचार- विवेक ‘ ह्या संकल्पनेचे विशेष वरदान मिळाले आहे. त्याच्याच जोरावर जीवनांत तो प्रगती करतो, जीवनाच्या गरजांचा मागोवा घेत ते सुसाह्य करतो. मात्र अनेक प्रसंगी भावना ह्या विचारावर मात करतात. त्या प्रमाणे तो वागण्याची दिशा अखतो. विचारच सांगतात की परिस्थिती काय आहे. वातावरण कोणते आहे. जगण्याचे सारासार मार्ग कोणते. पायंडा कोणता. इत्यादी. खरे जगणे व सुसाह्य जगणे, सत्याचा मागोवा तर्क बुद्धीने घेणे, याचे मार्ग दर्शन फक्त सुविचारच करु शकतात. व्यक्तीचे मुळ गुणधर्म असतात स्वार्थ, अहंकार, वर्चस्व, राग, लोभ, मोह. आणि ह्याच्या गुंत्यातच राहण्यांत ती समाधान मानते.
निसर्ग महान असतो. जीवनासाठी उर्जा देणारा असतो. गरजांची पूर्तता करणारा असतो. खरे म्हणजे त्यालाच देवत्व ही संकल्पना लादलेली असते. प्रकाश, अग्नी, हवा, पाणी, प्रथ्वी इत्यादी मध्येच ईश्वराच स्वरुप असते. प्रथमदर्शनी अभ्यासकांनी,
२ विद्वानानी, ऋषी मुनीनी हे मान्य केले. निर्गुण निराकार सर्व व्यापी अणूरेणूस्थित इत्यादी. माणूस एक बुद्धीवान प्राणी. त्याच्या भावना उसळू लागल्या. मन सैरावैरा धाऊ लागले. ईश्वराला जाणण्यात भावनानी अनेक अडचणी निर्माण करण्यास सुरवात केली. ईश्वराच्या संकल्पनेला सगुण रुप दिले गेले. ‘विविधता ‘ हा मानवी स्वभाव गुणधर्म आहे. तो वरदान तसाच शाप देखील ठरत आहे. एकसंघपणा, एकवाच्यता ह्यामुळे संपूर्ण नष्ट झाली. ज्याला जसा विचार सुचला, जशी भावना आली, त्याप्रमाणे तो त्याने व्यक्त केला. इथेच न थांबता, आपलेच विचार कसे योग्य व परिणामकारक आहेत, ह्यावर भाष्य सुरु झाले. जो जेवढा प्रभावी, पटवून देणारा , अभ्यासक, वाक् चतूर होता, इतरांच्या गळी उतरविण्यास सक्षम ठरला. झाले निरनीराळे संघ, समाज, कुटूंबे त्याच्या विचारावर मोहून गेली. अनेक मार्ग, विचारसरणी, प्रथा, बनू लागल्या. प्रमुख विचार धारा एकच होती. मात्र वेगवेगळ्या दिशा, मार्ग विचारसरणी ह्यानी अनेक तुकडे तुकडे बनत गेले. फारच थोड्याना हे कळले. परंतु अनेकजण फक्त नक्कल करण्यांत समाधानी होऊ लागले. एक इसापनिती मधली गोष्ट आठवली. झाडाचे पान पडले. ससा भितराच तो. घाबरला. त्याला वाटले आकाश कोसळत आहे. तो धावत सुटला. ओरडत सुटला— ”पळा पळा आकाश कोसळत आहे.”—- त्याचे ओरडत धावणे बघून, रस्त्यामधील भेटणारे इतर प्राणी ही त्याच्या बरोबर धूम ठोकून पळू लागले.—- कसलीही खातरजमा न करता. फक्त जे दिसते ते सत्य समजून.
मानवी जीवनातही असेच चित्र दिसून येते. बुद्धीमत्तेचे वरदान असून देखील. कुणीही सारासार विचार, विवेकाला चालना देताना दिसत नाही. फक्त जे दिसते, एकू येते, कुणीतरी सांगते, कांही तरी वाचले जाते, बस माणसे ह्यातच वाहुन जातात. जीवन प्रवाहांत प्रवाह नेईल तस वाहून जायच नसत. पोहून मार्ग आक्रमण करावयाचा असतो. इतरांचे अनुभव मार्ग दर्शनासाठी ठीक. परंतु त्यातील सत्यता व तारतम्य ह्यावर चिंतन असावे. स्व अनुभव व सदसदविवेबुद्धी ह्यावर जीवन प्रवाह करायचा असतो. आज काल कोणत्याही संकल्पनेचे त्वरीत व अनेक शिष्यगण तयार होतात. कुणीही सखोल अभ्यास, ज्ञान, माहीती याचा विचार करीत नसतो. फक्त तो करतो. मला पटले. आम्ही असे वर्षानुवर्षे करीत आलो आहे. पुर्वजानी केले. आता मी करीत आहे. कुणीही रचमात्मक अभ्यास करीत नाही. त्याला आवाहन देऊन त्याची सत्यता पडताळून बघत नाही. मागुन आले. पुढे चालू. शेवटी शेवटी तर संपूर्ण सत्य, तत्वज्ञान, बदलून जाते. व राहतात त्या रुढी, फक्त गैरसमज, अज्ञानाच्या भिंतीच्या चौकटीमध्ये बंदीस्त. मुळ गाभ्याकडे कुणीच लक्ष देत नाही.
भावना आली, पटले, व अनुकरण केले. एकनाथरावानी ज्या व्यक्तीचा फोटो घरांत लाऊन त्याला सर्व भावनिक देवत्वाचे गुणधर्म अर्पण केले. देव संकल्पनेपेक्षाही जास्त प्राधान्य दिले तो अशातलाच भानिक श्रद्धेचा प्रकार झाला होता. ती व्यक्ती कदाचित् थोर असेलही. त्याला विरोध नाही. मात्र एकनाथरावांच्या वैचारीक ठेवणाची खंत वाटते. आगदी सहजपणे त्यानी त्यांचे पारंपारीक व घराण्याचे रुढी संस्कारीत देव संकल्पना मोडीत काढल्या. आपल्या उत्पन्न झालेल्या भावनाना प्राधान्य देत एक वेगळेच ईश्वरत्व निर्माण केले. अर्थात मान्य आहे तत्वज्ञान “जसा भाव तेथे व तसा देव” परंतु असे प्रकार फक्त भावना व ईश्वर भक्ती ह्याच्यातच रहात नाही. तर त्याला व्यवहारीक, मानसिक रंग चढतो. त्याना काय भावते, आवडते, हे मानवी विचार तुमच्या ईश्वरी भावने भोवती चक्रा मारु लागतात. व आपण त्याने प्रभावित होतो. व तसाच मार्ग निवडतो. व आपले स्वताःचे अध्यात्म निर्माण ३ करतो. ह्यात फक्त उद्देश, ध्येय नसते. असतो, मला, माझा, माझ्यासाठी,अर्थात अहंला शांत करणे. खऱ्या देवत्वाच्या कल्पनेपासून खूप दूर. मानवी अहंकारी स्वार्थी जगांत.
एकनाथरावांच्या कल्पना रम्यतेत होता, फक्त जीवन व्यवहार. जीवनाच्या सुख दुखाःचे धागे, झगडा, यश अपयशाच आलेख. आणि हे सारे घडत असते कुणाच्या तरी इच्छेनुसार, शक्तीनुसार, योजने नुसार. त्यांच्या लेखी मानवी प्रयत्नाना खुपच कमी मर्यादा असतात. सारे होत असते ते फक्त ईश्वरी इच्छेनुसार. त्यांचे ते आदरणीय महाराज हेच ईश्वराचे प्रतिक आहेत. त्यांच्याच दयेवर सारे व्यवहार, दैनंदीनी चाततात. महाराजाना समर्पण भाव, व प्रेम, सतत वाहणे, व्यक्त करणे हेच ते आपल्या जीवनाचे ध्येय समजतात. एकनाथराव आपल्या वैचारीक व भावनिक गुंत्यात सतत राहू इच्छीत होते. हीच त्यांची श्रद्धा व ते द्रष्य स्वरुपांत देऊ करण्याचे आश्वासन देणारे त्यांचे देव अर्थात महाराज.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

होर्डींग आणि शुभेच्छा

होर्डींग आणि शुभेच्छा

संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या चौकोनातील एका बाकावर बसून वर्दळ व सभोवताल बघत होतो. समोर एका स्थानिक व्यक्तीचे प्रचंड मोठे होर्डींग ( Hording- Cut out) लावलेले होते. वाढदिवस आणि जनतेकडून शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा होती. शेजारीच कांही सामाजिक, राजकीय व्यक्तींची पण चित्रे काढलेली होती. जाणारा शेजार बाकड्यावर येऊन बसायचा, थोडी विश्रांति घेऊन निघून जायचा. मी प्रत्येकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसे मला त्या होर्डीगवरल्या व्यक्तीशी कांही घेणे देणे नव्हते. त्याना मी बघीतले देखील नव्हते. फक्त एका त्रयस्थाच्या भूमिकेत. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला त्या होर्डींग विषयी विचारले. मी जवळ जवळ १०० पेक्षा जास्त व्यक्तींशी संपर्क साधला. सर्वांची मते जी व्यक्त झाली ती अशी.-
काय प्रचंड होर्डींग आहे, काय गरज होती, कशाला रस्ते खराब करतात, कशाला स्वतःचा उदो उदो करतात, हरामी ही माणसे, जनतेला लुटणारी, पैसा लुबाडणारी, सामाजिक कार्य करतात सांगुन पैसे उकळणारी, गुंड प्रवृतीची, अहंकारी, जातपात याची पेरणी करणारी, समाजातील घाण, लुटमार करणारी टोळी, — इत्यदी अनेक दुषणे ऐकली.
मी चक्राऊन गेलो. मला एकही व्यक्ती भेटला नाही, ज्याने त्या तथाकथीत होर्डींगवरल्या व्यक्तीचे अभिनंदन केले. वा शुभेच्छा दिल्या. सर्वानी त्या होर्डींग बद्दल राग, तिरस्कार, घृणा, द्वेश व्यक्त केला. मी बेचैन झालो. लोकांच्या ह्या विचार भावने मुळे नव्हे. तर त्या होर्डींगवरल्या व्यक्तीने आपली छबी पोस्टरवर लाऊन शुभेच्छेची अपेक्षा केली होती. त्याच्या आत्मिक स्थरावर शापांचा, दुर्विचारांचा, तळतळाटाचा प्रचंड आघात होत असलेला जाणवला. आणि ती व्यक्ती मात्र ह्या अघाताविषयी अंधारात होती. अज्ञानात होती. त्याचे लक्ष फक्त वर वर व समोर व्यक्त होणाऱ्या त्याच्या स्तुतीपर शब्दावरच गुंतले होते. सारे खोटे मुखवटे होते. अघात मात्र तळतळाटाचा, व दैविक निर्णयाचा होता. कालानुसार हा भोगावाच लागेल नव्हे कां ?
अध्यात्म्याचे तत्वज्ञान माणसाला आनंद समाधान व शांतता देवू करण्यास प्रयत्नशील असतात. विचार व भावना ह्या मानवाच्या मन बुद्धीचा प्रमुख स्रोत असतो. त्या सतत उत्पन्न होतात. त्यांत असते देहातील आत्म्यामधून उत्पन्न झालेली उर्जा शक्ती. ती सकारात्मक वा नकारात्मक पद्धतीप्रमाणे वाहू लागते. परिणाम चांगला वा वाईट होऊ शकतो. ह्या विचार भावनिक स्रोत लहरी, Waves, रुपाने झेपावतात. चिंतन केलेल्या लक्ष्यावर आदळतात. आघात करतात. जेंव्हा यांचे सांघिक एकत्रीत परिणाम होतात,
ती याच समीकरणामधून. येथे लक्ष्य, वेध, अघात, परिणाम, भोग इत्यादी अव्यक्त, अद्रष्य स्वरुप रचनेंत असतात. ह्यातून विचार प्रवाह उत्पन्न होतात. आपले कार्य, कर्म, धडपड, सभोवताल, उत्कर्श, व्ययक्तीक सामाजिक स्थान समाजा समोर व्यक्तीरुपाने प्रदर्शित करुन अनेक जण जन समुदायाकडून शुभेच्छा, आशिर्वाद, सहकार्य, अपेक्षीत असतात. कदाचित् जे Materialistic (पदार्थमय) असेल ते त्याना मिळतही असेल. परंतु जे दैविक, अध्यात्मिक, लहरी रुपाने त्यांना लक्ष्य केले जात असेल, त्याचा देखील परिणाम होणारच. ते अव्यक्त, अद्दष्य, असल्यामुळे मनाच्या शांतता वा अशांतता ह्यावर प्रभावित होणारच.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

पक्षाना मेजवानी

पक्षाना मेजवानी

मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून येई. पक्षी प्रथम झाडावर, पत्र्यावर, खांबावर, दोरीवर इत्यादी ठिकाणी बसत. सर्व दिशेने चौफेर द्रष्टीने बघत. सभोवतालच्या परिस्थीतीचा मागोवा घेत असत. कोठे आपला शत्रु अर्थात, मांजर, कुत्रा वा कुणा नाहीत ना ? याची चाहूल घेत असत. संपुर्ण खात्री वाटल्यावरच चटईवर येऊन सतर्कतेचे भान ठेवीत दाने टिपीत. जगण्यातील पावलोपवलीचे धोके जाणत कसे सतर्कतेने जगावे हा नैसर्गिक संदेश ते देत होते. शिवाय एक दोन दाणे टिपले की परत सुरक्षीत जागी जाऊन बसणे, पुन्हा अवलोकन करणे, व परत दाणे टिपण्यासाठीच प्रयत्न. हे चक्र असे. त्यांच्या हलचाली खुप शिस्तभद्ध व मनाला मोहून टाकणाऱ्या वाटे. भूतदयेचा ओलावा त्यांत समाधान देई.
मी एका मोठ्या पत्र्याच्या डब्यांत पक्षासाठीचे धान्य जमा ठेवित असे. व दररोज एक वाटीभरुन टाकी. कांही कारणास्तव मी दोन आठवडे बाहेर गांवी गेलो होतो. पक्षांना धान्य टाकणे ह्यांत खंड पडला. गावाहून आलो. सकाळी डब्बा उघडला तर दिसले की त्यांत खूप किडे, आळ्या, जळमटे झालेली आहेत. मी बेचैन झालो. लगेच सुप आणले व अंगणातच बसुन सर्व धान्य साफ केले. सर्व किडे आळ्या झटकून कचरा कोपऱ्यांत फेकून दिला. धान्य स्वच्छ केले. व नेहमी प्रमाणे एक वाटी भरुन ते चटईवर पसरुन टाकले. खुर्चीवर बसुन पक्षांची वाट बघत बसलो. थोड्याच वेळांत कांही चिमण्या तेथे आल्या. मात्र मला एकदम आश्चर्य वाटले. त्या चिमण्या तेथील धान्य टिपण्यापूर्वी, मी शेजीरीच फेकून दिलेल्या कचऱ्याकडे झेपावल्या. त्यातील किडे आळ्या याना वेचित त्याना खाण्याचा अस्वाद घेऊ लागल्या. मी त्या द्रष्यानी खुप प्रभावित झालो. त्या रोजच्या सवईप्रमाणेच खाण्याचा अर्थात टिपण्याचा आनंद घेत होत्या. मात्र ज्या प्रमाणे आपणास जेवणांत एखादा आवडीचा पदार्थ मिळाला तर त्यावर कसे तुटून पडतो, त्याप्रमाणे त्यानाही त्यांच्या आवडीनुसार व प्रकृती, निसर्गानुसार आवडते खाद्य प्राप्त झाले होते. निसर्गाची किमया आणि माझा दैनंदीन हिशोब ह्यातील तफावत माझ्या लक्षांत आली. अर्थात जे मला सहज व शक्य असेल तेच मी पक्षांना देणार. इतर त्यांच्या अवडीचे खाद्य, “वेगळा आहार एक ट्रीट” त्यानाच शोधू देत. हा देखील एक निसर्ग म्हणून मी त्याच्याकडे बघीतले.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

** मादी व नर ह्यांत फक्त मादीचीच खऱ्या अर्थाने योजना केलेली. तीला जीवन चक्रासाठी मातृत्व दिले. नराची संकल्पना नंतरची. एक सहाय्यक, मदतनीस, रक्षक, ह्या भूमिकेंमध्ये
** मातृत्वाला अनुसरुन वात्सल्य, जीव्हाळा, प्रेम, माया, करुणा, त्याग वृत्ती, संसारीक कौटूंबीक ओढ दिली
** जगदंबा सर्व श्रेष्ठ देवता. तीची तीन रुपे. शक्ती, धन, ज्ञान. हे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, ह्यांच्या प्रतीकात्मक रुपाने दिसते. जीवनाची त्रीकोणात्मक रचना व्यक्त करणारी.
** जन्मताच स्त्रीची सर्वांगीन ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तीच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तीचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तीने आपली योग्यता सिद्ध केली आहे.
** स्त्रीचे मात्रत्व ह्याचा पुरुषांनी गैर फायदा घेतला. तीला दुय्यम स्थान दिले. तीला अबला केले अशक्त ठरविले. गरजेच्या चक्रांत अडकलेल्या स्त्रीला गुलाम बनविले. आत्याचार झाले. भोग वस्तू म्हणून तीची संभावना झाली. तीला सौंदर्याचे प्रतिक बनवून शोभेची वस्तू समजले गेले.
** स्त्री आपले सौंदर्य हेच हत्यार समजू लागली. त्यांत ती फसली. पुरुषाना आकृर्षित करणे ह्यातच तीला मोठेपणा वाटू लागला. सौंदर्य, मादकता ह्या गैरसमजात ती राहीली. ह्याच कारणाने ताला सतत दुय्यम स्थान मिळत गेले. आपल्या अंगच्या गुणाना ती विसरु लागली.
मत्सर, राग इर्षा ह्या गुणाना ती जवळ करु लागली.
** ज्या ज्या वेळी व्यासपिठ मिळत गेले त्या त्या वेळी तीने आपल्या कर्तव्याची, महानतेची झलक दाखविलीच. महान स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात चमकल्या. जसे राजकारण, विज्ञान, शिक्षण, अर्थक्षेत्र, अध्यात्म, तत्वज्ञान, गिर्यारोहन, सैनिकी, अशा अनेक क्षेत्रांत त्यानी आपले कर्तव्य सिद्ध केलेले आहे.
** समानतेच्या विचारांत ती आजकाल प्रत्येक क्षणी कौटूंबीक आधार न मान्य करता राजश्रय अर्थात कायदे , कानून, ह्यांत गुंतली आहे. कायद्यानी तीला खूपच संरक्षण दिले असले तरी प्रत्येक वेळा ती ते शस्त्र विनाकारण पारजीत आहे. त्यामुळे एक प्रकारचा कौटूंबीक कलह निर्माण होत असल्याचे चित्र दिसू लागलेले आहे.
** अनेक वर्षांची सहन केलेली दुय्यम जागा दुर्दैवी होती. परंतु ती तो बदल इतका शिघ्र करु इच्छीते , जे घातक ठरेल. तीच्यात सुडबुद्धीची भावना येत असल्याची जाणीव होणे हे योग्य नाही. सारे चित्र मैत्रीपूर्ण बदलने जरुरीचे आहे. त्यासाठी घैर्य व धिरता असावी हे वाटते.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com