Monthly Archives: ऑगस्ट 2017

देव ही संकल्पना

देव ही संकल्पना

अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना त्याने आखलेली आहेत. सुक्ष्मापासून प्रचंड देहधारी व ज्ञानाच्या प्रातांत अत्यल्प ज्ञानापासून प्रचंड ज्ञान प्राप्त रचना निसर्गाने आखलेली आहेत. प्रत्येक सजीव हा आपापल्यापरी एक सर्वक्षम, परिपूर्ण असतो. स्वत:च्या जीवनाची चाकोरी व चक्र अतिशय काटेकोरपणे पूर्ण करण्याची क्षमता प्राप्त अशी ही रचना आहे. जर अत्यंत बारकाईने त्याच्या ह्या जीवन रचनेचा विचार केला तर हे चक्र जवळ जवळ सारखेच प्रतीत होते. उत्पत्ती, स्थिती व लय ह्या चक्रांत जीवनाचा उच्च निचतेचा भाव कोठेच निर्माण होत नसतो. ते निसर्गाला केव्हांच मान्य नाही. प्रचंड उत्क्रांत झालेला मानव हा देखील काळानुसार अत्यंत सुक्ष्म अशा क्रिमी, जंतूचे देखील खाद्य होवून जाते. एक जीव दुसऱ्यावर जगवा हीच तर त्या ईश्वराची मूलभूत कल्पना आहे.
“ जीवः जीवस्य जीवनम ” म्हणतात ते ह्याचमुळे. ईश्वरांनी विचार क्षमता अर्थात ज्ञान ह्याची देणगी मानव जातीला जास्त प्रमाणात बहाल केली. कदाचित त्याची योजना असावी की मानव प्राण्याने निसर्गाच्या दैनंदीन सृजनात्मक क्रियामध्ये त्याला मदत करावी. परंतु झाले मात्र विपरीत. तो त्याच ज्ञान साठ्याचा दुरुपयोग करु लागला. वेगळाच उपयोग घेण्याचे योजू लागला. हेच ज्ञान आपल्या जगण्याच्या समस्या उलगडू शकते. आपल्या अस्तित्वामध्ये श्रेष्ठता ही निर्माण करु शकते. आपल्या इतर सर्व सजीव वा निर्जिवामध्ये आपले महत्त्व, मानसन्मान स्थापित करण्यास मदत करु शकते, हे त्याच्या लक्षात आले. निरनिराळ्या क्लुप्त्या करुन आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, ह्याचा त्याने निरनिराळ्या माध्यमाने प्रयत्न केला . केवळ ज्ञानाच्या जोरावर प्रचंड जगांत, ज्यात डायनोसार, ड्रॅगन, वाघ, सिंह, हत्ती, मगर, अजगर, एनाकोंडा, गेंडा, हिप्पोपोटामस, सर्प, अवाढव्य असे मासे, जलचर प्राणी इत्यादी प्रचंड शक्ती प्राप्त, भयानक प्राणी ह्यांच्यावर संपूर्णपणे ताबा मिळवला. त्यांना अंकीत केले. आपल्या अधिकार क्षमतेमध्ये आणले. परिणाम झाला तो मानव सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरला. हे सारे केवळ विचार ज्ञान संपदेच्या अधिपत्यामुळे. तसा शारिरीक शक्तीमध्ये तो कित्येक प्राण्याच्या तुलनेत अत्यंत कमी पडतो. एखादा क्षुल्लक डास वा क्रिमी किटक देखील त्याला जगणे मुश्किल करु शकतो. शक्ती सामर्थ्यांत तो इतर प्राण्याच्या केव्हांच वरचढ होऊ शकणार नाही. फक्त गनीमी कावा, चकवा तंत्र, विश्वासघात इत्यादी आयुष्याचा तो कौशल्याने उपयोग करतो. केवळ विचार, ज्ञान यांच्या सामर्थ्यांमुळे मात करतो.
विचार व ज्ञानसाठा जेव्हा विकसीत होऊ लागला, तेव्हा त्याला जीवनचक्रांत कोणताही सजीव वा निर्जीव द्वंदात्मक, बरोबरी करणारा, आवाहन देणारा राहीला नाही. सर्वांवर त्याचे वर्चस्व स्थापीत होऊ लागल्यामुळे तो एक अजींक्य असा बनू लागला.
२ परंतु म्हणतात ना, ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’
मानवाच्या विचार व ज्ञानश्रेष्ठतेमध्ये त्यालाच आवाहन देणारे, त्याला स्पर्धा करणारे, ह्यालाच वरचढ बनू शकणारे व त्याच्यावरच अधिकार गाजवणआरे, त्याचेच श्रेष्ठत्व हिसकावून घेणारे निर्माण झाले. हा कोणता दुसरा वर्ग, प्राणी व उत्पत्ती नव्हती. तर त्याच्या आपल्याच योनीमधले होते. मानव आता सर्वावर अधिपत्य गाजवित आपसातच संघर्ष करु लागला. मानवप्राणी इतर मानव प्राण्यांशीच झुंज देवू लागला. आता श्रेष्ठत्वाचा गुंता एकदम वाढू लागला. इतरांमधले श्रेष्ठत्व ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर हेच श्रेष्ठत्व वैयक्तिकतेकडे जाऊ लागले. श्रेष्ठ कोण “तू का मी” ह्याचे बिज रोवले गेले. एक भयानक प्रचंड ओझे ज्याची बिजे कदाचित सर्वच प्राण्यांचा, विश्वाचा नकाशाच बदलून टाकील. भविष्य काळात प्रचंड उत्पात निर्माण करतील. अशा विचार संकल्पनेची ती बिजे रोवली गेली. त्या बिजांचे नाव होते “तू का मी” आणि पुढे त्याचेच हायब्रिड होऊन फक्त “मीच“ अर्थात “माझेच सारे” मीच श्रेष्ठ ह्या संकल्पनेत. उत्पात माजवला. ह्या एक प्रकारच्या स्वार्थी विचाराने मानव प्राण्यातील श्रेष्ठत्वाची भावना दृढ होऊ लागली. आता ते साध्य करण्यासाठी स्वकीय अर्थात आपलेच लोक, आपलाच समुदाय, समोर येवू लागला. प्राथमिक अवस्थेत त्यांनी निरनिराळ्या क्लुप्त्या अवलंबिल्या. दोन प्राणी झगडतात तेव्हां हात पाय, दांत, नखे इत्यादी अवयवांचा उपयोग केला जाई, नंतर हातात वस्तू येवू लागल्या, त्यात दगड, लाकूड, लोखंड, तांबे इत्यादी धातू आले. मग कठीण पदार्थ येवू लागले. जस जसे ज्ञान वृधींगत होऊ लागले, शस्त्र यांची निर्मिती होऊ लागली. ह्या सर्वांचा फक्त एकच हेतू असे. तो म्हणजे अधिपत्य, सत्ता, श्रेष्ठत्व स्थापन करणे. एकदा सर्वांहून श्रेष्ठ ही मान्यता मिळाली की मग इतर सर्व काही त्याच्या पाठोपाठ येवू लागते. आजच्या प्रगत व वैज्ञानिक काळामध्ये देखील तीच प्रमुख संकल्पना जीवीत ठेवली जात आहे. श्रेष्ठत्व सत्ता आणि मग जीवनाला लागणारे सारे काही हक्काने, नव्हे शक्तीने प्राप्त होऊ लागले.
रानटी टोळ्या, त्याची आयुधे ह्याचा प्रचंड दबदबा होऊ लागला. शस्त्रांची संकल्पना, योजना परिणाम इत्यादी काळानुसार वाढत गेले. बदलत गेले. साधे, सोपे सरळ परंतु प्रचंड ताकदीची शस्त्रे निर्माण होऊ लागली. “बळी तो कान पिळी“ ह्या तत्त्वाने, शक्ती सामार्थ्य प्राप्त संघटनेकडे सत्ता जाऊ लागली. श्रेष्ठत्व येवू लागले. प्रशासन जावू लागले.
“ज्ञान” ते तर सर्वाहून श्रेष्ठ आहे ना. लहरी रुपामधले अस्तित्व असलेले. आजपर्यंत ह्याच ज्ञानाने महान शक्तीधारण करण्यावर देखील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले होते. कित्येक व्यक्ती त्या संघटन समुदायात होत्या. परंतु शरिराने अत्यंत अशक्त व भित्रे होते. फक्त विचार ज्ञान यांचा त्या काळानुसार व त्यावेळेनुसार प्रचंड साठा होता. हा शरिराने अत्यंत नाजूक, किरकोळ अशी देहकाठी परंतु ज्ञान प्राप्त होता. शारिरीक शक्तीसामर्थ्यांसमोर ज्ञान सामर्थ्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. शक्तीवान कुणाचेही ज्ञानी समजदार बोल दुर्लक्षीत करीत.
३ आणि एके दिवशी एक घटना घडली. सांज समयी संधी प्रकाशात डोंगरावर प्रचंड ढगांची जमवाजमव दिसू लागली. निरनिराळे आकार, काळे-पांढरे ढग. त्याचवेळी अचानक चमकणाऱ्या विजांचे दिसणे, त्यांच्या रेषामय दिसणे, त्यांचे ढगामधून चंचलतेने होणारे वहन व प्रकाश आणि नंतर प्रचंड आवाज. सारे वातावरण एक भयानक भीती निर्माण करणारे भासत होते. सर्व चकीत होऊन त्याकडे बघू लागले. जे स्वत:ला शक्तीवान, सामार्थ्यवान समजत होते ते देखील त्या अनामिक ज्ञात नसलेल्या निसर्गाच्या एक प्रकारे रौद्र रुपाला घाबरुन गेले. जीवाला मृत्यूची भीती ही तर निसर्गाचीच देण असते. “सुरक्षित जगा वाढत जा आणि आपली योनी वृद्धींगत करीत जा” हाच तर निसर्गाचा मूलमंत्र असतो. तो प्रत्येक सजीव प्राणी त्याचा आधार घेत जगत असतो. सारे दृष्य बघून लोक घाबरुन गेले. त्याचक्षणी त्यावेळी तथा कथीत विद्वा न परंतू शरिराने तसे अशक्त पुढे सरसावले. त्यांनी सर्वांना दिलासा दिला. ही सारी कोणतीतरी अदृष्य शक्ती आहे. प्रचंड ऊर्जा धारण केलेली आहे. ती सर्वांचे भले करील वा आपणांस नष्ट ही करु शकेल. आपण त्या शक्तीला विरोध न करता त्याला मान्यता देवू या. त्याच्या समोर नतमस्तक होवू या. त्या विद्वाानाला सर्वांनी एक मुखाने मान्यता दिली. त्याचे विचार सर्वांना पटले. ह्यात मुख्यत्वेकरुन काही विचार धारा होत्या. जे दिसतं, जे जाणवतं, जे अनुभवले १) ते सार कोणत्यातरी अदृष्य, अज्ञात शक्तीमुळे २) त्याची शक्ती प्रचंड असे ३) ती सर्वांना मदत करेल ४) तिला विरोध केला तर ती सर्वाना नष्ट करेल ५) तिचा आकार, प्रकार बदलणारे असतील. सर्वांनी त्याच्या ह्या संकल्पनेला मान्यता दिली. रानटी वृत्ती मधून सामाजिक संकल्पनेला एक प्रकारे आरंभ होत होता. पुढे अशाच अनेक प्रसंगी अनेक वेळा नैसर्गिक तथा कथीत चमत्कारपूर्ण घटना घडत गेल्या. मग ती आग असो. विजेचे चमकणे असो, धरणीकंप असो, वादळ वारे असो, सुनामी वा समुद्राचे उसळणे असो, ज्वालामुखी असो वा असेच काही. जेव्हां मानव हा भयभीत होत गेला. त्या प्रसंगावर उपाय करण्याची त्याची बौद्धिक पाकळी वा क्षमता विकसित झालेली नव्हती. कोणत्याही प्रसंगाना विरोध न करता सारे मान्य होऊ लागले. नैसर्गिक तत्त्वानुसार जर सर्वच चक्रमय असेल तर हे प्रसंगही चक्रमय होते. ते येथे घडतं, प्रचंडता दर्शवितं, आघात करीत आणि अल्पकाळानंतर निघून जात. सर्व मानव जातीमध्ये एक विशाल चर्चेचा विषय मागे ठेवून ह्यातच दोन गोष्टी झाल्या. देवत्व अर्थात कोणत्यातरी अज्ञात, सामार्थवान, सर्व श्रेष्ठ संकल्पनेचा जन्म झाला. कदाचित वर वर्णिलेला ढगाचा वा विजेचाच प्रसंग असेल असे नाही. असे अनेक प्रसंग काळ व वेळेप्रमाणे घडत गेले. प्रत्येकाला कारण कोणते हे समजू शकले नाही. तशी त्यावेळी प्रगल्भता कमी पडू लागली. हतबलता मात्र प्रामुख्याने दिसू लागली. यातूनच जन्म पावला तो देवत्वाच्या माध्यमाचा. देवत्व हे श्रेष्ठत्व वा सामर्थ्य ह्या अंगाने त्याला मान्यता मिळू लागली. आज देखील आपण जेव्हा कांही प्रचलित संकल्पना व त्यात होणारा काळानुसार बदल लक्षात आणला, तर हे लक्षात येवू लागते.
४ ग्रहणामुळे निर्माण झालेला नैसर्गिक बदल, पृथ्वीवर पडणाऱ्या छाया-पडछाया. या बदलना प्रथम धार्मिक संकल्पनेचा मुखवटा दिला गेला होता. तो राहू, केतू, सूर्य चंद्र, पृथ्वी इत्यादी. लोकांचे भजन, पूजन स्नानादी क्रमे, प्रार्थना इत्यादी हे सारे प्रचंड प्रमाणात व नियमित होत होते. ज्ञानाची वाढ झाली, समज वाढवली, निसर्गाचे चक्र समजले. सारे सारे बदलू लागले. त्या कथांवरील विश्वास कमी होऊ लागला. लोक सत्य घटनेचा आधार मान्य करु लागले. अशाच अनेक संकल्पना देखील त्यांची उकल होऊन मान्यता प्राप्त होऊ लागल्या आहेत. ज्ञान, विद्वानानामुळे परिवर्तन होत असलेले जाणवते.
रानटी काळांत जेव्हा देवत्वाची प्रथम कल्पना कुणीतरी रोवली व ती मान्य होऊ लागली. तेव्हा एक वैचारिक परिवर्तन जाणवू लागले. सशक्त, ताकदवान लोकांनाच श्रेष्ठत्व दिले जाते व त्यांचा अधिकार शक्तीच्या जोरावर मानला जाई. प्रथमच हे घडले. अशक्त किरकोळ परंतु विचार संपन्न व ज्ञानसंपन्न अशा व्यक्तीला महत्त्व दिले जाऊ लागले. कारण त्यानेच त्या नैसर्गिक घटना वा चमत्कारावर भाष्य केले होते. सर्वाना अभय देण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या शक्तीपुढे विनम्र होण्याचे, रानटीपणा बाजूस करण्याचे पटविले होते आणि हे त्याकाळच्या तथाकथीत मुखीयांना पण पटले. त्यांनी मान्यता दिली. हे बघून सर्वजण त्या तथाकथीत विद्ववानाला आदर देवू लागले. नतमस्तक होऊ लागले.
हा वैचारिक बदल, समजण्याची संकल्पना ही त्यावेळच्या समजदार वा ज्ञानी जनांच्या लक्षात येवू लागली. शारिरीक बळ वा शक्तीपेक्षाही नवीन शोधलेला वैचारिक मार्ग हा त्यांच्यावरही श्रेष्ठत्व गाजवणारा असेल ही समज दृढ होऊ लागली. ज्ञानाचे मग त्यात विज्ञान असो वा जामाजिक, कौटुंबिक धारणा विषयी असो. पारडे जड होऊ लागले. सशक्त देखील अशक्तांना मान्यता देवू लागले. विचार व विषय वाढत जावू लागले. जितके विद्वाजन, तितकेच विषय व समज. लोक जागृती निरनिराळ्या मार्गाने होऊ लागली. सहज झाले असेल वा हेतूपरस्पर घडले असेल. मात्र जे घडले त्याने सामाजिक इतिहास स्थापन होऊ लागला. अशाच त्याकाळच्या तथाकथित विद्वाेन मंडळीनी अद्रष्य शक्तीच्या मान्यतेचा विचार दृढ करणे सुरु केले. त्याच संकल्पनेतून उत्पन्न झाले आदर तंत्र, विश्वास तंत्र, श्रद्धा योजना, पुजाअर्चा, भजन इत्यादी. मग सर्वच जण त्या अदृष्य शक्तीचे गुणगाण करु लागले. सर्वांचे भले करण्याची त्यामध्ये संकल्पना आहे हा विचार स्थापन होऊ लागला. चांगले विचार, भले विचार, संस्कार, प्रेम, आपलेपणा आणि अशाच अनेक बाबींचा उगम होऊ लागला. अनेक विचार अनेक संकल्पना, अनेक मार्ग हे निर्माण होऊ लागले. निरनिराळे विचार धारक ह्यात सहभागी होऊ लागले. नावे दिली गेली. प्रचार होत गेला.
प्रगती तरी समाधानकारक होती हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. पण याचा मुळ गाभा होता श्रेष्ठत्व, अधिपत्य, सत्ता गाजविणे. जे शरिर शक्तीसामर्थ्याने इतरांना प्रभावित करीत होते. ते देखील अशा विद्वत्तापूर्ण विचारांना मान्यता देवू लागले. आदर देवू लागले.
५ त्यांच्या समोर नतमस्तक होऊ लागले. इतिहास सांगतो की, राजसत्ता ही धर्मसत्तेला प्रचंड महत्व देवू लागली. काहीतरी करुन दाखवण्याची शक्तीप्राप्त लोक हे विचार, कल्पना, भव्यता, दिव्यता इत्यादी संकल्पनाना शरण जावू लागले. ह्यामधूनच एक वर्ग निर्माण झाला. जो आपल्या ज्ञानांनी ज्यात अदृष्य शक्तीची गुणगाण, वर्णन, परिणाम, प्राप्त करण्याची साधने, मार्ग इत्यादी अनेक मार्गाचा उहापोह करु लागला. काही मिळणे वा न मिळणे, प्रयत्नांना यश येवो वा न येवो हे सारे नैसर्गिक सत्य आहे व चक्रमय आहे. परंतु एखाद्या प्राप्त घटनेला कुणाच्या तरी दयेचा, अदृष्य शक्तीची देण ह्या संकल्पनेत घालून विचारांना त्यापद्धतीने मार्ग क्रमण करण्यास प्राप्त केले जाते. तसा विश्वास निर्माण केला जातो. येथेच जन्म होते. श्रद्धा हा संकल्पनेचा. सहजता, साधेपणा, दिव्यता, महानता, चांगलेपणा ह्या कल्पनेला विरोध होत नसतो. ती मानसिकता असते. तीच अशा लोकांनी हेरली आणि आत्मसात केली. आजही असेच शारिरीक अशक्त वा किरकोळ परंतू ज्ञान संपन्न व्यक्ती सर्व समुदायात आपले स्थान प्राप्त करत असतात.
शक्तीचाच नेहमी विजय होत असतो. “ज्ञान” ही पण एक शक्ती आहे. तिने आपल्यापरी अस्तित्व स्थापन केले आहे. मूळ मानसिकता हा नैसर्गिक गुणधर्मात दडलेला आहे. जीवनाची गरज, ती अंकीत राहते. संरक्षणात, अस्तित्वाच्या काळजीत सर्व सजीवाची प्राथमिक गरज असते. ती दिलेले, मिळालेले जीवन जगण्याची “सर सलामत तो पगडी पचास” म्हणण्याची एक वाक्यरचना त्यामुळे आणि त्या स्वसंरक्षणासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. कोणतीही शक्ती तुम्हास तारेल हा विचार मनावर प्रचंड परिणामकारक ठरतो. अर्थात त्या तरण्यातच त्याच अदृष्य शक्तींकडून मिळवायचे असते. त्या जीवनाला लागणाऱ्या गरजा मग ते हवा, पाणी, अन्न ह्या प्राथमिक वा कपडा, घर, संसार इत्यादी जीवनाच्या सोई हे सारे कोणतीही अदृष्य, प्रचंड शक्तीप्राप्त संकल्पनेमधून साध्य होऊ शकते हा विचार मनास आनंद व समाधान देणारा ठरतो. त्यास वैचारिक मान्यता त्वरीत मिळते. त्याच संकल्पनेमधून उत्पती झाली त्या शक्तीच्या प्राप्तीची, आशीर्वादाची, दयेची इत्यादी.
ज्या विद्वाेन मंडळींना अनेक चांगले, सुंसकृत असे विचार येवू लागले. यांनीच त्यांच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सुचविले. निरनिराळ्या विचार धारा निर्माण होऊ लागल्या. अनेक मार्ग अनेक पंथ इत्यादी त्यामधून उत्पन्न झाले. ज्यांना जशी समज येवू लागली. ते ते त्या त्या विचार धारणेकडे वळू लागले. ह्या सर्वांचा वेगवेगळा परिणाम होऊ लागला. मात्र मूळ गाभा कायमच राहीला. तो म्हणजे श्रेष्ठत्वाचा. प्रत्येक जण आपला विचार श्रेष्ठ, प्रथम, महान, प्रगल्भ इत्यादी असल्याचे सांगू लागले. भासवू लागले. कारण श्रेष्ठत्वात होता अधिकार, सत्ता गाजविण्याची क्षमता.
काही विचार करताना, ह्या विचारांना छेद जाईल अशा कल्पना काढल्या. जशा चांगल्या अदृष्य शक्ती असतात, तशाच त्रासदायक, तापदायक, हानीकारक देखील शक्तींचा ६ उहापोह झाला. भूताटकी, चेटूक, चकवा, भूतबाधा, पिशाच्य, राक्षसी वृत्ती इत्यादींच्या कल्पना पुढे आल्या. त्याच्या भयावह शक्तीसामर्थाच्या वर्णनाने अनेकजण हाबकून गेले. अशा वृत्तींना देखील अंकीत करावे, त्याचीपण दया मिळावी. कृपादृष्टी असावी ही विचारसरणी पण जोर धरु लागली. ह्या साऱ्यांचा वेगळाच मार्ग शेवटी जात होता. आपले श्रेष्ठत्व दुसऱ्यावर स्थापन करण्याचा प्रयत्नात, अनेकजण त्यातही अयशस्वी झाले. चांगले असो वा वाईट, सर्वानाच अंकित करुन स्वरक्षण करुन घेण्यालाच त्यात यश मिळत गेले. अनेक उलाढाली, अनेक घटना अनेक प्रसंग चक्रमय रुपात चालतात. ज्यात उत्पती स्थिती व लय हे सुत्र अबादित आहे. मानवाने आपल्या अहंकारी बुद्धीने त्यात खूप विघ्ने, वितुष्ट, बदल करु घातले. त्या सर्व शक्तीमान निसर्गाला (का परमेश्वराला) आपल्या इच्छेप्रमाणे बदल करण्यास भाग पाडले. जे काही दिसू लागेल, भासले, वाटले ते सारे मिथ्या होत चालले आहे. फार क्षणीक बदल ही तर निसर्गाचीच योजना आहे. उत्पत्ती, स्थिती व लय ह्यावर देखील मानव अधिकार गाजविण्याचा प्रयत्न ह्या मधून होता.

समाज आज खूप प्रगती करीत आहे. पुरोगामी बनत चालला आहे. परंतु अशा अनेक विचारांची जी मुळे खूप अनेक अनेक वर्षापासून खोलवर रोवली गेली, ती समुळ नष्ट होणे फार अवघड. अज्ञानात सुख, कल्पनेतील आनंद, भित्र्या मनाला आधार, अनिश्चितेतच समाधान शोधनाचा प्रयत्न होत गेला.
कोणता विचार येथे रुप धारण करीत आहे. जीवनाचे, निसर्गाचे एक महत्त्वाचे ध्येय, श्रेष्ठत्व स्थापणे, अस्तित्वाची जाणीव, हेच. त्यावर श्रद्धा, कालचा विचार, आज पूर्ण वेगळा असेल. अत्यंत विचित्र वाटणाऱ्या, केवळ कल्पना करता देखील न येणाऱ्या सर्व संकल्पना आज सत्यात उतरत आहेत. देव संकल्पना अशीच असावी. कदाचित आपणच देव असूत. देवांच्या सर्व कृती, त्यांच्यावर थोपविली गेलेली अनेक पुराणकथा, ह्या मानवाला साजेशीच असतात. फक्त अनेक चमत्कार दिव्यशक्ती धारणा, ह्या कदाचित आज दिसत नसतील. परंतु प्रगत मानव तेही अनेक मार्गाने साध्य करु लागलेला दिसतो. ज्ञान हे volatile प्रमाणे असते. ते लहरी मध्ये प्रचंड वेग क्षमतेत असते. अस्तित्व रचना इत्यादीमध्ये आमुलाग्र बदल धारण करण्याची शक्ती प्राप्त. मनापेक्षाही प्रचंड ताकदीचे. मन हे देह शरीर माध्यमाचाच आधारावर राहते. मनाला जगण्यासाठी आधार हा शरीराचा. परंतु ज्ञानाला कसलाच आधार लागत नसतो. ते कोठेही, कोणाकडेही केव्हाही जाते, उलथापालथ करणे, वेगळेच होते. कुठले ज्ञान , कुठेही जाणे व त्याच देहातील ऊर्जा शक्तीचा आधार घेत वेगळीच रचना निर्माण करते. ज्ञान हे मनापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ ठरते. माझे विचार, माझे ज्ञान हेच माझे मन म्हणतात. सत्य परंतु ज्ञान जेव्हा स्वतंत्र रुप धारण करते तेव्हा ते तुझे माझे कुणाचेच नसते. तेच तर मनावर देखील ताबा करते वा नष्ट करते.
७ ज्ञानाला तुमच्या शरिराची गरज नाही आणि मोह ही नाही. मनाला तशी गरज असते. म्हणूनच सर्वश्रेष्ठ ज्ञान. काही अंशी ते त्याला साध्य होत आहे. परंतु हे सारे आत्मघातकी ठरणारेच असेल. मानवाची वर्चस्वाची हाव मात्र वाढतच चाललेली आहे. त्याने अनेक क्लुप्त्या करुन आपण त्या निरगुण परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ होण्याचा आव आणला आहे. देवत्वाच्या कल्पना जर मानव प्रेरित असतील, तर त्या सर्व ज्ञान लहरी मधून उत्पन्न झालेल्या आहेत. ज्ञान हे मानवासाठी सदा अपूर्ण असलेले आहे. कारण हाच तर ज्ञानाचा मूळ गाभा आहे. त्यात फरक पडणे केव्हाही होणे नाही. मनावर ताबा करता येत नाही. कारण ही तेच आहे. ज्ञानाचे देखील तसेच नव्हे का. शिवाय मनाला माध्यम लागले. ज्ञानाला तर कोणतेच माध्यम लागत नाही. चांगल मनच चांगल्या ज्ञानाच्या सहकाऱ्यात राहू शकते. समाधान, शांततेचा तोच अंतीम उद्देश असेल.
मानव कोण आहे. ह्याचा विचार होताना, त्याच्या ज्ञानाचा विचार व्हावा, एका रानटी अवस्थेमधूनच तो प्रगत होत होत आजच्या आधूनिक जगातील प्रगतीचा कर्ता ठरला. जे कुणी विचार करु शकणार नाही. ज्या गोष्टीची फक्त वाच्यचा पौराणीक ग्रंथ संपदेत दिसून आली ते सारे काही हाच मानव आज आपल्या ज्ञान सामर्थ्याने करु पाहात आहे. पौराणिक ग्रंथामधील देवत्वाची कल्पना सामान्य मानव करु शकत नाही. ती दिव्य शक्ती ह्या देवदवतांना प्रदान केली होती. अर्थात त्यांच्याच ज्ञान सामार्थ्याने कित्येक तथाकथीत आश्चर्यकारक घटना होत गेल्या. त्यांची वर्णने ऐकून आम्ही अंचबित होऊ लागलो. कारण त्या गोष्टी मानव शक्तीच्या क्षमतेच्या खूपच भिन्न होत्या. मानव तशा गोष्टी केव्हाच करु शकणार नव्हता. देवत्वाचा मोठेपणा, ह्या त्याच्याच भव्यता दिव्यता ह्यात सामावलेला होत्या. मात्र हेच ज्ञान सागर वाढू लागाले. प्रसरण पावू लागले आणि मानवाच्या क्षमतेच्या दिशा खूप दूर दूर जाऊ लागल्या. काळ आणि वेळ ह्यांच्यावर त्याने बऱ्याच प्रमाणात विजय संपादन केला. देवत्वाच्या वर्णनामधल्या जवळ जवळ अनेक बाबी ह्या मानवाने हस्तगत करण्याचा सपाटा चालू केला. ह्याचवेळी देवत्वामधली उर्जाशक्ती व विवेश गुणधर्मावरही मानवी प्रभूत्व दिसू लागले. त्या क्षणी देवत्वाच्या काही संकल्पना लोप पाऊ लागल्या. त्या देवत्वामधून निघून जात आहेत, असा त्याचा अर्थ नव्हे तर त्या सर्व मानवात देखील असल्याची जाणीव होऊ लागली. एक संकल्पना अद्यापी जागृत आहे आणि तो म्हणजे प्रत्येक देवात दैवी शक्तींचे अस्तीत्व असते. ही समज ह्या शक्तीमात्र मानवाने सांघीक पद्धतीने आत्मसात केल्या आहेत. म्हणूनच ते ज्ञान प्रचंड प्रमाणात वाढत असलेले जाणवते. ते कुणा एका व्यक्तीकडून नव्हे. प्रत्येक व्यक्ती ही जरी सक्षम असली तरी त्याची वैयक्तीक चेतना निरनिराळ्या प्रातांत धाव घेवून व्यक्त होत असलेल्या ज्ञानाला वृद्धींगत करते. हे कुणा एका मुळे मात्र नाही. ह्या सर्व सांघीक प्रयत्नात आणि तथाकथीत ज्ञानाच्या निरनिराळ्या दालनांत होत असलेली प्रगती जाणवते. अनेक महान व्यक्ती अनेक प्रातांत अनेक विषयांत जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रगत होत आहेत.
८ ती आपली ज्ञान शक्ती व्यक्त करताना, वृद्धींगत करताना, दिसते. हे फक्त ज्ञानच करु जाणे, मनाला हे कितपत जमेल ह्याची शंका वाटते. कारण ते मन कोणत्यातरी वैयक्तीक देहामध्ये बंदीस्त असते व देहाला नाश होण्याचा शाप आहे. काळ वेळ ह्यांचे मिलन होताच देहधर्म नष्ट होतो. लहरी रुपी ज्ञान छलांग मारीत दुसऱ्या देहांत शिरते व चक्रमय गतीत जाते.
शेवटी पूर्वीचाच प्रश्न समोर येतो व त्याची सोडवणूक पण तशीच होते. हे सारे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीच. श्रेष्ठत्वात सत्ता, सत्तेत जीवन जगण्याचे मार्ग हे असतात आणि सारे कशासाठी तर “मी” ह्याच्या साठी
रानटी अवस्थेपासून “मी” चा जो उगम जाणवू लागला तो नैसर्गिक होता व केवळ चांगल्या अस्तित्वासाठी struggle for existence म्हणतात तसे
केव्हा केव्हा मनात विचार येतो की देवत्व कोठे, ह्याच जगांत नव्हे का? ज्याने स्थूलत्व व सूक्ष्मपणा ह्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी केला, नवीन सजीवता निर्माण केली, देह व देहातील अवयावर ताबा केला. ह्याला कोण म्हणावे, पूर्व काळातील देवत्वाच्या सर्व संकल्पना मानवात जर दिसून येत असतील, तर तोच देव असेल का?
ह्याच क्षणी म्हणजे देवाच्या कालसमयी दैत्याची पण संकल्पना होती.
केवळ चांगले व वाईट ह्या भावनांना उचलण्यासाठी देवाबरोबर दैत्याची संकल्पना रुढ केली गेली. आज देखील अनेक व्यक्तींचे आचरण हे दैत्याच्या संकल्पनेत जाते. हे सत्य आहे. म्हणून देव आणि देत्य ह्या दोन्हीही कल्पना आज मानवात दिसून येतात. येथेच स्वर्ग असतो. येथेच नर्क असतो म्हणतात. हे गुढ अर्थानी समजून घेतले पाहीजे. अंगीकारले पाहिजे. ह्यामुळे वैचारिक भरकटने, गैरसमज, गैरविश्वास व अंधश्रद्धा यावर पायबंद पडू शकेल. मानवाच्या ज्ञान प्रगतीमध्ये संस्कारीत, आदर्शवादी, भक्ती प्रेमभरीत, समानतायुक्त भावना अशा मुल्यांची नितांत गरज आहे. दैत्य वृत्तीला जाणून, सर्वांनीच देवत्व होण्याची आज जगाला नितांत गरज आहे. मानवाचा देव व्हावा हीच त्या परम् श्रेष्ठ परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

खेळत म्हातारपण

हसत खेळत म्हातारपण

जीवनातील अंतिम परंतु महान सत्य म्हणजेच “मृत्यू”. जो ह्या विश्वात आला तो एक दिवस जाणारच ह्यात तिळमात्र शंका नाही. ज्ञान असो वा विज्ञान आजपर्यंत तरी कुणीही मृत्यूच्या सत्यतेविषयी आक्षेप घेतला नाही. अथवा हे सिद्ध करु शकला नाही की जो आला आहे तो येथेच स्थिर आहे. वा मृत्यूच्या आहारी तो गेला नाही. हा एक मात्र खरं आहे की येण्या व जाण्यामधला काळ हा सर्वसाधारण सर्वांसाठी वेगळा वेगळा व अनिश्चित असल्याचे मात्र दिसून येते. ह्याच काळाला ‘जीवन रेखा’ हे नाव दिले गेले आहे.
परमेश्वर हा सर्व श्रेष्ठ कलाकार दयाळू, न्यायी, शक्तीमान इत्यादी असल्याचे आजपर्यंत मोठे संत महात्मे, विद्वा्न व सर्वसामान्यजण पण मानीत आले आहे. हे कुणी दुसरा म्हणतो म्हणून मी म्हणतो असा सर्वसामान्याचा भाव नसतो. हा अतिशय सत्यपणे थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला आलेला अनुभव असतो. मनुष्य नास्तिक असेल तर कोणती तरी ‘शक्ती’ वा निसर्ग, पंचमहाभूते म्हणल. व आस्तिक असेल तर त्या परमेश्वराला स्वत:च्या आंतरिक इच्छेप्रमाणे एखादे प्रचलीत नाव देईल. पण एक मात्र ‘सत्य’ आहे की त्या निसर्गाने प्रत्येक कलाकृती निर्माण करताना ‘आयुष्य रेखा’ मात्र त्या त्या कलाकृती प्रमाणे आखून दिलेल्या आहेत. त्याची ही देणगी अटळ व निश्चीत स्वरुपाची आहे. जसे कुत्रा ह्या प्राण्यासाठी १० वर्षे व अमीबा ह्या एक पेशीमय जीवासाठी कांही क्षण , तर मानवाच्या वाट्यास १००वर्षाचे आयुमान दिलेले आहे. ना जास्त ना कमी म्हणूनच ‘शतायुषी’ व्हा. हा वडीलधाऱ्याकडून आशीर्वाद दिला जातो. तेव्हा प्रत्येकाने आत्मविश्वासाने हे गृहीत धरले पाहिजे की त्याच्या वाट्याला १०० वर्षाचे आयुष्य लाभलेले आहे. तो एवढी वर्षे ह्या विश्वांत जगणारच आहे. हे झाले तर्कज्ञान, तत्त्वज्ञान. परंतु शतायुषी माणसे शोधून पण सापडत नाहीत. अगदी क्वचित आणि त्याच्याविषयी लगेच कौतुकास्पद मजकूर वृत्रपत्रांत येतात. कारण सर्व सामान्य अशा घटनेस निसर्गाचा चमत्कार वा परमेश्वराची विशेष कृपा ह्या सदरात नेवून सोडतात.
‘परिस्थीत’ ह्या शब्दाची व्याप्ती जेवढी मोठी करता येईल ती कारणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्याच्या त्याच्या ज्ञान क्षमतेप्रमाणे त्याची दिशापण बरीच वाढू शकते आणि जेव्हा ही क्षमता अपूरी पडते तेव्हा अस्तित्वात असलेल्या विज्ञानाची मर्यादा दिसून येते. केवळ समाधानाचा आसरा घेण्यासाठी मनूष्य म्हणतो “परमेश्वराची इच्छा” ह्याच परिस्थीतीचा विचार करावयाचा म्हणजे शरीरावर सदैव बाहेरुन व आतून बरेचसे घटक परिणाम करीत असतात. याच्याचमुळे शरीराची झीज होत राहते. दीर्घ आयुष्यला हेच घटक खीळ निर्माण करतात. मनुष्य शतायुषीची जीवन रेखा हलके हलके आखूड होते चाललेली जाणवतो.
२ शुद्ध हवा, चांगले व स्वच्छ पाणी, सकस आहार, योग्य असे तापमान, आद्रता इत्यादी काही बाह्य वातावरणाशी निगडीत असलेले घटक आहेत. ह्याचा पर्यावरणाशी संबंध आहे. वैज्ञानिक युगाच्या रगाड्यामध्ये वरील घटकांची चांगलेपणाची व्याख्याच बदलून गेली आहे. आजकाल शुद्ध हवा ही हिमालयाच्या परिसरांत देखील सर्व दृष्टीने चांगली असेल का हा एक प्रश्नच पडतो. शहरामधली हवा फार दुषीत व ज्यात प्राणवायूचे प्रमाण अतिशय कमी झालेले असते. खेड्यामध्ये देखील धुराळा, शेकोट्या, अस्वच्छता इत्यादीमुळे हवा दुषीतच असते. शुद्ध पाण्याविषयी तर विचारण्याची सोयच नाही. स्वच्छ पाण्यालाच मिळालेले सांडपाणी, गटारे इत्यादी. पाण्याचा साठ्या नजीकच वाढत जाणाऱ्या प्रचंड झोपडपट्ट्या आणि सारा अस्वच्छ परिसर पाण्याला स्वच्छपणापासून खूप दूर नेवून ठेवतो. जेव्हा नैसर्गिक स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही, तेव्हा त्यात औषधांची प्रक्रिया करुन ते सर्वांना मिळते व असे औषधीयुक्त पाणी पचविणे शरिराचे एक कर्तव्य बनून शरिरास अपायच करते.
सकस आहार तर आता इतिहास जमा होत आहे. चांगले खाद्य पदार्थ मिळतच नाही. भेसळयुक्त व अतिशय निकस असे मिळणारे धान्य, तेले, तुप इत्यादींवर जगणे भाग पडते. तेव्हा असल्या खाण्यामुळे शरिराची जी झीज होते, तीच आयुष्याची जीवन रेषा आखूड करण्यास कारणीभूत ठरते. निसर्गाचा समतोलपणा बऱ्याच अंशी विज्ञानांनी नष्ट केलेला आहे. निरनिराळे प्रयोग हे पर्यावरणाला असमतोल करतात आणि त्याचमुळे तापमान, आद्रता इत्यादींमध्ये सदैव बदल होत जातो. शेवटी त्याचा परिणाम शरिरावर होतो. थोडक्यात म्हणजे ह्या सर्व बाह्य घटकांची यादी बरीच मोठी करता येईल. हे सर्व आजकालच्या माणसाच्या शक्तीबाहेर होऊन गेले आहे. हा कवेळ सामाजिक वा राष्ट्रीयच प्रश्न न राहता सर्व जगातील ही समस्या बनत चालली आहे आणि त्याला झगडा देणे हे केवळ अशक्य आहे. परिणाम फक्त एक “आयुष्य कमी करणारी कारणे”
शरीराच्या आतून हल्ले कऱणारे घटक हे तर माणसाच्या आवाक्याबाहेरचीच बाब आहे. उदा. रक्तामधले गुणधर्म, जेनेटीक कॅरेक्टरीस्टक्स ( Genetic Characteristic ) इत्यादी हे सारे रक्ताच्या समजल्या जाणाऱ्या गुणधर्मामुळे कौटुंबीक (Family) बनतात. कुणाचे आई – वडील, आजा आजी, पंजा-पंजी इत्यादीच्या रक्तामधून येणारा विकार, हा तुमच्या पर्यंत येतो व तुमच्या शरीरावर आघात करतो. तुम्ही अशा स्थितीत काहीच करु शकत नाहीत. परिणामी तुमच्या आयुष्याची रेषा आखूड करण्यासाठी हे सारे कारणीभूत होतात.हे सारं बघीतल्यावर असे वाटू लागते की प्रत्येकजण आपल्यापरी, जीवन रेखा मर्यादीत करण्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत झालेला आहे. ज्या घटणाचे त्याला अवलोकन होत नाही. त्याबद्दल तो नशीबाला वा परमेश्वराला बोल लावतो ते केवळ समाधानासाठीच.
अकाली, अकस्मित आणि अनैसर्गिक मृत्यू सोडल्यास प्रत्येकाच्या जीवनरेखेवर वृधत्वाचा एक अखेरचा टप्पा असतोच. मृत्यू हे एक अंतीम सत्य समजले गेले. त्याला
३ आनंदाने व हासत सामोरे जाण्यासाठीच ह्या वृध्वत्वकाळाची जाण सर्वांनी करुन घ्यावयास हवी. कित्येक कारणांनी वृधत्वाचा काळ प्रत्येकाला क्लेशदायक व निराशा निर्माण करणारा वाटतो. परंतू जर कुणी योजनाबद्ध जीवन आखण्याचा प्रयत्न केला तर वृधत्व हा भार न वाटता सुसह्य वाटेल. बालपण, तारुण्य, पौढत्व हे पहिले तीन टप्पे निसर्गाने जीवनांत काहीतरी निर्माण करण्यासाठी, कमविण्यासाठीच दिले आहे. मग तो विकास शारिरीक, वैचारिक, आत्मिक, शैक्षणिक, आर्थिक वा आणखी इतर कारणासाठी असो. ह्या ज्याचा त्याचा वैयक्तीक विचार असेल. परंतू शेवटी समाधानाची पायरी चढताना वैयक्तीक, कौटूंबीक, सामाजिक किंवा राष्ट्रीय थरापर्यंत जाण्याचा प्रत्येकजण विचार करीतच असतो. अतिशय उच्च कोटीला गेलेली मंडळीच फक्त ह्या जगाचा आणि सर्व विश्वाचा अतिशय उज्वलतेमधून विचार करतात. जे कांही साध्य करावयाचे असेल, त्यांच्यासाठीच जीवनातील पहीले तीन टप्पे आहेत. आपण जे कमविले वा गमविले त्याचे विश्लेषण करणे. दुसऱ्यांच्या जीवनातील यश –अपयशाचा अभ्यास करणे. सर्व आठवणी आणि अनुभवांचे तुमच्यामागून येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शन करण्यात आनंद प्राप्त करण्याचा काळ, म्हणजेच वृधत्वाचा काळ आहे. परमार्थ ज्ञान, ईश्वरी चिंतन व मनाच्या शांतीसाठी सदैव व्यस्त राहण्याचे कसब बाळगणे वा निर्माण करणे हाच हा काळ चांगल्यारितीने व्यतीत करण्याचा एकमेव मार्ग.
काळ हा अतिशय वेगाने पुढे जात आहे. तो तितक्याच वेगाने बदलत आहे. ज्यांना ह्या वेगाची जाणीव त्वरीत येते ते आपली परिस्थीती चटकन बदलून आलेल्या नवीन विचारांशी जास्तीत जात सहमत होण्याचा प्रयत्न करतात. अशांनाच हा वृध्वत्वाचा काळ सुसह्य होतो. कांही मंडळी बदलत्याकाळाप्रमाणे वहात जाण्यापेक्षा, आपलाच विचार वा परंपरागत गोष्टी इतरांवर लादू पाहतात. त्यांना शेवटी निराशेलाच तोंड द्यावे लागते. वृध व्यक्तीने “ आपण मावळते सुर्य असून आपल्या मागची पिढी हे उगवणारे सुर्य आहेत ह्याची सदैव जाण ठेवावी ” . मार्गदर्शन म्हणजे अट्टाहास नव्हे. अनुभवाची शिदोरी म्हणजे तुम्हाला आलेले काही अनुभव. इतरांना अगदीचे तसेच अनुभव येतील असे मुळीच नाही. फक्त “ सांभाळून राहा, विचारांतीच निर्णय घेत जा ” अशाप्रकारचे मार्गदर्शनपर वक्तव्य त्यांनी करुन फक्त मागुन येण्याऱ्याला मार्ग दाखवावे इतकेच.
वृधांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या तीन मुख्य समस्या आहेत. शारिरीक, मानसीक आणि आर्थिक. ह्याच्याच अनुषंगाने विचार होऊन वृधत्वाचा काळ हा कसा सुखकर होऊ शकतो हे बघावे लागेल. शारिरीक समस्या :- माणसाच शरीर हे एक अतिशय उकृष्ट नमुन्याचे ‘यंत्र’ आहे आणि जर आपण शरिराकडे ते केवळ एक यंत्र ‘मशीन’ आहे. ह्या दृष्टीकोणातूनच बघीतले तर आपले कितीतरी प्रश्न उकळून जावू शकतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाला वाटणारी काळजी ही देखील बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल.
४ आता प्रथम कोणत्यातरी एखाद्या मशीनविषयी थोडेसे समजून घेवू या. उदाहरणात ‘स्कूटर’ अतिशय उपयुक्त. एक ठरावीक प्रकारचे कार्य याच्यांकडून घेतले जाते. त्याच्या मशीनमध्ये निरनिराळे भाग असून सर्व भागांचे एकमेकांशी सहकार्य व पूरक कार्य असून त्याचा परिणाम म्हणून स्कूटर चालविली जाऊ शकते. प्रत्येक स्वतंत्र भागाचा एकमेकांशी अशा रितीने संबंध असतो की त्या भागात जर काही बिघाड झाला तर त्याच्या विशीष्ट कार्यात बिघाड होतो व जर तो भाग फार महत्त्वाचा असेल तर पूर्ण मशीन काम करणे थांबते. शरीराचे देखील असेच आहे. त्याच्यात देखील बरेच भाग ज्याला अवयव म्हणतात. ते असतात निरनिराळ्या अवयवाचे निरनिराळे कार्य असते आणि त्याचप्रमाणे त्यांचे एकमेकांशी सहकार्य वा पूरक कार्य असते. जसे हाताने वस्तू तोंडात जाते, दातांनी तिचे बारीक तुकडे होतात व पोटांत सोडले जाते. पुढे त्याच वस्तूवर निरनिराळ्या अवयवामध्ये निरनिराळ्या क्रिया होऊन, त्यामधली असलेली शक्ती काढून घेणे व आपल्या शरीराला त्याचा उपयोग करुन घेणे, ही थोडक्यात होणारी घटना. ह्या प्रक्रीयेमध्ये जर का कोठेही अडथळा निर्माण झाला, तर त्याचा परिणाम त्या त्या प्रमाणात संपूर्ण शरीरावर होतो.
स्कूटरमध्ये देखील ऑईल आणि करंट मिळणे ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रीया आहेत. त्याविणा दुचाकी चालूच शकणार नाही. परंतू स्कूटरचे सीट, लाईटस् एवढेच काय ब्रेक्स इत्यादी भाग हे वाहनाची अत्यंत सोय निर्माण करणारे, परंतू काही कारणाने त्यात बिघाड झाला तर वाहन चालू तर शकते. फक्त गैरसोय मान्य करुन. यांत हात, पाय, डोळे, कान, दात इत्यादी अवयव म्हटल्यास अशाच यादीमध्ये जावू शकतात. शरिराला त्याच्या व्यवस्थीत कार्य पद्धतीमध्ये अशा अवयवाचा सहभाग असतो, परंतू त्यांच्या शिवाय देखील माणसाला आपले आयुष्य व्यवस्थीत जगता येते. म्हणूनच आंधळे, बहीरे, लंगडे इत्यादी बरीच अभागी माणसे देखील त्यांचे व्यंग बाजूला ठेवून जीवनाच्या इतर सर्व बाबींमध्ये रस घेताना, आनंद घेताना दिसतात. दुर्दैवाने कांही वेळा शरीरात व्याधी निर्माण होतात. त्यावेळी एखाद्या कार्यांत होणाऱ्या बिघाडाविषयी केवळ खंत करीत बसू नका. त्या वेगळ्या परिस्थितीत जीवन कसे सुसह्य बनविता येईल हे बघा. मधूमेह झाला व त्यासाठी डॉक्टरांनी साखर वर्ज केली अथवा रक्त दाब म्हणून मीठ सोडण्याचा जर सल्ला दिला. हे सल्ले शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टीने योग्य असतील. ते केवळ मान्य करुनच नव्हे तर अशा सूचनांना मनांत एवढे पक्के केले पाहिजे की ते तुमच्या जीवनांचे एक अंगच बनले पाहिजे. त्या गैरसोयीच्या अनुषंगाने जीवन व्यथीत करण्याचा निश्चयी प्रयत्न करा.
कोणतेही मशीन पाहीजे तर तेच उहाहरण सोईसाठी घेतो. स्कूटर ह्या पूष्कळशा कंपनीच्या आहेत. काहींना आपण चांगले मशीन म्हणतो ते मुख्यत्वेकरुन ते जास्त काळासाठी व्यवस्थीत कार्यान्वीत राहते म्हणून आणि त्यात बिघाड कमी प्रमाणात होत असतो. परंतू एक मात्र सत्य आहे की कितीही चांगले यंत्र असले तरी ठरावीक काळानंतर त्याचे कार्य कमी ५ कमी होत जाते व ते शेवटी निकामी बनते. आपले शरीर पण त्याच्या निगा राखण्यावर अवलंबून राहते व ठरविक काळानंतर ते पण जर जर होऊन निकामी होते. ज्याप्रमाणे मशीनच्या कार्यशक्तीच्या आपण नेहमी आढावा घेत जातो व त्याची ठराविक काळासाठी जर आपली गरज भागविली तर त्याच्या निकामी होण्याच्या कालक्रमणेमध्ये आपण त्याविषयी खंत बाळगीत नाही. माणसाने शरीराबद्दल देखील हीच भावना बाळगली पाहिजे व वयाप्रमाणे जेव्हा शरिर क्षीण, अशक्त वा कार्यहीन होऊ लागते, त्यावेळी त्याच्या बद्दल खंत बाळगता कामा नये. म्हणजेच जो वृधत्वाचा काळ आहे त्यामध्ये शरिर यंत्र नादुरुस्त होते, क्षीण होणे वा अवयवांचे सहकार्य न राहणे ही एक अपरिहार्य व निश्चीत होणारी घटना आहे व तीची जाणीव प्रत्येकाने मनामध्ये अतिशय खोलवर रुजवावयास हवी. तेव्हाच शरीराबद्दल निराशा न वाटता त्याच्या विकलांगपणाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करण्याची मानसिक तयारी केली गेली पाहिजे.
मशीनच्या ना दुरुस्त होण्याचे पण सर्व साधारण काही ठओकताळे दिसून येतात. ते थोडेसे विचार करण्याजोगे आहेत. उदा. स्कूटरचे ब्रेक्स,ल्पग पॉईंट, ऑईल सील, गीअर्स, एक्सेलरेटर इत्यांदीमध्ये सरासरीने जास्त बिघाड होतो. कारण स्पष्ट आहे की ह्या भागावर सतत आघांत होत असतात. त्याचप्रमाणे माणसाच्या शरिरामध्ये सांध्याचे दुखणे त्यातल्या त्यात गुढगा व ढोपर? पाठीचा कणा, संधी वात, पोटाचे विकार, अपचन, गॅस ट्रबल, पोट दुखी constipation, ….loose frequent motions ………… इत्यादी. छातीमध्ये खोकला, थरथर कापणे, निद्रा नाश, लघवी सारखी होणे, लघवी करताना वेळ लागणे, कमी ऐकू येणे, कमी दिसणे, विसराळूपणा, दमा, अशक्तपणा, रक्तदाब आणि मधूमेह इत्यादी इत्यादी. खरे म्हणजे म्हातारपणात कोणत्याही व्याधीने त्रास होण्याची शक्यता असते. मी बऱ्याच वृध्व मंडळींना बघीतले, तपासले परंतू काही गोष्टी मनास खटकतात त्या येथे सांगतो उदा. एक वृध्द गृहस्थांना सांधे दुखण्याचा त्रास होता. त्याच्या सर्व चाचण्या व तपासणी होऊन दोन, तीन मोठमोठाले orthopedic surgeon चे वेगवेगळे घेतलेले मत आणि टिपणी बघीतली. सर्वांच्या मते त्यांना कोणता रोग जडलेला नाही. कोणतीही व्याधी जडलेली नाही. कि ज्याला औषधपाणी देवून बरे करता येईल. सर्वानुमते ठराविक वय झाल्यानंतर सांध्याचे अशा प्रकारचे दुखणे सुरु होते. सांध्याच्या हाडांमधील मऊपणा कमी होतो. सांध्याला वाकविणारे व जागेवर ठेवणारे स्नायू आणि लिगामेंटस अशक्त व कमकुवत होतात आणि परिणामी सांधा सारखा दुखू लागतो. ह्या व्याधीवर संपूर्ण बरे करणारा उपाय नाही. जे काही औषध दिले जाते ते तात्पुरते व व्याधीची तीव्रता फक्त कमी करणारे . परंतु दुर्दैवाने बहुतांशी वृद्ध माणसे हे सर्व समजून देखील मान्य करण्यास तयार नसतात. त्याची अशी कल्पना झालेली असते की हा रोग त्यांना जडला असून त्याचे निदान त्या डॉक्टरांना झालेले नसावे व परिणामी ते निरनिराळ्या तज्ञाच्या भेटी घेत फिरतात.
6 औषधामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या बदलामुळे थोडासा दिलासा मिळतो, परंतु परत येरे माझ्या मागल्या म्हणत, त्याच व्याधीनाच सहन रकीत बसाव लागते. माणसाची आशा वेडी असते व ती त्या व्याधीच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असते. पण शेवटी निराशाच पदरी येणार हे अटळ असते आणि नेमके हेच ह्या गृहस्थांचे झाले. सांधेदुखी ही त्यांच्या म्हातारवयांत ही त्यांना नेहमीसाठी त्यांच्या उर्वरीत आयुष्यापर्यंत ताप देणारीच ठरणार होती व ठरली.
असेच दुसऱ्या वृधांच्या बाबतीत घडते. ज्यांना अपचन, गॅस ट्रबलचा त्रास होतो. खाल्लेले पचन करण्यासाठी पोटाच्या आतड्यामध्ये जे रस तयार होत असतात ते वयाप्रमाणे कमी कमी होत जातात. तसेच आतड्यांच्या हालचाली पण मंदावतात आणि परिणामी पोटांत घातलेले अन्न पचण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. ह्याचा शेवट म्हणजे अपचनाचा त्रास होत राहतो. हा पण काही रोग नव्हे. परंतु जी क्रिया पूर्वी तारुण्यात अतिशय वेगाने व व्यवस्थीत चालत होती ते सारे कमी होताना माणूस जाणवतो. वाटेल ते आणि वाटेल त्या
प्रकारचे घेतलेले अन्न काहीही तक्रार न होता जे पचन होत असे ते आता अगदी साधे अन्न मऊभात, दुध, ताक इत्यादी पचवताना देखील कठीण होऊ लागते आणि परिणामी वृद्ध लोक डॉक्टरांच्या दवाखाण्याच्या चकरा मारतात. वृध्दांना जो शारिरीक त्रास होत असतो तो त्यांनी सहन करा असे मी सुचवू इच्छित नाही. परंतु त्या त्रासाकडे बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर मात्र त्या व्याधी बऱ्याच अंशी सुसह्य होतील. तेव्हा वरिल दिलेल्या दोन उदाहरणावरुन प्रथम हे निश्चित करुन मनांत पक्के ठसवून घ्या की तुम्हाला झालेला व होत असलेला त्रास हा एखाद्या रोगामुळे नसून उतारवयामुळे आहे. ती पण एक नैसर्गिक प्रक्रियेची परिणीती आहे. कोणत्या रोगाची नव्हे म्हणजे मानसिक खंत वाटणार नाही. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट नैसर्गिक समजतो तेव्हा ती आपण सुसह्य करुन घेतो. “वृद्धत्वपणा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या सर्व समस्या ह्यादेखील नैसर्गिक स्वरुपाच्या समजा.”
श्री. शिरोडकर यांना माझ्याकडे ड्रेसींग करण्यासाठी आणले होते. त्यांना हाताला फ्रॅकचर झाले होते त्याला प्लास्टर (Plaster) केले होते. डोक्याला लागलेल्या जखमेला मलमपट्टी करण्यासाठी त्यांना आणले होते. बोलताना तेच म्हणाले, “डॉक्टर माझ वय ८० च्या जवळ आलं आहे हे तुम्हाला खरं वाटेल? पण आजही माझी प्रकृती कशी एकदम तंदुरुस्त आहे बघा. परवा मुलीकडे जाण्यासाठी म्हणून चालती बस पकडण्याचा प्रयत्न केला व तोल जावून पडलो आणि हाताचे हाड मोडले, काय गंमत आहे बघा. मी एके काळचा राष्ट्रीय Heavy weight lifting champion आणि थोड्याशा माराने हाड मोडले”
7 माणसांनी आपल्या पूर्व जीवनांत केलेल्या कर्तृत्वाबद्दल निश्चितच अभिमान बाळगावा. हे कुणीही मान्य करेल, परंतु कित्येकजण त्याच उत्साहाने नेहमीच जगण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे आहे. आठवणी ताज्या ठेवणे वेगळे आणि बदलत्या परिस्थितीची जाण, पण त्यापाई विसरुन जाणे हे अयोग्य आहे. शरीर आणि मन हे दोन भिन्न आहेत. काळाच्या ओघामध्ये शरीर हे सतत बदलत जावून अशक्त होत राहते. परंतू मन मात्र नेहमीच तजेले, तरुण किंवा बालरुपी देखील होऊ शकते. मनाचा उत्साह हा सतत कायम राहू शकतो. म्हाताऱ्या माणसाला पण चॉकलेट, बिस्कीट, भजी इत्यादी खावे वाटते. त्याला पण खाण्याची तितकीच तीव्र इच्छा होते. जेवढी लहान मुलाला वा तरुणाला परंतु त्याच्या शरिरात झालेला बदल, आतड्यामध्ये आलेला अशक्तपणा हे असते. रुचकर पदार्थ पचविण्यास असमर्थ असतात आणि जर ह्याची जाण वृद्धाने न ठेवता तरुणाप्रमाणे खाण्याचा वेडेपणा केला तर त्या बळजबरीने पोटात कोंबलेल्या अन्नाचा शरीर स्वीकार करीत नाही व त्याचे अपचनाचे परिणाम त्या वृद्धाला भोगावे लागतात. त्याचप्रमाणे शरीराचे हात, पाय इत्यादी अवयव मजबूत असताना तुम्ही केलेली धावाधाव, उचलेल्या जड वस्तू किंवा उंचावर जाण्याचे केलेले विक्रम इत्यादी हालचाली काळाप्रमाणे तुमचा फक्त इतीहास म्हणून राहतात. उतारवयातही त्याच उत्साहाने हालचाली कराव्यात असे केव्हा केव्हा वाटते. कारण ‘मन’, मन हे तसेच उत्साही असते. परंतु त्याला बळीपडून शरीराची बदललेली क्षमता विसरुन जर तुम्ही पावल उचलाल तर त्याचे विपरीत परिणाम निश्चितच होतील. श्री. शिरोडकरांची धावपळ करुन बस पकडण्याची इच्छा व त्या इच्छेला शरीराने न दिलेली साथ हेच त्यांचा तोल जावून पडण्याचे व मार लागण्याचे कारण आहे. तेव्हा प्रत्येक वृद्ध व्यक्तीने आपल्या शरिरातील झालेल्या बदलाची व आज असलेल्या क्षमतेची निश्चित जाणीव ठेवावी व त्याचप्रमाणे आपल्या सर्व हालचाली अतिशय शिस्तित आणि काळजीपूर्वक कराव्यात. जेव्हा वय खूपच पुढे जाते तेव्हा तर अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी खूप मोठा शारिरीक आघात करु शकतात. उदा. झोपेमध्ये एकदम कुशी बदलणे, मोठ्याने खोकणे वा शिंकणे हे सुद्धा हाडांचे फ्रॅक्चर होण्यास कारणीभूत होऊ शकतात. तुमच्या हालचालीतील तिव्रता आणि त्याचा होणारा परिणाम ह्याचा संबंध खूपच जवळ जवळ येवू लागतो. साधी वाटणारी गोष्ट भयानक होऊ शकते. “न पचणारे चमचाभर खाद्य पदार्थ उतारवयात तुम्हास हैराणा करु शकतात” “थोडक्यात माणसांनी आपल्या पूर्व जीवनाच्या कर्तृत्वाला आठवून, विसंबून, सद्यस्थितीचा विचार न करता केलेली हीम्मत त्याच्या शरिराला हानी पोहचवू शकते. भूतकाळामधाली प्रकृती विसरत चला व फक्त वर्तमान काळाचा विचार करा”
काळ हा अतिशय वेगाने बदलत आहे, समाजाची धारणा व ठेवण बदलत चालली आहे आणि विशेष म्हणजे ‘कौटुंबीक रचना’ ही पूर्णपणे बदलू पहात आहे. कुटूंबामधल्या व्यक्ती व्यक्तीमध्ये जे संबंध होते, जी बंधने होती, जी कर्तृत्व होती जो आदर व प्रेम होते त्यामध्ये आमुलाग्र बदल होऊ पाहत आहे. त्या सर्व बदलू पाहणाऱ्या गोष्टींना तशी सामाजीक 8 कारणे असतील व आहेतच. परंतु ह्या ठिकाणी मी फक्त जे होत आहे त्याचा वृद्ध व्यक्तीशी होणाऱ्या परिणामाचा विचार करु इच्छितो. पूर्वी घरांत ‘आजोबा’ असणे हा अतिशय कौतूक व अभिमानाचा विषय असे. आज ते चित्र बदलत हे. आज प्रत्येक गोष्टीचे मोजमाप होत असते. ‘कुणाचा किती उपयोग हेच सूत्र लावले जाते.’ कुणाचा एके काळी किती उपयोग झाला, कुणामुळे कोण जीवनांमध्ये भरभरक्कम पायावर उभा आहे, आयुष्य बनन्यासाठी कुणाचा किती उपयोग झाला इत्यादी बरेच प्रश्न ज्यांचे स्वरुप ‘भूतकाळ’ ह्या सदरात मोडते त्यांचा विचार करण्याची कुणालाही जरुरी वाटत नाही. आज प्रत्येकाला हवा आहे ‘वर्तमान काळ’. भूतकाळाशी त्याची सांगड घालण्याचे कुणालाही प्रयोजन वाटत नाही आणि भविष्यकाळावरचा तर त्याचा विश्वासच उडाला आहे. वृद्ध हे मावळते सूर्य असून नवीन पिढी ही उगवत्या सूर्याप्रमाणे आहे आणि म्हणूनच वृद्ध लोकांनी प्रथम ह्या बदलांची जाणीव करुन घेतली पाहिजे. चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे आणि हे अधिकारांचे चक्र सदैव फिरत राहते. परंतु ह्या दोन्ही म्हणीमध्ये दोन गोष्टींची समज अतिशय पद्धतशीर दिली गेली आहे. एक म्हणजे अधीकार हा प्रत्येकाला मिळणार व दुसरे म्हणजे त्याला मिळालेल्या अधीकाराच्या मर्यादेचा काळ हा देखील ठराविकच असणार. हे महान तत्व आहे. परंतु संघर्ष तेव्हा होतो जेव्हा मनुष्य हा त्या काळाच्या मर्यादा विसरतो (Time Limit) आणि आपल्या शक्ती युक्तीने जास्त काळपर्यंत आपल्या अधिकाराच्या कक्षा वाढविण्याचा प्रयत्न करतो. नव्या पिढीचा मागून येणाऱ्या व्यक्तींचा येथेच वैचारिक खटका उडण्याची शक्यता होते. शेवटी परिणाम हे वृद्धालाच भोगावे लागतात. म्हणून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगावी वाटते की प्रत्येत वृद्ध व्यक्तीने हे पूर्ण जाणून घ्यावे आणि मान्य करीत मनावर बिंबवावे की “मला नशीबाने मिळालेला कर्तृत्वाचा आणि अधिकाराचा काळ हा आता संपला आहे.” तुम्हाला जे मिळाल ते तुम्ही तुमच्या शक्ती, बुद्धीनुसार उपभोगाल, किती योग्य मिळवल किती गमावल ह्याचाच आता ताळेबंद करण्याच तुमच्या हाती उरत. तुमच्या उतार वयाप्रमाणे त्यात आता खूपसा फरक होणार नाही. तेव्हा आपल उर्वरित आयुष्य मर्यादीत करुन जगणं हेच आता बाकी राहते. तुम्ही काही काळ अधीपत्य केलं आता इतरांना संधी घ्या.
जीवनाच्या प्रत्येक दिवसाचे जर विश्लेषन केले तर असे दिसून येते की, प्रत्यक दिवस हा आपल्यापरिने अगदीच वेगळा असतो. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या अगदी भिन्न असतात. आपण जर आपलेच जीवन बघीतले तर ते कितीतरी वेगवेगळ्या अनुभवाने भरलेले दिसून येते. मला काल आलेला अनुभवाचा उपयोग आजच्या अनुभवाला होईलच हे सांगता येत नाही. किंबहुना प्रत्येक अनुभव नवीनच काहीतरी शिकवून जातो. अर्थात पूर्वीच्या अनुभवाने माणूस थोडासा दक्ष होऊ शकतो एवढेच. परंतु माझा पूर्वीचा अनुभव मला नविन वातावरणात यश देईल याची खात्री सांगता येत नाही. आणि विशेषत: जेव्हा सभोवतालची परिस्थिती अतिशय वेगाने जर बदलत चालली असेल. तर मग पूर्वीच्या अनुभवाला
9 निश्चितच मर्यादा पडतात. हा एक विचार आहे आणि ते एक सत्य आहे. म्हातारी माणसे ही अनुभव संपन्न असतात. त्यांच्या दीर्घ आयुष्यामध्ये त्यांना नानातऱ्हेचे अनुभव आलेले असतात आणि जीवनातील यश अपयश त्यांनी स्वत: जाणले असतात. त्यांना त्यांच्या मागून येणाऱ्या पिढी बद्दल प्रेम व आदर असतो आणि म्हणून त्यांना जे वाईट अनुभव आलेले असतात त्याचा आधार घेवून ते तरुणांना उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. तसे म्हटले तर हा प्रयत्न स्तुत्य आहे. परंतु मी वर सांगितल्याप्रमाणे ह्या वृद्धाला आलेला अनुभव त्याच्या मुलाला तसाच येईल ह्याची शक्यता सांगता येत नाही. कदाचित काही वेगळे व चांगले पण उत्पन्न होऊ शकते. म्हाताऱ्या माणसांनी एखादवेळी मार्गदर्शन करणे, क्वचित प्रसंगी सूचना देणे निराळे परंतु दिसून मात्र असे येते की म्हातारी माणसे आपल्या अनुभवाचा आणि वयाचा अधिकार सुप्तरितीने जागवून तरुण वर्गाला प्रत्येक बाबतीत उपदेश वा सल्ला देण्याचा प्रयत्न करतात आणि ते तरुण व वृद्ध ह्या दोघांसाठी अयोग्य आहे. ह्या त्यांच्या वागण्याने दोघांत एक प्रकारची दरी निर्माण होते. आणि वैचारिक संघर्ष निर्माण होतो. जर वास्तविकत: मी म्हटल्या प्रमाणे तुमचाच पूर्वीचा अनुभव तुम्हालाच पुढच्या आयुष्यात फार मदत करित नाही तर तुमच्या आणि केवळ स्वत:ला आलेल्या एखाद्या परिस्थीतीमधील
अनुभवावरुन तुमच्या मागे येणाऱ्यावर वैचारिक बंधने कशासाठी शिवाय काळ किती झपाट्याने बदलतो याची दखल तुम्हास घ्यावीच लागेल.तुमच्या अनुभवाचा सल्ला तुम्हाला जर विचारलेच तर घ्या. विनाकारण आणि सदैव उपदेशाचे ढोस इतरांना पाजू नका. क्वचित प्रसंगी “काळजी घेत जा सांभाळून रहा इत्यादी प्रेमाने सांगा तुमचा आदर राहील. तुमच्याविषयी काय ह्यांची कटकट” ही भावना राहणार नाही.
वृद्धकाळामध्ये होणारे शारिरीक त्रास हे प्रत्येकाचे निरनिराळे असू शकतात. कुणाला दम्याचा त्रास, कुणाला अपचनाचे विकार, कुणास चढउतार करताना सांधे दुखणे, चक्कर येणे इत्यादी इत्यादी आणि त्यांच्या ह्या विकारांनी त्यांना एकप्रकारे जायबंदी केले जाते. त्यांच्या शारिरीक हालचालींना मर्यादा पडतात. प्रत्येक म्हाताऱ्या माणसांनी आपल्यामध्ये निर्माण होत असलेला विकार चांगल्या तऱ्हेने जाणून घ्यावा. जेवढा प्रयत्न करुन तो कमी करण्याचा मार्ग सुरवातीस केला जातो. पण नंतर औषध पाण्याच्या मर्यादा संपतात. एकदा त्या विकाराबद्दल निश्चीत विश्लेषण झाले की नंतर तो तुमचा एक मित्रच आहे हे मानावयास हवे आणि त्या त्या विकाराप्रमाणे जीवन जगण्याचे अगदी वैयक्तीक तंत्र निर्माण करावे. त्याच्या अनुषंगाने मार्ग आखावा. उदा. तुम्हाला दम्याचा विकार आहे. सर्व डॉक्टर सांगतात की हा त्रास पित्तामुळे (Allergic in nature) होतो आणि तुमच्या शरीराला नको असलेल्या वस्तूंचा संपर्क आला तर तुमच्यामध्ये ह्या विकाराचे लक्षण सुरु होतात वस्तू ह्या असंख्य आहेत परंतु त्यातील एखाद दुसरी वस्तूच तुमच्या शरीराला सहन न होणारी असू शकेल आणि ती नेमकी कोणती असेल ही शोधून काढणे अत्यंत कठीण काम आहे. परंतु नेमक प्रत्येक दम्याच्या
10 रुग्णाबद्दल घडत ते वेगळच आणि ह्यात रोग्याचा जेवढा सहभाग असतो ह्यापेक्षा डॉक्टरांचे ठराविक पद्धतीचे मार्ग दर्शन हेही कारणीभूत होत असते. काही पदार्थ हे पित्त (Allergy) करण्यास कारणीभूत असतात आणि त्याची एक यादी डॉक्टराकडून रुग्णास मिळते. हे सेवन करु नका, हे वापरु नका, हे टाळा, ते करा अशी एक मोठीच यादी डॉक्टर लोक ठराविक ठशाने त्याला देतात. रुग्ण हे सारे इमानइतबारे मान्य करुन खाण्यापिण्यामधल्या बऱ्याच गोष्टी वर्ज करतो वा इतर गोष्टींचा संपर्क टाळतो. त्यात आणखी भर पडते. ती त्याच्या मित्र मंडळींची जो तो आपला स्वतंत्र अनुभव सांगून ‘मी हे टाळले मी हे वर्ज केले तेव्हा मला आता बरे वाटते’ हे विविध लोकांचे सल्ले ह्या वृद्ध दमेकरी व्यक्तीच्या मनावर परिणाम करीत असतात. त्याला सर्व प्रथम त्याच्या स्वत:च्या त्रासातून सूटका हवी असते. आणि तो सर्वाचे थोडेफार मान्य करतो. परिणामी त्याच्यावरच्या बंधनाची यादी बरीच मोठी होऊन तो आपल्या खाण्यापिण्याच्या व इतर वस्तूसंपर्कांना बरीच मोठी मर्यादा घालतो. असे मी बरेच रोगी बघीतले आहेत. पण आश्चर्यांची गोष्ट म्हणजे आख्या शारिरीक त्रासामध्ये थोडासा देखील फरक झालेला नसतो. तसेच डॉक्टरांच्या विविध चाचण्या घेण्याचे प्रकार दोन तीनशे लशींची चाचणी होऊन खरे म्हणजे हाती काही लागत नाही. वेळ व पैसा मात्र वाया जातो.
ह्या साऱ्या ‘रामायणा’ मध्ये फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुम्ही वृद्ध आहात व तुमची प्रतिकार शक्ती ही मर्यादेमध्ये राहीली आहे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला दम्याचा (पित्ताचा, Allergic in nature) जो विकार आहे तो मी वर सांगीतल्याप्रमाणे एखाद्या विशीष्ट वस्तूमुळेच जास्त नाही. परंतु लोक सांगतात, मी दुध घेत नाही, अंडी खात नाही, केळी खात नाही, दही नाही, थंड वस्तू नाही, हे नाही ते नाही इत्यादी. हे सर्वस्वी चुकीचे आहे. जर रुग्णाला स्वत: निश्चित अनुभवले की एखाद्या ठराविक वस्तूमुळेच त्याला त्रास झाला वा होतो तर तेवढीच गोष्ट वर्ज करणे तत्त्वाला धरुन आहे. पण केवळ कल्पनने वस्तू विनाकारण वर्ज करणे एकदम चुकीचे आहे. थोडक्यात तुमच्या शरीराला जे भावते, पचते, सहन होते. ह्या विषयी तुम्हालाच तुमचे वैद्य बनून बारकाईने स्वत:हाच्या शरिराबद्दल अभ्यासपूर्वक रुपरेखा आखावी लागेल. मर्यादीत व पद्धतशीर जीवन जगण्याचे तंत्र ठरवावे लागेल.
श्री. देशपांडे माझे कौटुंबीक रुग्ण. एकदा त्यांचे नवे घर बघण्याची संधी मिळाली. बरेच दिवसापासून घरी या असे त्यांचे आमंत्रण होतेच. परंतु काहीना काही कारणांमुळे जाणे झाले नाही. अचानक एकदा त्यांच्याच सोसायटीमध्ये एका रुग्णास बघण्यासाठी गेलो. तेव्हा त्याचवेळी श्री. देशपांडे यांच्याकडे गेलो. दरवाज्यावर ए छोटीशी पाटी होती ‘स.गो. देशपांडे’ बेल वाजविताच थोड्यावेळाने स्वत: देशपांडे आले व त्यांनी दार उघडले. अतीशय प्रेमाणे व अगत्याने माझे स्वागत केले गेल. घरात त्यावेळी ते व त्यांच्या सौ. दोघच होते.
11 एक दिड तास गप्पा मारण्यात वेळ मजेत गेला. अतिशय मन मोकळेपणाने ते मज बरोबर बोलत होते. त्यांनी आपल्या जीवनातील काही गोष्टी इतक्या व्यवस्थीत सांगितल्या की त्यावर मी बराच काळपर्यंत नंतर विचार करीत राहिलो. एक सत्य, एक कौटुंबीक समस्या त्यांनी मजसमोर चित्रीत केली. काही मुद्दे हे मनाला पटणारे नव्हते परंतु जेव्हा शांतचित्ताने, बदललेल्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता त्यांच्या प्रत्यक बाबीवर मला मान्यता द्यावी लागली. हा विचार श्री. देशपांडे ह्याच्या वैयक्तीक जीवनाचा नव्हता तर त्यांच्या समस्येवरुन हा सद्य स्थितीतील कौटुंबीक आणि त्यातही वृद्धत्वामधील स्थितीला चालणा देणारा विचार होता. त्यांच्या चर्चेतील त्यांचेच विचार :“एका चाळीमधल्या दोन छोट्या खोल्यांमध्ये माझं सार जीवन गेलं. बालपणापासून नोकरीच्या निवृती काळापर्यंत त्याच घरात आयुष्य गेलं. सारी सुख दु:खे बघीतली. शिक्षण, नोकरी, संसार आणि मुले ह्या जीवनामधल्या महत्त्वाच्या पायऱ्या. ह्याच घरी राहून चढून गेलो. अतिशय सुखी व समाधानी, सर्वसाधारण जीवन जगलो. मध्यम वर्गीय कुटुंब आणि त्याचप्रमाणे प्रपंच केला. जेवढं मिळवणं शक्य आहे ते मिळवल व जेवढे कष्ट करावयास हेव ते केले. फक्त एक गोष्ट नोकरीला लागल्यापासून व लग्न झाल्यापासून नेहमी मनात येत असे आणि ती म्हणजे स्वत:ची एखादी वास्तू असावी. आपण आपल्या पैशानी, कष्टाच्या कमाईने छोटे का होइना एखादा फ्लॅट असावा. चाळीच्या जीवनाला कंटाळलो नव्हतो. त्यातला आनंद काही वेगळाच. परंतु ते घर मला वडीलांकडून वडीलोपार्जित असल्यामुळे मिळाले. मला आपले स्वत:चे घर असावे ही इच्छा मनांत खोलवर होती. इच्छा आणि परिस्थिती ह्याच्या झगड्यात इच्छेलाच हार खावी लागत असे आणि परिस्थिती जेव्हा मान्यता देईल. तेव्हा बघू हे सात्वनपर तत्त्वज्ञआन मनाशी बांधून मी शांत होऊन बसे.’नोकरी निवृत्ती मिळाली. बराचसा पैसा एकदम हाती आला. नोकरीच्या काळामधली बँकेमधली साठवण पण माझ्या इच्छेला मदत करण्यासाठी सरसावली. तरीही फ्लॅटसाठी बरीच रक्कम उभारणे जरुररीचे होते. खूप विचार केला आणि चाळीमधले घर काढून टाकले. परिस्थितीला सर्व आघाड्यावरुन हल्ला केला गेला. तिला पण कदाचित मजवर दया आली असावी आणि ती नमली. इच्छेला जबरदस्त चालना मिळाली. इच्छेचा विजय झाला. जीवनामध्ये जे कष्ट करुन मिळविले ते एकत्र केले आणि सारी आयुष्याची पूंजी घालून हा तीन खोल्यांचा, स्वतंत्र, सर्व सुविधांनी युक्त असा फ्लॅट खरेदी केला. जेव्हा हे घर माझ्या नावाने झाले त्यावेळी मी केवढी आनंदी होतो हे शब्दाने व्यक्त करणे केवळ अशक्य होते. तो दिवस मला आजही आठवतो. ज्या दिवशी मी माझ्या नावाची पाटी ‘स.गो. देशपांडे’ ही स्वत:च बाहेर दारावर लावली. एक अत्यंत मोठी इच्छा, क ध्येय मी मिळवले याचा अभिमान वाटू लागला. हे घर माझ आहे आणि आस्मादिक स.गो.देशपांडे हे मालक आहेत. परंतु हा माझा आनंद फारच थोडा काळ टिकला. सभोवतालच्या परिस्थितीने आणि जीवनातल्या चाकोरीने मला हे दाखून दिले की मी काल जो निर्णय घेतला तो संपूर्ण चूक होता. एका निराशामय
12 वातावरणाची छाया जीवनावर परसरु लागली. स्वतंत्र घराची कल्पना चांगली होती. आजही माझे जीवन तसे आनंदी आहे. परंतू घराच्या स्वातंत्र्याने माझे वैयक्तीक स्वातंत्र्य नष्ट केले होते. आज घराचा मालक मी आहे परंतु माझ्या खिशात एक रुपया पण नाही. बँक रिकामी, नोकरी नाही, विचित्र परिस्थिती होऊन बसली आहे. सार माझ असून देखील मला अतिशय छोट्याशा गोष्टीसाठी मुलाकडे वा सूनेकडे हात पुढे करावा लागतो. माझा आदर आहे. मी जे मागील ते मला चटकन व सर्वकाही त्वरीत मिळते. ह्यात शंका नाही. पंरतु असे पूर्वीच्या जीवनात केव्हाच घडले नव्हते त्यामुळे पैसे मागणे ही बाबचमुळी मला बैचेन करते. नातीला खावूसाठी, कपड्यासाठी मी पैशाची याचना करावी ही निराशा करणारी गोष्ट नव्हे का? ह्या तर अतिशय क्षुल्लक घटना आहेत. उद्या जर दुखले, खूपले, शारिरीक त्रास झाला तर सारे कसे निभावून नेणार? आज प्रखरतेने जाणीव होऊ लागली की वृद्धकाळासाठी कमीत कमी जीवनाला आवश्यक पैसा हा हाती असणे हे किती जरुरी आहे.
जीवनामध्ये प्रत्यक गोष्टींची गरज त्यात्या काळात तीव्रतेने भासते. माणसाच्या आवडी-निवडी, समाधान, आनंद इत्यादी कल्पना ठराविक वयातच महत्त्व निर्माण करतात. प्रत्येकानी त्यासाठी योग्यवेळीच प्रयत्न करावा व ते मिळवावे परंतू जर काही परस्थितीमुळे 1 शक्य झाले नाही तर काळाचा विचार करुन, आपल्या हाती असलेल्या साधनाचा व आयुष्याचा विचार करुन इच्छेला वेगळा मार्ग द्यावा. नोकरीच्या प्रारंभीच्या काळात जास्त कष्ट करुन, बँक अथवा गृहनिर्माण संस्थाकडून कर्ज घेवून फ्लॅट घेतला असता ते सोईचे झाले असते. हलके हलके हफ्ते भरुन काही काळाने मला माझे घर मिळवता आले असते. पंरतू घराचा विचार तडीला लावण्याचा निर्णय व क्रिया ह्या अवेळी झाल्या व आज हाती काहीच राहिले नाही. आज तरी मला त्या घराची तितकी गरज भासेनासी झाली. अर्थात हे सत्य आहे की हे घर माझ्या मुलासाठी असेल. परंतु आज मला जो आंतरीक परकेपणाचा व अवलंबून राहण्याचा भाव डोक्यात येत राहतो त्याचे काय? जसे ६० वर्षे त्या चाळीत राहिलो तसाच उरलेला आयुष्याचा भाग मी आनंदात चालू ठेवू शकलो नसतो का? हाती पैसा असता व त्याचे मानसिक समाधान निश्चितच अवर्निय आहे. कुणीही काहीही ह्या जगातून जाताना आपल्या बरोबर नेत नसतो. तेव्हा तुम्ही जे कमविले ते कालांतरानंतर तुमच्यात मुलांना वा सख्यातील व्यक्तींना मिळणार आहे. एके काळी ही एक जबरदस्त मानसिक धारणा होती की हे सारे मी माझ्या मुलांसाठी करतो. परंतू आता काळाची गती परिस्थितीचे लक्ष्य वेगळेच होत चालले आहे. आजही हे वाक्य सत्य आहे की सर्व काही मुलांसाठी परंतू माझ्या उरल्या सरल्या आयुष्याची सांगता झाल्या नंतरच एकत्र कुटुंब पद्धती लोप पावू लागली आहे आणि असंख्य संसारीक प्रश्नाच्या चक्रात व्यक्ती व्यक्तीला एकमेकांकडे लक्ष्य देण्यास काळजी घेण्यास अथवा देखभाल करण्यास खरोखरच वेळ काढणे अवघड होत आहे. कुणी जाणून बुजून दुर्लक्ष करतो अशातला भाग नसतो. परिणामी ‘तुमचे तुम्ही बघून घ्या’ असा कठोर भासणारा परंतू सत्य परिस्थितीवर आधारीत मार्ग केवळ वृद्धासाठी उरतो. 13 शेवटचे १० – १५ वर्षे जर मानाने व स्वतंत्र विचाराने जगावयाचे असतील तर हाती पैसा हा पैसा ह्याच रुपाने तुमच्या जवळ असावा, एक मोठी मालमत्ता म्हणून नव्हे.
तुमचे वृद्ध काळातले जीवन चागले व समाधानी जाण्यासाठी, गरज असते ती प्रथम शारीरिक सुद्दढतेची. मनाच्या आनंदाचा विचार हा तरी दुय्यमच असेल. तरी सारे कांही तुमच्या धडपडीच्या जीवन कालखंडात याची योजनाबद्ध आखणी केलेली असावी. जे जीवनरेषा जाणीत आयुषाची वाटचाल करतात, त्याना सुकर आयुष्य लाभते. दुर द्दष्टी हीच हसत खेळत म्हातारपण घालविण्याचा मार्ग असेल.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आत्याआजी

आत्याआजी

९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती. मृत्यु आपल्या हाती नाही, म्हणून जगणे व जगावयाचे म्हणजे कष्ट करणे हे तीचे समिकरण होते. तसे तीचे आपले स्वतःचे कुणीही नव्हते. न मुलबाळ. नवरा तर ३०-३१ वर्षापुर्वीच वारला. काळ जबरदस्त धक्का तीच्या जीवनाला देत पुढे पुढे चालला होता. कट्टर सनातनी घराणे. तीला काळानुसार केशवपन करावे लागले होते. फक्त दोन लाल रंगाची लुगडी, तेवढीच तीची संपत्ती. व कष्ट करण्यास चांगली प्रकृती.
आत्याआजी आमच्या घरी असलेली, मी माझ्या बालवयापासून बघत आलो होतो. एक विचीत्र गुंतागुंतीची भावना, अनेक प्रश्न तीच्या विषयी माझ्या मनांत डोकावत. मलाच त्याची उत्तरे शोधावयाची होती. आणि तशी योग्य संधी मला मिळाली. मी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला व शासकीय नोकरींत गेलो होतो. एक दिवस-
‘ आत्या आजी तुला एक प्रश्न विचारुं कां ‘? ती ‘हो ‘ म्हणाली.
‘तुला मुलबाळ, अपत्ये झालीच नाहीत ? की तुझी मुले जगली नाहींत ‘?
ती मजकडे बघून हासू लागली. कारण मी डॉक्टर होतो. व एक वेगळाच अलिखीत व्यवसायीक आधिकार प्राप्त होता.
‘खर सांगु तुला. ते आमच्या लग्नानंतर, माझ्या सहवासांत ४० वर्षापेक्षा जास्त काळ होते. परंतु माझा त्यांच्याशी केंव्हांच संसार झाला नाही. ‘
मी तीचे असे शब्द ऐकून अवाक झालो. भयंकर अचंबा वाटला. ‘ काय म्हणतेस तू हे आत्याआजी. ? अण्णा आजोबाशी तुझा केंव्हाच संसार झाला नाही ? तु तुझे सारे जीवन संसार सुखाच्या अनुभवाशिवाय घालविलेस ? ‘
ती पुनः हासू लागली. ‘ अरे कसले संसारीक सुख. विवाहमधला सर्वांत महत्वाचा धागा असतो. तो संसार सुखाच्या त्रिकोणचा. हा लैंगिकता, प्रेम, व आकर्षण ह्या भावनांच्या बाजूवर उभारलेला असतो. हे सारे मी फक्त ऐकत होते. कोणताही आणि कधीही त्याच्या अनुभव सुखातून जाणे झाले नाही. ‘
‘ अग आत्याआजी परंतु अशी कोणती खोट वा अडचण तुमच्या वैवाहिक जीवनांत आली. ‘ ती त्या क्षणी पुन्हा हासू लागली. ‘ ते चांगले पुरुष होते. चांगल्या मोठ्या मिशा बाळगून होते. प्रकृति दणकट व पिळदार होती. परंतु ते एकदम नपुंसक होते. त्या काळी वैद्यकिय तपासणी देखील करुन घेतली. डॉक्टरानी त्यांच्या नपुंसकतेवर शिक्कामोर्तबही केले होते. कोणतेच उपाय शक्य नव्हते. लैंगिकसंबंधामध्ये एकदम हत्बल होते. घराणे मोठे, नांवलौकीक मोठा. वंश पुढे चालावा ही सर्वांची प्रबळ ईच्छा, भले मुलगा असो वा मुलगी. प्रथम सर्वानी मलाच दोशी ठरविले. त्यांचा दुसरा विवाह करणाचा प्रयत्न चालविला. मी कोणताच विरोध केला नाही. परंतु त्यानी स्वतः ला चांगलेच व पूर्ण जाणून घेतले होते. त्यानी हा ठराव धुडकावून लावला. पाण्यांत राहून तहानलेला म्हणतात, तसे मी माझे आयुष्य आतल्या आंत कुढत चालू ठेवले. ते माझ्यासाठी अवघड ठिकाणचे दुखणे झाले होते. फक्त वाच्यता न करता निमुटपणे सहन करणे. माझ्या कुचंबणेची कुणीही विचारपुस वा चौकशी केली नाही. ही होती त्या काळची संस्कृती व धर्माचरण. ‘
आज मला आत्याआजीची प्रखरतेने आठवण येऊ लागली होती. कारण होते एका मासिकामधला वैद्यकिय अहवाल. जो केंद्रीय शासनाच्या Social Sciences ह्या विभागानी २००७ साली प्रसिद्ध केला होता. थोडे थोडके नाही, जवळ जवळ दोन कोटी लोकसंख्या असलेला हा वर्ग भारतातला. यांची शारिरीक तपासणी अहवाल सांगतो की इतकी पुरुष माणसे ” लैंगिकतेमध्ये नपुंसक ” (Incompetent for Sexual Intercourse ) ह्या सदरांत जातात. ही प्रचंड संख्या होती. हा वर्ग लैंगिकता ह्या कार्यप्रणालीसाठी प्रकृतीने सक्षम नव्हता. त्यांची इतर शरीर प्रकृती, अंगकाठी, सर्व अवयव नॉर्मल होती. ही मंडळी बुद्धीने देखील तल्लख, समजदार, हूशार होती. मात्र त्यांच्यात लैंगिकता करण्यास
( Sexual Intercourse वा Transaction ) संपुर्ण अपात्रता होती. लैगिक अवयवांत ( शिश्न – Penis) उत्थापन होण्याची क्षमता नव्हती. त्यांचे आकार, रचना हे नॉर्मल नव्हते. विर्यरस उत्पत्ती ( (Semen’s Quantity and Quality in counts ) ही देखील खुपच कमी प्रमाणात होती.
शरीर संपदा, देहयष्टी, व्यक्तीमत्व ह्यात ते नॉर्मल होते. कमी पडत नव्हते. फक्त पौरुष्य ज्याला म्हणतात त्याची. त्यांच्यात उणीव होती. त्याच लेखांत त्यांची अनेक कारणमिमांसा व्यक्त केली होती. त्यांत कौटूंबिक, वडीलोपार्जीत, Genetic, Familial, इत्यादी गुणधर्मा बरोबर जात, धर्मपंथ, खाण्यापिण्याच्या संवयी, स्थान, वातावरण, परिस्थीती, व्यसन, सवयी, मानसिकता, कांही रोग अशा बऱ्याच गोष्टींचा उहापोह होता.
मी हा रिपोर्ट वाचून फार बेचैन झालो. Sexual incompetence and Infertility विषयी तसे वैद्यकिय अभ्यासांत बरेच वाचले होते. परंतु अहवालामधल्या संख्याशास्त्राने त्यावर वेगळाच प्रकाश पाडला. मन सुन्न झाले.
स्त्रीया वरील अत्याचार, बलात्कार, बळजबरी संभोग, ह्या मनाविरुद्धच्या भयानक गोष्टी आहेत. आजकाल त्या खूपच वाढल्या आहेत. स्त्रीला ही उपभोगाची वस्तू, ही संकल्पना समजली जाई. परंतु त्याच वेळी स्त्रीयांवरील अत्याचाराची, एक दुसरी बाजू मज समोर आली. अनेक अनेक स्त्रीया आहेत की ज्या लैंगिक सुखापासून वंचित रहात असलेल्या दिसल्या. येथेही पुरुष प्रधानता, बळजबरी होऊन त्यांच्यावर गुलामा प्रमाणे अत्याचार मात्र होत राहतात. संसारगाडा चालविणे, घर चालविणे, कामे करणे, सारे होत राहते. फक्त लैंगिक सुख न मिळता. अनेक व्यक्ती व्यसन, दारु, गांजा, अफू, चरस, गर्द इत्यादीमध्ये सतत अडकले असतात. पैसा मुबलक. घरदार प्रशस्त. सार कांही जीवनाच्या गरजेच त्वरीत उपलब्ध. मात्र तरीही जीवनांत अंधःकार असलेला. ही माणसे लैंगिकतेमध्ये एकदम शुन्य. त्यांना कोणताच उत्साह, स्फूर्ती वा चेतना नाही. आहे मनोहर परी गमते उदास, अशी त्या स्त्रीयांची गत होते. बघणाऱ्याला तीच्या दुःखाची खरी कल्पना येऊच शकत नसते.
कित्येक व्यक्ती लैंगिकतेमध्ये सक्षम असतात, परंतु बाहेख्याली वृत्तीचे असतात. त्यांचे लक्ष बाहेर असते. निसर्ग पुरुषांत Sexual Intercourse साठी शरीरांत विर्यरस ( Semen ) तयार करीत असतो. तरुणपणांत ह्याची उत्पत्ती सुरु होते.
पुढे वयवाढी प्रमाणे कमी होत जाते. ठराविक दिवसांच्या अंतरानेच हा विर्यरस बनतो. विर्यरस व लैंगिकता याचा संबंध असतो. विर्यरस नसेल तर अवयवांत उत्तेजकता येत नसते. ही बाहेरख्याली माणसे त्यांचा विर्यरस कोटा बाहेरच गमवून बसतात. ह्यांत घरामधली हक्काची स्त्री, जीला संसारीक अधिकार प्राप्त असेल, ती वंचित राहते. तीला शरीर सुख मिळत नाही. हे एखाद्या बंदूकी प्रमाणेच असते. बंदूकीला महत्व त्याच वेळी जेंव्हा त्यांत गोळी असेल. अशी बाहेरख्याली अथवा नपुंसक माणसे ही फक्त शोभेसाठीच. एखाद्या भिंतीवर टांगलेल्या बंदूकीप्रमाणे. हे सारे न सांगता येणारे, काळानुसार लज्जेखातर स्त्रीयांनी सहन केले होते. सर्व आयुष्य बलीदान केले.
आता स्त्री आपल्या हक्काप्रित्यर्थ खुपच जाग्रुक झालेली आहे. धाडसी झालेली आहे. समजदार तर ती होतीच. आता जगाची व समोरच्याची तीला पूर्ण जाण आलेली आहे. कुणी दाद दिली नाही, तर ती हाती शस्त्रपण घेईल. आंता ती मागणार नाही, सारे खेचून घेईल.
बिचारी माझी आत्याआजी, त्या वेळच्या काळाला अर्थात परिस्थीतीला बळी गेली होती. भावनेचा कोंडमारा करीत जगली. मिठाची गुळणी तोंडात ठेऊनच आयुष्य जगत राहीली. फक्त धर्मबंधन म्हणून लादलेले ईश्वर नामस्मरण घेत.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ (ईश्वर निर्मितीला जाणा)

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ
(ईश्वर निर्मितीला जाणा)

ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. पटवले गेले, सांगितले गेले. पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके, रेडीओ, टीव्ही इत्यादी अनेक माध्यमे वैचारिक जडण-घडणामध्ये भाग घेत होते. शाळेत शिक्षकांचे तत्त्वज्ञान व घरांत वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन ह्याचा मारा सतत होत होता. घरामधली नातेमंडळी मित्र – परिवार हे त्या त्या महान तत्त्वाला अनुसरुन वागणाऱ्या आणि इतरांना वागविण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. हे सारे दैनंदिन डोळ्यांदेखत होत होते, घडत होते. अनेक प्रश्न समोर येत, परंतु ते काळाप्रमाणे, वयाप्रमाणे सोडविले जातील, याची जबरदस्त खूणगाठ मनामध्ये बांधण्यात परिसर, वातावरण व संस्कार यशस्वी झाले होते.
हिरा असा सहज प्राप्त होत नसतो. प्रचंड खोदकाम, श्रम केल्यानंतरच तो हाती लागतो. ह्या विषयीचे तत्त्वज्ञान मनाला शंभर टक्के पटले होते. श्रम आणि साध्य ह्याचे अतूट नाते मनावर चांगलेच बिंबले होते. हिऱ्याची तुलना ईश्वरासाठी करताना, जरी ते प्राप्त होण्यासाठी श्रमाची संकल्पना पटली, तरी मन साशंक होत राहिले. कारण श्रमानी हिरे प्राप्त केलेले अनेक दिसले, कळले होते. ईश्वरांचे मात्र तसेच असेल का? हा प्रश्न मनांत घोळत होता. कारण हिऱ्याचे अस्तित्व बघीतले होते. ईश्वराचे तसे नव्हते. तो सर्वत्र आहे, महान आहे, हे तत्वज्ञान शंभर टक्के पटले होते. परंतु तो कुणाला भेटला, दिसला ह्याचा शोध वा बोध मात्र मनाला केव्हाच मान्य झाला नाही. फक्त सांत्वनासाठी त्याचा अनुभव घ्या, तेव्हा ईश्वराबद्दल कळेल हे मान्यवरांचे पांडीत्यपूर्ण तत्त्वज्ञान समजत होते, परंतु पटत नव्हते. कदाचित स्वत:मध्ये ते कळण्याची वा कळून घेण्याची पात्रता नसेल. हे मन सांगत होते. प्रयत्न केले, प्रचंड श्रम घेतले व हीरा प्राप्त झालेला आम्ही बघीतला होता. परंतु ईश्वराचे काय? तो कुणांला आज तागायत तरी दिसला, प्राप्त झाला हे ठामपणे कळले नव्हते. त्याच्या प्राप्तीची जगाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, जागेमध्ये आणि केंव्हाही एक वाक्यता त्यावर झालेली दिसली नाही. हा एक मात्र प्रखरतेने मान्यता पावलेले तत्वज्ञान दिसून आले की ईश्वर जरी प्रत्यक्ष दिसला भेटला नसला, तरी त्याच्यासंबधी अनुभव मात्र अनेक थोर व्यक्तीना आलेले आहे. जे त्या ईश्वराचे दिव्य भव्य असे वर्णन केले गेले ते त्यांच्या आत्मिक प्रयत्नामध्ये अनुभवांनी साध्य केले. जे अनुभव सर्व सामान्यांना सहज मिळणार नाही असे अनुभव, अनेक व्यक्तींना आल्याचे ऐकू येते. मात्र जर ते त्या ईश्वरासंबंधीचे अनुभव होत असतील तर ते सर्वत्र परंतु सारखे असे असणारच नाही. ते भिन्नभिन्न असतील
२ व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, तसेच तितकेच अनुभव होतील आणि जेथे भिन्नता तेथे अनेक मार्ग वर्णीले जातील.
कोणते तत्वज्ञान मला ह्यातून मिळाले, ईश्वर दर्शनाच्या प्रयत्नाचा शेवट, एक भव्य दिव्य अनुभवाच्या रुपांतच मिळणार. जर मी तसाच अनुभव मला प्राप्त व्हावा ही संकल्पना केली, ध्येय आखले तर ते कदाचित पूर्ण होणार नाही. कारण शेवटी अनुभवांतील भिन्नता, माझ्या ध्येयाआड येईल, त्याच क्षणी मात्र साशंकता मनांत येवू लागते. जर ‘ फक्त विश्वास ठेवा, प्रयत्न करा ‘ हा कुणी संदेश दिला, तर मात्र अंधश्रद्धा हीची निर्मीती होईल व ती भरकटत घेवून जाईल. काही तरी ऐकले, काहीतरी वाचले, काही तरी समजणे झाले, हे ते होईल. केवळ त्या विचारातील भव्यता, दिव्यता मनाचा कोंडमारा करेल. मग ते त्याच विचारांना सत्याची झालर लावून, व्यक्त केले जात असल्याचे होईल. अनिश्चित ध्येय हे महान तत्त्वज्ञानाची वस्त्रे धारण करेल.
मग मी काय करावे. मी एक सामान्य व्यक्ती आहे. साधा विचारक आहे. कोणाच्यातरी महान तत्वज्ञानासमोर झुकणारा. त्यांचे विचार मानणारा. कारण त्या त्या व्यक्तीने परिश्रम केलेले असतात. प्रयत्न केलेले असतात. जीवनातील सारे तन, मन, धन, परिश्रम त्याने खर्च केले असते. आपले सर्व आयुष्य त्या संकल्पनेच्याच ध्येयात घातले असते. हे सारे मी बघीतले असते. त्या ठराविक महान व्यक्तीविषयी मी समजलेलो असेन. मी त्याचे सारे श्रमसाध्य घेऊन, त्याच्याच विचाराने, मार्गदर्शनाने माझा मार्ग निश्चीत करु इच्छितो. मग कोठे चुकले? एखादा व्यक्ती अ, आ, ई हे शब्द घेवून अभ्यासास सुरुवात करते, प्राथमिक धड्याचा आधार घेत घेत पुढे एखाद्या प्रांतात डॉक्टरेट करते. याचाच अर्थ ती आपले सारे आयुष्य तीच्या ध्येयासाठी पणाला लावते. तीला एक प्रकारची मान्यता मिळते. मला जर तेच हवे असेल, तर माझी वाट त्याच्या प्रमाणेच प्राथमिक पासून शेवटपर्यंत तशाच प्रकारे असेल. सार आयुष्य खर्च होईल. नाही – मी त्याच्या प्राप्त शेवटच्या धाग्याला धरुन पुढे जाऊ इच्छितो. त्याचप्रमाणे प्रयत्नाने त्याला दाद देत, तोच मार्ग पुढे घेवून जाण्याचे ठरवितो. ह्यात माझे प्राथमिक श्रम वाचतात व वेळही. कारण आयुष्य मर्यादेचे आहे.
हा! थांबा – – थोडा विचार करा! हेच जीवनाच्या वाटचालीमधले अत्यंत महत्त्वाचे व निर्णयपूर्व वळण असते. तेच तुम्हांला श्रमाकडे अथवा अंधश्रद्धेकडे घेवून जाणारे सिद्ध होईल. कारण यातील गोष्ट आहे की हा त्या महान व्यक्तीचा आपला अनुभव, आपला साक्षात्कार असेल. ह्यासाठीचे हे त्याचे आपले प्रयत्न असतील व त्यासाठी त्यांनी तयार केलेली वाट, ही देखील त्याचीच असेल. त्याच वाटेवरुन जावून कुणासही खऱ्या अर्थाने काहीच साध्य होणार नाही. त्याचा वैचारिक बांध, हा त्याच्या मनातून – नव्हे अंतःकरणातून निर्माण झालेला होता. मन म्हटले की भिन्नता येतेच, हाच तर निसर्गाचा चमत्कार नव्हे का?
3 ईश्वर त्याच्या अस्तित्वाची झलक नेहमीच देत आलेला आहे. मात्र पूर्वी म्हटल्याप्रमाणे दर्शनाने नव्हे तर अनुभवांनी.
एक प्रसंग आठवतो. – कोणता विचार मी करु इच्छितो. फार बैचेन मनातल्या अवस्थेमध्ये गुरफुटून जात चाललो होतो. एका निवांत जागी चिंतच करीत बसलो होतो. अचानक संगीताचे अत्यंत मधुर स्वर ऐकू आले. मन आनंदाने भरुन आले….. ज्याला अत्यानंद……म्हणतात. त्यात तल्लीन व्हावे. तंद्रीत जावे, परिसर, जग यांना विसरुन जावे. हे सारे त्या संगीताने केले होते. आनंद, समाधान ज्याला आपण म्हणतो तो सर्व प्राप्त झाला होता. काय हवयं मला आता? येथेच माझे पूर्व संस्कार, पूर्व ज्ञान झालेला वैचारिक मारा, वाचलेले ऐकलेले ईश्वरी दिव्यत्वाचे भव्यतेचे वर्णन बैचेन करु लागले. ईश्वरी दर्शन, साक्षात्कार त्यांच्यात एकरुप होणे ही ज्ञांनाची, ग्रंथांची मार्गदर्शक तत्वे चोहोबाजून मजवर आघात करु लागलो. प्रयत्न करा, श्रम करुन तुम्हाला हा हिरा प्राप्त होईल. असेच तत्त्वज्ञान. श्रम, तपश्चर्या, भक्ती, विश्वास इत्यादींच्या … आलेल्या ईश्वराला प्राप्त करण्याच्या मार्गाकडे घेऊन जगण्यास उत्सुक होता.
फार बैचेन झालो. नुकताच मिळालेल्या संगीताच्या आनंदात तंद्री लागलेली असताना, विचार आला की त्या संगीताला आपलस करण्यापेक्षा, त्याला माझ्यातच सामावण्यापेक्षा, मी त्या संगीतातच सामावू इच्छित होतो. ईश्वराने दिलेल्या कांनानी, श्रवणद्रींयांनी संपूर्ण आनंद लूटण्यापेक्षा, माझे चंचल मन, डोळ्याकडे अर्थात दृष्य स्वरुपाकडे झेप घेण्याचा विचार करीत होतो. मला आता ते ध्वनी लहरी जे अत्यांनंद देत होते, ते कुणी निर्माण केले त्याचा शोध घेण्याची इच्छा होऊ लागली. कारण इतका आनंद निर्माण करणारा तो फक्त ईश्वरच असेल ना, त्याला मी बघू इच्छितो. पुन्हा परत बैचेनी. कारण माझी इच्छा, आशा यांची झेप अशीच उंचावत राहणार.
जे पंचेद्रीये मला निसर्गाने दिलेले आहेत, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या परी एकरुप होता येईल. व आनंदाच्या सीमा मिळत राहतील, हीच सैरावैरा धावणाऱ्या मनाची विचार स्थिती. मला प्राप्त पंचेद्रीयांतील एक इंद्रीय ऐकण्याचे साधन, वाद्याचा, ध्वनीचा आस्वाद घेण्याचे इंद्रीय, शब्दांचा झंकार आत्मसात करण्याचे एक अवयव. शब्दांमध्येच उत्कठता असते. ही समज आणि त्याच ईश्वराचे ध्वनी स्वरुप मी माझ्यांत एकरुप करत घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मी स्वत: त्या ध्वनी माध्यमांत, अक्षर स्वरुपात एकरुप होण्यास असमर्थ होतो. ती कला, ते ज्ञान मला प्राप्त नव्हते व कुणासही नसले तरी मी त्या ध्वनी स्वरांत शिरु शकत नव्हतो. अर्थात त्या ध्वनी स्वरांचे जे स्वरुप ईश्वरी संकल्पनेचे वाटले होते, त्यात म्हणजे त्या विश्वात मिसळून जाऊ शकत नव्हतो. मात्र त्याची दुसरी बाजू ते ध्वनी मी माझ्यात माझ्या देहांत, आत्म्यांत एकरुप करणे शक्य होते. अर्थात त्यास लागते आनंदाची तंद्री, मग्नता, लय. त्या ध्वनी लहरी ते संगीत ज्याला मी ईश्वरी स्वरुप समजलो होतो.
4 मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ईश्वरी संकल्पना दुरावते हे जाणले तो फक्त प्रयत्न असतो, विचार असतो, आत्मा असतो. मात्र त्या संगीतामध्ये जेव्हा एकरुप होऊन जातो, स्वत:ला विसरुन जातो, त्याचवेळी ते ईश्वरी सानिध्यात असते. त्याची उकलन करता येणार नाही, ज्याचे विश्लेषणही करता येणार नाही. ज्या विषयाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. ती स्थीती ब्रह्मानंदाची Ecstasy of joy म्हणतात , ते हे नव्हे का?
माझ्या तंद्रीमधून मी बाहेर आलो, माझ्या दुसऱ्या अवयवाचा विचार करु लागलो. माझी दृष्टी माझी नजर, माझे बघणे, माझे डोळे हे सारे आतूर असतात. सतत त्या ईश्वराच्या शोध संकल्पनेला गुरफटलेले असतात. माझ्या साऱ्या प्रयत्नांचे ध्येय … फक्त एकच असते. त्या ईश्वराचे दर्शन मिळवणे. त्याला डोळे भरुन बघणे. त्याचे स्वरुप जाणणे आणि तो ईश्वर कोण, कसा हे विचाराने नजरेसमोर येवू लागते. तो ईश्वर ज्याला नाव दिलेले असते. त्याला रंग रुप, आकार, वेषभूषा, पेहेराव, अयुध्ये अथवा कोणत्यातरी पवित्र वस्तू ज्या संगीतल्या गेल्या आहेत. जसे कमलपुष्प, ओमकार, स्वस्तीक, शंख, इत्यादी. अशाच त्या ईश्वराला, त्याच्या वर्णन केलेल्या दृष्यामध्ये मी माझ्या चक्षुपटलांवर आणू इच्छितो. ग्रंथकारांनी महान थोर संतांनी देखील त्याला खऱ्या अर्थाने बघीतलेले नाही. तो निर्गुण निराकार, सर्वव्यापी, सर्व साक्षी असे अंतीम वर्णन केलेले आहे. आणि हे वर्णन जगातील सर्वच धर्म ग्रंथ मान्य करतात. सगुण, रुप हे फक्त , लक्ष केंद्रीत करण्यासाठी. पंरतु आपण आपली विचारांची हद्द तेथ पर्यंतच नेवून ठेवतो. व त्याला कोणत्यातरी स्वरुपांत दृष्टीपटलावर बघायचा प्रयत्न करतो. हे देखील त्याला ईश्वरानी दिलेल्या पंचेद्रीयातील एक इंद्रीय, ज्याच्या मार्फत हा आपला प्रयत्न असतो. ते दृष्य स्वरुप म्हणून त्याला अंतीम ध्येयामध्ये नेवून ठेवले जाते. त्याचवेळी जीवनाचे ध्येय ईश्वराच्या स्वरुप दर्शनात जावून बसते. त्याच्या लहरीप्रमाणेच त्याच्या दृष्यमय आविष्कारात. वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे. सुंदर गुलाबाचे फुल बघताना, उंचावरून पडणाऱ्या धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या शीतल चन्द्राकडे बघताना, कोकिळेची मधुर तान ऐकताना, इंद्रधानुशाचे रंग बघताना, मोराचा पिसारा फुललेला असताना नाच बघताना, एक नाही अनेक अश्या गोष्टी बघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण स्वता:ला विसरून जातो. हीच त्याची ध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिक वातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभव होय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वर पसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्दष्टीला वस्तू दिसते, ती त्या वस्तूची जाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते तोच ईश्वर नव्हे काय? . म्हणूनच त्याचे स्वरूप निराकार आहे. अपल्या द्दिष्टीक्षेपात, जाणीवेत ज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारा सभोवताल.
५ हे विश्व अनंत अथांग आणि सर्वत्र. हेच तर परमेश्वराचे स्वरूप आहे. आम्ही सदैव जे आमच्या आत बाहेर बघत असतो तोच तर ईश्वर.
ह्यालायच तर आपण ईश्वरी अनुभव म्हणतो. लोक जेव्हा मला ईश्वरी साक्षात्कार झाला म्हणतात. सदैव ज्या चित्रांचे, मूर्तीचे आकृतीचे त्यांचे चिंतन असते ते दिसण्याची मनांत प्रचंड आशा असते. त्याचप्रमाणे तशा प्रतिमा दिसू लागतात. आत्मसात होऊ लागतात. जे होते एका परिने समाधानकारक असते. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात. त्याप्रमाणे विचारांच्या रम्य कल्पनेमध्ये व्यक्ती आनंदून जाते. हे चांगले परंतू हेच तो सारे काही साध्य झाले असे धरुन जातो. येथेच अटकतो. सर्वस्व प्राप्त झाले, ह्यात समाधान मिळवतो. असेच काही ईश्वरी अनुभवाचे देखील असते. पंचेद्रीयांच्याच माध्यमातून त्याला दैवी आविष्कार झाल्याचे वाटू लागते. यात देखील एक मात्र प्रखरतेने जाणवते. ते म्हणजे जेवढी श्रद्धा जास्त बाळगली असते. जेवढे ईश्वरी विचार गहन झालेले असतात, जेवढी वैचारीक आच ईश्वरी अनुभवाची बाळगलेली असते, तेवढेच त्याच्या देह मनाभोवती
अनुभवाचे चक्र गुंफले जाते. मला वाटले, मला अनुभवले ह्या दोन टोकांत तो फिरत राहतो. चांगल वागणं, चांगला विचार करणं, चांगलं राहणं हेच ते ईश्वरी गुणधर्म समजतो. त्यांत रममाण होतो. मात्र फक्त चांगलचं म्हणजे ईश्वर ही संकल्पना अयोग्य आहे. हा मानवी संस्कृतीचाही परिणाम आहे. सर्व काही म्हणजेच तर ईश्वर, हे सत्य आहे. मात्र ते चांगल असो वा वाईट असो. फक्त लय, सातत्य, मग्नता आणि त्या गुणधर्मातच सर्व जगाला विसरणे, हेच तर ईश्वरी गुणधर्म ठरतात. पौराणिक कथांमध्ये अनेक दुष्ट, वाईट प्रवृत्तीच्या देखील व्यक्ती, वर्णन केलेल्या आहेत ज्यांना ईश्वरांनी दर्शन दिले, वरदान दिलेले आहेत. ते केवळ त्यांच्या तनमय होणाऱ्या गुणधर्मामुळे. ईश्वर साध्यता ही कोणत्याही वैचारीक चौकटीत बसत नसते. अनुभव, साक्षात्कार ह्या धारणा मात्र वैचारिक जडण घडणांत बंदीस्त होतात.
आपल्याला ज्ञानाच्या साधनेसाठी, निरसर्गाने ठरावीक दालने करुन दिलेले आहेत. त्याच पद्धतीने आम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकतो. सारे दिलेल्या पंचेद्रीयांच्या चौकटीनुसार असणार. ते आहेत डोळे, कान, नाक, जिव्हा व स्पर्श ज्ञान. मात्र वैचारिक ज्ञानाची झेप प्रचंड दिलेली आहे. पाच इंद्रीयांची चौकट मर्यादीत असते. मात्र सहावे इंद्रीय ज्याला वैचरिक झेप म्हणतात, ही अमर्याद असते. पंचेद्रीयाच्या मर्यादा आखलेल्या असल्या कारणाने तुमच्या त्या त्या ज्ञानाला मर्यादा आपोआपच पडतात. हे सत्य आहे. विचार मात्र आकाश, विश्व वा सागर ईश्वरी कोठेही जाऊ शकतात. येथेच एक शंका मनांत येवू लागते. पंचेद्रीयामार्फत जे प्राप्त होते ते त्वरीत व समोरच आपल्या देहाशी निगडीत असते. त्यामुळे विश्वास प्राप्त ठरते. दुर्दैवाने व्यक्ती यातच अडकून जाते. त्याचमुळे त्या प्राप्त साधन योजनेच्या मर्यादेमुळे जे काही अवगत होईल ते देखील मर्यादेचे स्वरुप धारण करुनच .
६ विचारांची झेप, विश्लेषण, तर्क ह्या ज्ञानाच्या माध्यमाला मर्यादा नसल्यामुळे, त्याचा आविष्कार देखील प्रचंड होऊ शकतो.
आता प्रश्न पडतो तो त्या ईश्वराच्या शोधाचा. मर्यादेचे साधन पंचेद्रीयाच्या माध्यमातून हे शक्य आहे का? सांगितल्या गेलेल्या, वर्णन केले गेलेल्या, सगुणात्मक ईश्वरी रुप हे केव्हाही प्राप्त होणारे नाही. कारण ते झाले विचारांच्या प्रचंड झेपामधून महान व्यक्तीकडून. व्यक्त झालेले वर्णन आहे. एकाचे वर्णन त्याला दुसऱ्याच्या खऱ्या अर्थाने वा आत्मिक स्तरावर दुजारा मिळाल्याचे जाणवला नाही. कारण हे केवळ त्यांचे अनुभव वर्णन असते. मानवी इंद्रियांच्या मर्यादा जाणताना फक्त एकच बाब मनांत ठसते व पटते. ते म्हणजे ईश्वरी अनुभव येतो त्याचा खरा आनंद समाधान होणे, येथे पर्यतच. मात्र हे ही त्यांनाच जे आपल्या प्रयत्नात ते ईश्वरी अनुभव प्राप्त करण्याच्या मार्गावर जात असतात. अनेक व्यक्ती मी बघीतल्या, त्याचे जीवन चक्र बघीतले, त्या सर्व ईश्वर दर्शन वा अनुभव साक्षात्कार ह्या संकल्पनेतच गुरफटून गेलेल्या आहे. जीवनामधला बराच काळ ते साधनेत व्यतीत करतात.
अनेकांना निराशाच हाती लागलेली जाणवते. त्याचे प्रमुख कारण ही मंडळी कर्मकांडात, नामस्मरणात वा अशाच सांगितलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या मार्गात सतत व्यस्त राहतात. आयुष्याचा फार मोठा काळ ते ह्यात खर्च करतात. हे सारे चांगले आहे. समाधान देणारे आहे. त्याच्या मनाला शांतता देणारे असेल. त्याच्याशी सहमती आहे. त्यांनी तसा प्रयत्न करावा. कुणाच्या प्रयत्नाना व योग्य संकल्पनेला मी का विरोध करावा. मला तो अधिकारही नाही व माझी क्षमताही नाही. मात्र स्वअनुभव असा की ह्या सर्व प्रयत्नात शेवटी काहीच निश्चित होत नसते. फक्त समाधानाचा ध्यास केलेल्या प्रयत्नाला यश लाभते, ही केवळ जाणीव. काय करावे मग मी ? प्रश्न पडतो, ईश्वराचे अस्तित्व मान्य, त्याचे सर्व महान गुणधर्म मान्य केलेले आहेत. मात्र ते सर्व निर्गुण ह्या संकल्पनेत. कारण हेच तर त्याचे अद्दष्य स्वरुप असते. जेव्हा अदृष्य स्वरुप हे वर्णन मी मनातून मान्य करतो. त्याचवेळी त्याच्या कल्पीलेल्या सगुण वा दृष्य स्वरुपासाठी फार अट्टाहास करणे गैर होईल. ते फक्त आयुष्य खर्ची केल्याप्रमाणे असेल. मग ह्या संभ्रमात, द्विधा मनस्थीत मी काय करावे ? ह्या चिंतनात मी पडलो.
अचानक मला तेच संगीत तेच चित्र कला, तेच नैसर्गिक दृष्य …..सारे सारे आठवू लागले. ज्या घटनांनी मला प्रचंड समाधान, अत्यानंद दिला. मनाची शांतता त्यात मला दिसली.
एक ईश्वरी अनुभव आल्याचे वाटले. येथेच मनाने एक संकल्प केला. ईश्वराचे जे काही अस्तित्व असेल ते त्याच्याच केलेल्या सर्व जगात, विश्वात विखूरलेले असेल. प्रत्यक अणुरेणुमध्ये तो व्याप्त असेल. हे सारे पटले कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येत गोष्ट, प्रत्येक
७ सभोवताल हा ईश्वरमय असेल. तर त्याला त्याच्याच कलाकृतीमध्ये शोध घेणे उचित ठरेल “कलेचा आनंद लूटा कलाराच्या शोधांत पडू नका” हा एक संदेश प्राप्त झाला. कारण ती कला देखील असामान्य आहे. मानव निर्मीतीच्या विचारांच्याही मर्यादेबाहेरची आहे. हीच कला अर्थात हे विश्व ह्याला संपूर्णपणे जाणणे, त्याचा आस्वाद घेणे, त्या कलेत एकरुप होणे हेच तर ईश्वरी सानिध्य असेल. न दिसणाऱ्या ईश्वर प्राप्तीसाठी जीवन व्यतीत करण्यापेक्षा, ईश्वर निर्मित सजीव निर्जीव ह्या सर्वांच्या ज्ञान प्राप्तीत, संबंधात एकरुपतेत, जाणीवेमध्येच तो दडला आहे. तेच मिळवण्याचा प्रयत्न व्हावा. असे मला वाटते. कर्म करा म्हणतात, त्यातच ईश्वर प्राप्ती आहे हे ऐकले आहे. कर्म अर्थात चांगले मनाला आनंद देणारे, समाधान मिळणारे कर्म कऱणे म्हणजे दैनंदीन व्यहार ईश्वरी कलाकृती निर्मीतीच्या सानीध्यात जाण्याचा एक मार्ग खऱ्या अर्थाने त्या ईश्वराला समजण्याचा एक प्रकार. ईश्वरी अनुभव म्हणतात ते हेच नव्हे का ?.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ (ईश्वर निर्मितीला जाणा)

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ
(ईश्वर निर्मितीला जाणा)

ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. पटवले गेले, सांगितले गेले. पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके, रेडीओ, टीव्ही इत्यादी अनेक माध्यमे वैचारिक जडण-घडणामध्ये भाग घेत होते. शाळेत शिक्षकांचे तत्त्वज्ञान व घरांत वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन ह्याचा मारा सतत होत होता. घरामधली नातेमंडळी मित्र – परिवार हे त्या त्या महान तत्त्वाला अनुसरुन वागणाऱ्या आणि इतरांना वागविण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. हे सारे दैनंदिन डोळ्यांदेखत होत होते, घडत होते. अनेक प्रश्न समोर येत, परंतु ते काळाप्रमाणे, वयाप्रमाणे सोडविले जातील, याची जबरदस्त खूणगाठ मनामध्ये बांधण्यात परिसर, वातावरण व संस्कार यशस्वी झाले होते.
हिरा असा सहज प्राप्त होत नसतो. प्रचंड खोदकाम, श्रम केल्यानंतरच तो हाती लागतो. ह्या विषयीचे तत्त्वज्ञान मनाला शंभर टक्के पटले होते. श्रम आणि साध्य ह्याचे अतूट नाते मनावर चांगलेच बिंबले होते. हिऱ्याची तुलना ईश्वरासाठी करताना, जरी ते प्राप्त होण्यासाठी श्रमाची संकल्पना पटली, तरी मन साशंक होत राहिले. कारण श्रमानी हिरे प्राप्त केलेले अनेक दिसले, कळले होते. ईश्वरांचे मात्र तसेच असेल का? हा प्रश्न मनांत घोळत होता. कारण हिऱ्याचे अस्तित्व बघीतले होते. ईश्वराचे तसे नव्हते. तो सर्वत्र आहे, महान आहे, हे तत्वज्ञान शंभर टक्के पटले होते. परंतु तो कुणाला भेटला, दिसला ह्याचा शोध वा बोध मात्र मनाला केव्हाच मान्य झाला नाही. फक्त सांत्वनासाठी त्याचा अनुभव घ्या, तेव्हा ईश्वराबद्दल कळेल हे मान्यवरांचे पांडीत्यपूर्ण तत्त्वज्ञान समजत होते, परंतु पटत नव्हते. कदाचित स्वत:मध्ये ते कळण्याची वा कळून घेण्याची पात्रता नसेल. हे मन सांगत होते. प्रयत्न केले, प्रचंड श्रम घेतले व हीरा प्राप्त झालेला आम्ही बघीतला होता. परंतु ईश्वराचे काय? तो कुणांला आज तागायत तरी दिसला, प्राप्त झाला हे ठामपणे कळले नव्हते. त्याच्या प्राप्तीची जगाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, जागेमध्ये आणि केंव्हाही एक वाक्यता त्यावर झालेली दिसली नाही. हा एक मात्र प्रखरतेने मान्यता पावलेले तत्वज्ञान दिसून आले की ईश्वर जरी प्रत्यक्ष दिसला भेटला नसला, तरी त्याच्यासंबधी अनुभव मात्र अनेक थोर व्यक्तीना आलेले आहे. जे त्या ईश्वराचे दिव्य भव्य असे वर्णन केले गेले ते त्यांच्या आत्मिक प्रयत्नामध्ये अनुभवांनी साध्य केले. जे अनुभव सर्व सामान्यांना सहज मिळणार नाही असे अनुभव, अनेक व्यक्तींना आल्याचे ऐकू येते. मात्र जर ते त्या ईश्वरासंबंधीचे अनुभव होत असतील तर ते सर्वत्र परंतु सारखे असे असणारच नाही. ते भिन्नभिन्न असतील
२ व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, तसेच तितकेच अनुभव होतील आणि जेथे भिन्नता तेथे अनेक मार्ग वर्णीले जातील.
कोणते तत्वज्ञान मला ह्यातून मिळाले, ईश्वर दर्शनाच्या प्रयत्नाचा शेवट, एक भव्य दिव्य अनुभवाच्या रुपांतच मिळणार. जर मी तसाच अनुभव मला प्राप्त व्हावा ही संकल्पना केली, ध्येय आखले तर ते कदाचित पूर्ण होणार नाही. कारण शेवटी अनुभवांतील भिन्नता, माझ्या ध्येयाआड येईल, त्याच क्षणी मात्र साशंकता मनांत येवू लागते. जर ‘ फक्त विश्वास ठेवा, प्रयत्न करा ‘ हा कुणी संदेश दिला, तर मात्र अंधश्रद्धा हीची निर्मीती होईल व ती भरकटत घेवून जाईल. काही तरी ऐकले, काहीतरी वाचले, काही तरी समजणे झाले, हे ते होईल. केवळ त्या विचारातील भव्यता, दिव्यता मनाचा कोंडमारा करेल. मग ते त्याच विचारांना सत्याची झालर लावून, व्यक्त केले जात असल्याचे होईल. अनिश्चित ध्येय हे महान तत्त्वज्ञानाची वस्त्रे धारण करेल.
मग मी काय करावे. मी एक सामान्य व्यक्ती आहे. साधा विचारक आहे. कोणाच्यातरी महान तत्वज्ञानासमोर झुकणारा. त्यांचे विचार मानणारा. कारण त्या त्या व्यक्तीने परिश्रम केलेले असतात. प्रयत्न केलेले असतात. जीवनातील सारे तन, मन, धन, परिश्रम त्याने खर्च केले असते. आपले सर्व आयुष्य त्या संकल्पनेच्याच ध्येयात घातले असते. हे सारे मी बघीतले असते. त्या ठराविक महान व्यक्तीविषयी मी समजलेलो असेन. मी त्याचे सारे श्रमसाध्य घेऊन, त्याच्याच विचाराने, मार्गदर्शनाने माझा मार्ग निश्चीत करु इच्छितो. मग कोठे चुकले? एखादा व्यक्ती अ, आ, ई हे शब्द घेवून अभ्यासास सुरुवात करते, प्राथमिक धड्याचा आधार घेत घेत पुढे एखाद्या प्रांतात डॉक्टरेट करते. याचाच अर्थ ती आपले सारे आयुष्य तीच्या ध्येयासाठी पणाला लावते. तीला एक प्रकारची मान्यता मिळते. मला जर तेच हवे असेल, तर माझी वाट त्याच्या प्रमाणेच प्राथमिक पासून शेवटपर्यंत तशाच प्रकारे असेल. सार आयुष्य खर्च होईल. नाही – मी त्याच्या प्राप्त शेवटच्या धाग्याला धरुन पुढे जाऊ इच्छितो. त्याचप्रमाणे प्रयत्नाने त्याला दाद देत, तोच मार्ग पुढे घेवून जाण्याचे ठरवितो. ह्यात माझे प्राथमिक श्रम वाचतात व वेळही. कारण आयुष्य मर्यादेचे आहे.
हा! थांबा – – थोडा विचार करा! हेच जीवनाच्या वाटचालीमधले अत्यंत महत्त्वाचे व निर्णयपूर्व वळण असते. तेच तुम्हांला श्रमाकडे अथवा अंधश्रद्धेकडे घेवून जाणारे सिद्ध होईल. कारण यातील गोष्ट आहे की हा त्या महान व्यक्तीचा आपला अनुभव, आपला साक्षात्कार असेल. ह्यासाठीचे हे त्याचे आपले प्रयत्न असतील व त्यासाठी त्यांनी तयार केलेली वाट, ही देखील त्याचीच असेल. त्याच वाटेवरुन जावून कुणासही खऱ्या अर्थाने काहीच साध्य होणार नाही. त्याचा वैचारिक बांध, हा त्याच्या मनातून – नव्हे अंतःकरणातून निर्माण झालेला होता. मन म्हटले की भिन्नता येतेच, हाच तर निसर्गाचा चमत्कार नव्हे का?
3 ईश्वर त्याच्या अस्तित्वाची झलक नेहमीच देत आलेला आहे. मात्र पूर्वी म्हटल्याप्रमाणे दर्शनाने नव्हे तर अनुभवांनी.
एक प्रसंग आठवतो. – कोणता विचार मी करु इच्छितो. फार बैचेन मनातल्या अवस्थेमध्ये गुरफुटून जात चाललो होतो. एका निवांत जागी चिंतच करीत बसलो होतो. अचानक संगीताचे अत्यंत मधुर स्वर ऐकू आले. मन आनंदाने भरुन आले….. ज्याला अत्यानंद……म्हणतात. त्यात तल्लीन व्हावे. तंद्रीत जावे, परिसर, जग यांना विसरुन जावे. हे सारे त्या संगीताने केले होते. आनंद, समाधान ज्याला आपण म्हणतो तो सर्व प्राप्त झाला होता. काय हवयं मला आता? येथेच माझे पूर्व संस्कार, पूर्व ज्ञान झालेला वैचारिक मारा, वाचलेले ऐकलेले ईश्वरी दिव्यत्वाचे भव्यतेचे वर्णन बैचेन करु लागले. ईश्वरी दर्शन, साक्षात्कार त्यांच्यात एकरुप होणे ही ज्ञांनाची, ग्रंथांची मार्गदर्शक तत्वे चोहोबाजून मजवर आघात करु लागलो. प्रयत्न करा, श्रम करुन तुम्हाला हा हिरा प्राप्त होईल. असेच तत्त्वज्ञान. श्रम, तपश्चर्या, भक्ती, विश्वास इत्यादींच्या … आलेल्या ईश्वराला प्राप्त करण्याच्या मार्गाकडे घेऊन जगण्यास उत्सुक होता.
फार बैचेन झालो. नुकताच मिळालेल्या संगीताच्या आनंदात तंद्री लागलेली असताना, विचार आला की त्या संगीताला आपलस करण्यापेक्षा, त्याला माझ्यातच सामावण्यापेक्षा, मी त्या संगीतातच सामावू इच्छित होतो. ईश्वराने दिलेल्या कांनानी, श्रवणद्रींयांनी संपूर्ण आनंद लूटण्यापेक्षा, माझे चंचल मन, डोळ्याकडे अर्थात दृष्य स्वरुपाकडे झेप घेण्याचा विचार करीत होतो. मला आता ते ध्वनी लहरी जे अत्यांनंद देत होते, ते कुणी निर्माण केले त्याचा शोध घेण्याची इच्छा होऊ लागली. कारण इतका आनंद निर्माण करणारा तो फक्त ईश्वरच असेल ना, त्याला मी बघू इच्छितो. पुन्हा परत बैचेनी. कारण माझी इच्छा, आशा यांची झेप अशीच उंचावत राहणार.
जे पंचेद्रीये मला निसर्गाने दिलेले आहेत, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या परी एकरुप होता येईल. व आनंदाच्या सीमा मिळत राहतील, हीच सैरावैरा धावणाऱ्या मनाची विचार स्थिती. मला प्राप्त पंचेद्रीयांतील एक इंद्रीय ऐकण्याचे साधन, वाद्याचा, ध्वनीचा आस्वाद घेण्याचे इंद्रीय, शब्दांचा झंकार आत्मसात करण्याचे एक अवयव. शब्दांमध्येच उत्कठता असते. ही समज आणि त्याच ईश्वराचे ध्वनी स्वरुप मी माझ्यांत एकरुप करत घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मी स्वत: त्या ध्वनी माध्यमांत, अक्षर स्वरुपात एकरुप होण्यास असमर्थ होतो. ती कला, ते ज्ञान मला प्राप्त नव्हते व कुणासही नसले तरी मी त्या ध्वनी स्वरांत शिरु शकत नव्हतो. अर्थात त्या ध्वनी स्वरांचे जे स्वरुप ईश्वरी संकल्पनेचे वाटले होते, त्यात म्हणजे त्या विश्वात मिसळून जाऊ शकत नव्हतो. मात्र त्याची दुसरी बाजू ते ध्वनी मी माझ्यात माझ्या देहांत, आत्म्यांत एकरुप करणे शक्य होते. अर्थात त्यास लागते आनंदाची तंद्री, मग्नता, लय. त्या ध्वनी लहरी ते संगीत ज्याला मी ईश्वरी स्वरुप समजलो होतो.
4 मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ईश्वरी संकल्पना दुरावते हे जाणले तो फक्त प्रयत्न असतो, विचार असतो, आत्मा असतो. मात्र त्या संगीतामध्ये जेव्हा एकरुप होऊन जातो, स्वत:ला विसरुन जातो, त्याचवेळी ते ईश्वरी सानिध्यात असते. त्याची उकलन करता येणार नाही, ज्याचे विश्लेषणही करता येणार नाही. ज्या विषयाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. ती स्थीती ब्रह्मानंदाची Ecstasy of joy म्हणतात , ते हे नव्हे का?
माझ्या तंद्रीमधून मी बाहेर आलो, माझ्या दुसऱ्या अवयवाचा विचार करु लागलो. माझी दृष्टी माझी नजर, माझे बघणे, माझे डोळे हे सारे आतूर असतात. सतत त्या ईश्वराच्या शोध संकल्पनेला गुरफटलेले असतात. माझ्या साऱ्या प्रयत्नांचे ध्येय … फक्त एकच असते. त्या ईश्वराचे दर्शन मिळवणे. त्याला डोळे भरुन बघणे. त्याचे स्वरुप जाणणे आणि तो ईश्वर कोण, कसा हे विचाराने नजरेसमोर येवू लागते. तो ईश्वर ज्याला नाव दिलेले असते. त्याला रंग रुप, आकार, वेषभूषा, पेहेराव, अयुध्ये अथवा कोणत्यातरी पवित्र वस्तू ज्या संगीतल्या गेल्या आहेत. जसे कमलपुष्प, ओमकार, स्वस्तीक, शंख, इत्यादी. अशाच त्या ईश्वराला, त्याच्या वर्णन केलेल्या दृष्यामध्ये मी माझ्या चक्षुपटलांवर आणू इच्छितो. ग्रंथकारांनी महान थोर संतांनी देखील त्याला खऱ्या अर्थाने बघीतलेले नाही. तो निर्गुण निराकार, सर्वव्यापी, सर्व साक्षी असे अंतीम वर्णन केलेले आहे. आणि हे वर्णन जगातील सर्वच धर्म ग्रंथ मान्य करतात. सगुण, रुप हे फक्त , लक्ष केंद्रीत करण्यासाठी. पंरतु आपण आपली विचारांची हद्द तेथ पर्यंतच नेवून ठेवतो. व त्याला कोणत्यातरी स्वरुपांत दृष्टीपटलावर बघायचा प्रयत्न करतो. हे देखील त्याला ईश्वरानी दिलेल्या पंचेद्रीयातील एक इंद्रीय, ज्याच्या मार्फत हा आपला प्रयत्न असतो. ते दृष्य स्वरुप म्हणून त्याला अंतीम ध्येयामध्ये नेवून ठेवले जाते. त्याचवेळी जीवनाचे ध्येय ईश्वराच्या स्वरुप दर्शनात जावून बसते. त्याच्या लहरीप्रमाणेच त्याच्या दृष्यमय आविष्कारात. वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे. सुंदर गुलाबाचे फुल बघताना, उंचावरून पडणाऱ्या धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या शीतल चन्द्राकडे बघताना, कोकिळेची मधुर तान ऐकताना, इंद्रधानुशाचे रंग बघताना, मोराचा पिसारा फुललेला असताना नाच बघताना, एक नाही अनेक अश्या गोष्टी बघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण स्वता:ला विसरून जातो. हीच त्याची ध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिक वातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभव होय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वर पसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्दष्टीला वस्तू दिसते, ती त्या वस्तूची जाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते तोच ईश्वर नव्हे काय? . म्हणूनच त्याचे स्वरूप निराकार आहे. अपल्या द्दिष्टीक्षेपात, जाणीवेत ज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारा सभोवताल.
५ हे विश्व अनंत अथांग आणि सर्वत्र. हेच तर परमेश्वराचे स्वरूप आहे. आम्ही सदैव जे आमच्या आत बाहेर बघत असतो तोच तर ईश्वर.
ह्यालायच तर आपण ईश्वरी अनुभव म्हणतो. लोक जेव्हा मला ईश्वरी साक्षात्कार झाला म्हणतात. सदैव ज्या चित्रांचे, मूर्तीचे आकृतीचे त्यांचे चिंतन असते ते दिसण्याची मनांत प्रचंड आशा असते. त्याचप्रमाणे तशा प्रतिमा दिसू लागतात. आत्मसात होऊ लागतात. जे होते एका परिने समाधानकारक असते. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात. त्याप्रमाणे विचारांच्या रम्य कल्पनेमध्ये व्यक्ती आनंदून जाते. हे चांगले परंतू हेच तो सारे काही साध्य झाले असे धरुन जातो. येथेच अटकतो. सर्वस्व प्राप्त झाले, ह्यात समाधान मिळवतो. असेच काही ईश्वरी अनुभवाचे देखील असते. पंचेद्रीयांच्याच माध्यमातून त्याला दैवी आविष्कार झाल्याचे वाटू लागते. यात देखील एक मात्र प्रखरतेने जाणवते. ते म्हणजे जेवढी श्रद्धा जास्त बाळगली असते. जेवढे ईश्वरी विचार गहन झालेले असतात, जेवढी वैचारीक आच ईश्वरी अनुभवाची बाळगलेली असते, तेवढेच त्याच्या देह मनाभोवती
अनुभवाचे चक्र गुंफले जाते. मला वाटले, मला अनुभवले ह्या दोन टोकांत तो फिरत राहतो. चांगल वागणं, चांगला विचार करणं, चांगलं राहणं हेच ते ईश्वरी गुणधर्म समजतो. त्यांत रममाण होतो. मात्र फक्त चांगलचं म्हणजे ईश्वर ही संकल्पना अयोग्य आहे. हा मानवी संस्कृतीचाही परिणाम आहे. सर्व काही म्हणजेच तर ईश्वर, हे सत्य आहे. मात्र ते चांगल असो वा वाईट असो. फक्त लय, सातत्य, मग्नता आणि त्या गुणधर्मातच सर्व जगाला विसरणे, हेच तर ईश्वरी गुणधर्म ठरतात. पौराणिक कथांमध्ये अनेक दुष्ट, वाईट प्रवृत्तीच्या देखील व्यक्ती, वर्णन केलेल्या आहेत ज्यांना ईश्वरांनी दर्शन दिले, वरदान दिलेले आहेत. ते केवळ त्यांच्या तनमय होणाऱ्या गुणधर्मामुळे. ईश्वर साध्यता ही कोणत्याही वैचारीक चौकटीत बसत नसते. अनुभव, साक्षात्कार ह्या धारणा मात्र वैचारिक जडण घडणांत बंदीस्त होतात.
आपल्याला ज्ञानाच्या साधनेसाठी, निरसर्गाने ठरावीक दालने करुन दिलेले आहेत. त्याच पद्धतीने आम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकतो. सारे दिलेल्या पंचेद्रीयांच्या चौकटीनुसार असणार. ते आहेत डोळे, कान, नाक, जिव्हा व स्पर्श ज्ञान. मात्र वैचारिक ज्ञानाची झेप प्रचंड दिलेली आहे. पाच इंद्रीयांची चौकट मर्यादीत असते. मात्र सहावे इंद्रीय ज्याला वैचरिक झेप म्हणतात, ही अमर्याद असते. पंचेद्रीयाच्या मर्यादा आखलेल्या असल्या कारणाने तुमच्या त्या त्या ज्ञानाला मर्यादा आपोआपच पडतात. हे सत्य आहे. विचार मात्र आकाश, विश्व वा सागर ईश्वरी कोठेही जाऊ शकतात. येथेच एक शंका मनांत येवू लागते. पंचेद्रीयामार्फत जे प्राप्त होते ते त्वरीत व समोरच आपल्या देहाशी निगडीत असते. त्यामुळे विश्वास प्राप्त ठरते. दुर्दैवाने व्यक्ती यातच अडकून जाते. त्याचमुळे त्या प्राप्त साधन योजनेच्या मर्यादेमुळे जे काही अवगत होईल ते देखील मर्यादेचे स्वरुप धारण करुनच .
६ विचारांची झेप, विश्लेषण, तर्क ह्या ज्ञानाच्या माध्यमाला मर्यादा नसल्यामुळे, त्याचा आविष्कार देखील प्रचंड होऊ शकतो.
आता प्रश्न पडतो तो त्या ईश्वराच्या शोधाचा. मर्यादेचे साधन पंचेद्रीयाच्या माध्यमातून हे शक्य आहे का? सांगितल्या गेलेल्या, वर्णन केले गेलेल्या, सगुणात्मक ईश्वरी रुप हे केव्हाही प्राप्त होणारे नाही. कारण ते झाले विचारांच्या प्रचंड झेपामधून महान व्यक्तीकडून. व्यक्त झालेले वर्णन आहे. एकाचे वर्णन त्याला दुसऱ्याच्या खऱ्या अर्थाने वा आत्मिक स्तरावर दुजारा मिळाल्याचे जाणवला नाही. कारण हे केवळ त्यांचे अनुभव वर्णन असते. मानवी इंद्रियांच्या मर्यादा जाणताना फक्त एकच बाब मनांत ठसते व पटते. ते म्हणजे ईश्वरी अनुभव येतो त्याचा खरा आनंद समाधान होणे, येथे पर्यतच. मात्र हे ही त्यांनाच जे आपल्या प्रयत्नात ते ईश्वरी अनुभव प्राप्त करण्याच्या मार्गावर जात असतात. अनेक व्यक्ती मी बघीतल्या, त्याचे जीवन चक्र बघीतले, त्या सर्व ईश्वर दर्शन वा अनुभव साक्षात्कार ह्या संकल्पनेतच गुरफटून गेलेल्या आहे. जीवनामधला बराच काळ ते साधनेत व्यतीत करतात.
अनेकांना निराशाच हाती लागलेली जाणवते. त्याचे प्रमुख कारण ही मंडळी कर्मकांडात, नामस्मरणात वा अशाच सांगितलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या मार्गात सतत व्यस्त राहतात. आयुष्याचा फार मोठा काळ ते ह्यात खर्च करतात. हे सारे चांगले आहे. समाधान देणारे आहे. त्याच्या मनाला शांतता देणारे असेल. त्याच्याशी सहमती आहे. त्यांनी तसा प्रयत्न करावा. कुणाच्या प्रयत्नाना व योग्य संकल्पनेला मी का विरोध करावा. मला तो अधिकारही नाही व माझी क्षमताही नाही. मात्र स्वअनुभव असा की ह्या सर्व प्रयत्नात शेवटी काहीच निश्चित होत नसते. फक्त समाधानाचा ध्यास केलेल्या प्रयत्नाला यश लाभते, ही केवळ जाणीव. काय करावे मग मी ? प्रश्न पडतो, ईश्वराचे अस्तित्व मान्य, त्याचे सर्व महान गुणधर्म मान्य केलेले आहेत. मात्र ते सर्व निर्गुण ह्या संकल्पनेत. कारण हेच तर त्याचे अद्दष्य स्वरुप असते. जेव्हा अदृष्य स्वरुप हे वर्णन मी मनातून मान्य करतो. त्याचवेळी त्याच्या कल्पीलेल्या सगुण वा दृष्य स्वरुपासाठी फार अट्टाहास करणे गैर होईल. ते फक्त आयुष्य खर्ची केल्याप्रमाणे असेल. मग ह्या संभ्रमात, द्विधा मनस्थीत मी काय करावे ? ह्या चिंतनात मी पडलो.
अचानक मला तेच संगीत तेच चित्र कला, तेच नैसर्गिक दृष्य …..सारे सारे आठवू लागले. ज्या घटनांनी मला प्रचंड समाधान, अत्यानंद दिला. मनाची शांतता त्यात मला दिसली.
एक ईश्वरी अनुभव आल्याचे वाटले. येथेच मनाने एक संकल्प केला. ईश्वराचे जे काही अस्तित्व असेल ते त्याच्याच केलेल्या सर्व जगात, विश्वात विखूरलेले असेल. प्रत्यक अणुरेणुमध्ये तो व्याप्त असेल. हे सारे पटले कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येत गोष्ट, प्रत्येक
७ सभोवताल हा ईश्वरमय असेल. तर त्याला त्याच्याच कलाकृतीमध्ये शोध घेणे उचित ठरेल “कलेचा आनंद लूटा कलाराच्या शोधांत पडू नका” हा एक संदेश प्राप्त झाला. कारण ती कला देखील असामान्य आहे. मानव निर्मीतीच्या विचारांच्याही मर्यादेबाहेरची आहे. हीच कला अर्थात हे विश्व ह्याला संपूर्णपणे जाणणे, त्याचा आस्वाद घेणे, त्या कलेत एकरुप होणे हेच तर ईश्वरी सानिध्य असेल. न दिसणाऱ्या ईश्वर प्राप्तीसाठी जीवन व्यतीत करण्यापेक्षा, ईश्वर निर्मित सजीव निर्जीव ह्या सर्वांच्या ज्ञान प्राप्तीत, संबंधात एकरुपतेत, जाणीवेमध्येच तो दडला आहे. तेच मिळवण्याचा प्रयत्न व्हावा. असे मला वाटते. कर्म करा म्हणतात, त्यातच ईश्वर प्राप्ती आहे हे ऐकले आहे. कर्म अर्थात चांगले मनाला आनंद देणारे, समाधान मिळणारे कर्म कऱणे म्हणजे दैनंदीन व्यहार ईश्वरी कलाकृती निर्मीतीच्या सानीध्यात जाण्याचा एक मार्ग खऱ्या अर्थाने त्या ईश्वराला समजण्याचा एक प्रकार. ईश्वरी अनुभव म्हणतात ते हेच नव्हे का ?.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com