Monthly Archives: जुलै 2017

नामस्मरणाच्या खोलांत

नामस्मरणाच्या खोलांत

जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते. आणि तीसरे कारण मानवी वैयक्तीक स्वभाव. याचाच परिपाक म्हणजे घटनांची निर्मिती. त्यामुळे त्यांत भिन्नता आणि मर्यादा असेलच. भले ते केवढे महान व जीवनाला यशस्वी करणारे असो. त्यांत मानवी मर्यादा येतीलच. फक्त ईश्वरी तत्त्वच परिपूर्ण असते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्ती ही एक वैशिष्ठपूर्ण ईश्वरी निर्मिती असते. कोणतेही कार्य मग ते केवढेही महान असो. जर मानवी मर्यादांच्या क्षमतेमधील असेल तर ते कुणीही करु शकतो. ही नैसर्गिक देणगी आहे. फक्त दुर्भाग्याने हे तत्वज्ञान व्यक्ती समजत नाही. अंगीकारत नाही. तसा त्याचा प्रयत्न होत नसतो.
इतरांचे विचार, इतरांची समज ही तुमच्यासाठी फक्त ‘ मार्गदर्शक ‘ ह्या संकल्पनेंत असावी. एखाद्याचे त्या प्रांतातले यश देखील एक उदाहरण म्हणून असावे. मात्र हाच केवळ एकमेव सत्याचा मार्ग सर्वासाठी असू शकत नाही. जर प्रत्येकजण आपल्यापरी वैशिष्ठपुर्ण आहे, तर व्यक्तीने आपला मार्ग, ध्येय हे स्वतःच्या आत्म्याला साक्षी ठेवितच चेतवावे. कारण ते आन्तरीक सत्य, हेच फक्त त्याच्यासाठी एकमेव सत्य असेल. इतरांसाठी मार्ग दर्शनपर. कदाचित तो मार्ग आगदी त्याच पद्धतीने हाताळता येणे शक्यच नसते. त्यांत कोठेतरी कांहीतरी भिन्नता येणारच.
‘सदैव ईश्वरी नामस्मरण करावे’ हा संदेश माझ्या बुद्धीने, विचारांनी त्याला मान्यता दिली. कां कुणास ठाऊक माझा आत्मा मात्र शासंक होता. कुणाचे नामस्मरण ? कुणी त्याना बघीतले ? कुणी हे सत्य अनुभवले ? व जर हा अनुभव असेल तर हे फक्त त्याचे त्याच्यासाठीचे सत्य असेल. हे नैसर्गिक सत्य कसे असेल. हा एक मार्ग ठरु शकेल. पण पुन्हा तोच मार्ग चालणे केवळ अशक्य. उत्पन्न होणारे अनुभव देखील भिन्न असतील ना ?. जरी ध्येय ( Aim ) हे एकच असले तरी.
पुन्हा प्रश्न उत्पन्न होतो की कोणते ध्येय ? ईश्वर दर्शनाचे, अनुभवाचे, सान्तवनाचे, ईश्वरांत एकरुप होण्यांचे. खुप द्विधा मनस्थीती झाली. ईश्वराने, निसर्गाने मला त्याच्यापासून वेगळे काढले ते कशासाठी ? पुन्हा त्याच्यांतच मिसळण्यासाठी. एकरुपता तर होतीच की. मग भिन्नता कशासाठी निर्माण केली गेली. निसर्गाचे त्या जीवाचे चक्र पुर्ण करण्यासाठी. हेच ते प्रयोजन. मुल. ते आईच्या सान्नीध्यांत फार अल्प काळासाठी असते. पोटचा तो गोळा. आईचे एक अंग. तीच्याशी एक रुप झालेला. वाढत वाढत मातेच्या शरीरामधून वेगळे अस्तित्व निर्माण केले गेलेला. काळाच्या चक्रांत संपुर्ण वेगळा केलेले. आता तर त्याचे सर्व व्यवहार, दैनंदिन अस्तित्व भिन्न होऊन जाते. आपले जीवन स्वतंत्र व आपल्याच पद्धतीने ते जगते. सर्व जीवनाचा खेळ खेळून व्यक्ती बनुन शेवटी विश्रांतीसाठी त्याच ईश्वरी तत्वात विलीन होऊ इच्छीते. हेच त्याचे ध्येय असते. विश्रांति, पुन्हा खेळणे, अर्थांत आता खेळ वेगळा, वातावरण भिन्न. सारेच निराळे.
नामस्मरणाचा उद्देश कोणता ? लयबद्धता (वा मग्नता) आणि आठवण. त्या ईश्वराची आठवण काढीत एका लयबद्धतेमध्ये विलीन होणे. इष्ठ देवतेच्या सतत आठवणीत राहणे. परंतु खोलवर विचार केला तर हे दोन्ही साधणे आवघड नव्हे , अशक्य वाटते.

लयबद्धतेच्या प्रक्रियेंत सर्व सभोवताल, परिस्थिती, स्वतःचे देखील अस्तित्व हे संपूर्ण विसरुन जाण्याचा प्रयत्न असतो. नामस्मरण करीत करीत अशा स्थितीमध्ये जाणे जरुरी असते, जेंव्हा हेच नामस्मरण विसरुन जावे लागते. शब्द जावून विचार, भावना, यांची एक तंद्री लागावी लागते. पुढे तेही विसरुन जावे लागते. सारे कांही जेंव्हा गळून पडते, त्याच वेळी ईश्वरी तत्वांत, अनुभवांत, नितांत आनंदात व्यक्ती पदार्पण करते. मग त्याला सारे विसरावे लागते. सर्वस्व विसरणे हा क्षण सर्व कांही मिळवणे ह्यासाठी ठरतो.
मी शांत बसलो होतो. नामस्मरणाचा प्रयोग चालला होता. एकाग्र होऊन इष्ठ देवतेचे चिंतन करीत होते. नामस्मरण चालू होते. अचानक ते एका मग्नतेत सुटले. तसा मला कविता करण्याचा छंद आहे. कवितेचे शब्द उत्पन्न होण्यासाठी भावनेचा कढ भरुन यावा लागतो. त्याच भवना मग शब्दरुप धारण करतात. कवितेचा जन्म होतो. मी माझ्याच विचारांत बराच वेळ गुरफटून गेलो होतो. भावना, विचार, आणि शब्द यांच्या द्वंद्वांत मग्न झालो होतो. एक काव्य बाहेर पडले. जे मला अत्यानंद देत होते. समाधान देत होते. मनाची शांती खऱ्या अर्थाने लाभली होती. हेच तर मला ईश्वरी दर्शन वाटले. कारण जर ईश्वर कसा व कशांत आहे हे निश्चीत नसेल, तर मग तो मला माझ्याच आन्तरीक विचारांत, भावनेंत, शब्दांत मिळाला असे मी समजतो. ते मिळण्याचा प्रांत कोणताही असेल. पण जर शेवट अत्यानंदांत, समाधानांत, असेल तर ह्यालाच ईश्वरी अनुभवाचे दर्शन समजतो.
नामस्मरण अतिशय चांगले व योग्य. महान व्यक्तीनी सांगितलेला मार्ग. एकदम पटणारा. परंतु अनुभव असा की ती ध्येयाकडे, पुढे घेऊन जाणारी एक पायरी असते. दुर्दैवाने असेही दिसते की व्यक्ती त्याच पायरीवर सतत घुटमळतच राहतो. एखादा घान्याच्या बैलाप्रमाणे. फक्त चकरा मारणारा. कोणताही दुरचा प्रवास न करणारा. जसे पुजाकर्म, आन्हीके इत्यादी. असतात. जे प्रथम पायरी प्रमाणे असतात. त्यांचाच आधार घेऊन पुढे लांब छलांग मारावी लागते. ईश्वरी तत्वांचा शोध घ्यावा लागतो. परंतु हे सहसा होत नाही. व्यक्ती त्याच पायरीवर, त्याच वातावरणात घुटमळत राहतो. अचानक कांही चमत्कार घडेल, वेगळाच मार्ग मिळेल, ईश्वरी अनुभव येईल, ह्या रम्य विचारांत रममान होतो.
अशाने हाती कांहीच लागत नाही. तो मात्र कर्मकांडी, व फक्त नामस्मरण घेणारा असाच राहतो. एकदम अपूर्ण. फक्त अंधश्रद्धावान. जर मार्ग दाखविला गेला तर चालताना मात्र स्वतःत्या आत्म्याला जागृत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण योग्य परंतु लयबद्धतेमधूनच ते विसरावे लागते. अर्थात हे विसरणे दुसऱ्या महान तत्वासाठी. हे विसरणे जाणून, समजून,नसावे. सहज असावे. चिंतनांत, घ्यानधारणेत, समाधी अवस्थेत जाण्यासाठी असावे. एका दालनात शिरलो. तेंव्हा पहीले दालन अपोआप सुटून गेले. त्याची आता त्या क्षणाला आठवण देखील नसावी. न नाम, न नामस्मरण, ना कोणती आठवण, ना कोणता विचार. नामस्मरणाला पर्याय असावा लय, एकाग्रता. आणि ती देखील विसरावयास हवी. आपोआप, सहजपणे. कशासाठी – तर त्याचे उत्तर नाही. तेथे असेल फक्त नितांत आनंद ( Ecstasy Of Joy ), समाधान, शांतता – – –

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

रक्त आणि रोग निदान

रक्त आणि रोग निदान

एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या मुलास निमोनीया ( Pneumonia ) झालेला असावा. तसे मी त्या मुलाच्या वडीलांना सांगीतले.
आज काल पालक फार चोखंदळ व चिकीत्सक झालेले जाणवते. हे चांगले लक्षण आहे. फक्त डॉक्टर सांगतात म्हणून सर्व मान्य करावे हे त्यांच्या पचनी पडत नाही. मुलाच्या वडीलांनी चौकस बुद्धीने मला प्रश्न केला. ” डॉक्टर तुम्ही रक्ताचा रिपोर्ट बघून कसा तर्क बांधू शकता? रक्ताचा रिपोर्ट हा निदान करण्यासाठी कशी मदत करतो. ” त्यांचा प्रश्न हा साधा, योग्य व सर्वसाधारण व्यक्तीच्या मनांत येणाऱ्या शंकाच बोलून दाखवणारा होता. अर्थांत वैद्यकीय शास्त्र प्रचंड आहे. ज्या ज्या शक्यतेचे बारकावे आम्ही शिक्षण घेताना शिकलो ते सर्वच त्याना सांगणे शक्य नव्हते. व अयोग्यही होते. त्याना फक्त त्यांचा छोटासा तर्क –” रक्ताचा रिपोर्ट व निदान ह्याचा कसा संबंध ? ” आणि ते मला त्याना त्यांच्या भाषेत समजेल ते सांगणे हीच मजसाठी परिक्षा होती.
मी खिडकीवाटे बाहेर बघू लागलो. विचार करीत होतो. अचानक माझे लक्ष्य वेधले गेले ते एका पोलिस गाडी मुळे. एक पोलिस Vane व्हॉन व कांही पोलीस त्याच्या भोवती उभे होते. त्यांची आपसांत चर्चा चाललेली दिसत होती. अशी पोलिस गाडी पोलिसांसह त्या जागी मी पूर्वी बघीतली नव्हती. आज अचानक ते सारे बघीतले. मी किंचीत हासत त्या मुलाच्या वडीलांना प्रश्न केला. ” बघीतल ती पोलिसांची गाडी व कांही पोलिस. ते आज अनपेक्षीत असे येथे दिसतात. काय तुमचा तर्क असावा ? ”
ते निरखून बघू लागले. ” मला वाटते जवळपास कांहीतरी घटना घडली असावी. कदाचित् चोरी, मारामारी, आत्महत्या, खून, वा असलेच कांही असावे. ”
” बरोबर आहे तुमचा तर्क. असेच असते बघा दैनंदिन जीवनाच्या प्रसंगाचे. फायर ब्रिगेडची गाडी जर आली असेल तर तर्क करता येतो की कुठे आग लागली असावी. ऍम्बुलन्स (Ambulance) जर दिसली तर कोणीतरी रुग्ण मदतीच्या आपेक्षेत आहे असे वाटते. शववाहिका ( HEARSE ) त्याच वेळी दिसेल, जेंव्हा कुणातरी मृत व्यक्तीसाठी आलेली असेल. क्वचित प्रसंगी जर मिलीटरी वाहन वा सैनिक दिसले तर जवळपास आतंकवादी अथवा शत्रु गटातील कुणीतरी त्या भागांत असावा हा तर्क माणसे काढतात. ह्याचा अर्थ निर्माण झालेली परिस्थितीचे अवलोकन, तर्क, कल्पना ह्याचा अंदाज त्या त्या परिस्थितीला काबूत आणणारी यंत्रणा बघून करता येतो. हा जरी तर्क असला तरी तो त्या कारणाच्या खूपच जवळ नेण्यास मदत करतो.
शरीराच्या आतील कार्यशाळे बद्दल असेच कांहीसे असते. रक्त शरीराचा अत्यंत महत्वाचा प्राथमिक भाग असतो. शक्ती, उर्जा, अन्न, रक्षण, सारे सारे रक्ताच्या मार्फतच होते. अनेक घटक पदार्थ असलेल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी हा एक घटक पदार्थ. रक्षणाची प्राथमिक जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता असते. ज्या पद्धतीचा रोग प्रादुर्भाव ( जंतू मार्फत ) शरीरावर होतो, त्याला ताब्यात आणण्यासाठी, त्या रोगाचा प्रतीकार करण्यासाठी रक्तामध्ये त्वरीत बदल होतो. शरीरांत असलेला Reserve Blood stock जो कांही अवयवांत असेल तो रक्त वाहीन्यामध्ये उतरतो. पांढऱ्या रक्तपेशीमध्ये त्या त्या रोगाला अनुसरुन त्वरीत वाढ होते. बस त्या ठराविक वाढलेल्या पेशी वा रक्त बदल हा कोणत्या रोगामुळे ते शक्य झाले असावे असा तर्क काढण्यास मदत करतो.
चोरी, खून, मारामारी, इत्यादी तुम्ही प्रत्यक्ष न बघताच केवळ पोलीसांची गाडी व पोलीस याना बघून जसे अनुमान काढू शकतात, त्याच प्रमाणे रक्त लघवी इत्यादींचे रिपोर्ट आम्हास त्या रोगाचे अप्रत्यक्ष निदान करण्यास मदत करतात.
मुलाच्या वडीलांनी हासत माझ्या तर्काला व निदानाला साथ दिली. मी त्याना लिहून दिलेले Prescription घेऊन ते औषधी आणण्यासाठी गेले.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा

तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा

नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाच वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपानी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन येत होत.
जोहानेसबर्ग ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी. सारा परिसर सुवर्णमिश्रित दगडांच्या खाणीनी भरलेला. जगातील सर्वांत जास्त खनिज सोन्याचे उत्पादन देणारा हा प्रांत समजला जातो. अतिशय कलात्मक आणि नाविण्यपुर्णतेने वसलेले हे शहर आहे. केवळ शे – दोनशे वर्षाचा इतिहास त्यांच्या वसाहतीचा आहे. थोर जागतिक किर्तीचे नेते नेल्सन मंडेला यांचे वास्तव्य असलेले शहर. त्यानीच द. आफ्रिकेचे प्रथम अध्यक्षपद भूषविलेले होते. जोहानेसबर्ग येथेच भारताचे महान नेते महात्मा गांधीजी यांचे वास्तव्य २१ वर्षे होते. त्यानी गरीब, वर्णभेदामुळे अत्याचार होत असलेल्या जनतेला जाणले. एक लढा दिला. त्यांत ते अशस्वी झाले. पुढे भारतामधील कार्य तर त्याना जागतीक स्थरावर घेऊन गेले. जोहान्सबर्गने गांधीजींची य़ोग्यता, थोरवी जाणली. त्याना अजरामर अशी श्रधांजली अर्पिली.
प्रसंगः- एक प्रसंग घडला. दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वर्णभेद, उचनीचता अतिशय प्रखरतेने मानली जात असे. एकदा ते रेल्वेने प्रवास करीत होते. गांधीजी प्रथम वर्गाच्या बोगीमध्ये रीतसर तिकीट काढून बसले होते. गाडीचा तिकीट तपासनीस तेथे आला. त्याने गांधीजीना त्या डब्यामध्ये बसण्यास हरकत घेतली. गांधीजीनी आपल्या जवळचे नियमाप्रमाणे घेतलेले प्रथम वर्गाचे तिकीट दाखविले. तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तो वर्णद्वेष्टा इंग्रज होता. तो तरुण गांधीजीवर खेकसला.
. ” Black passengers are not allowed to sit in this compartment with white persons ”
असे गांधीजीना ब्ल्याक म्हणत, इंडीयन म्हणत, फॉरीनर्स म्हणत आरोप केले. गांधीजी गोऱ्या लोकांच्या सहवासाठी अयोग्य असल्याचे व्यक्त केले. गांधीजीना हे अत्यंत अपमानकारक वाटले. त्यानी त्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. ही वर्ण भेदाची बाब उच्यायुक्ताकडे व त्यावेळच्या सकरारी दरबारांत निदर्शनास आणून देण्याचे सुचविले. त्या उर्मट उद्धट आणि मग्रुर अशा इंग्रज अधिकाऱ्याना जनाची वा मनाची लाज राखली नाही. त्याने गांधीजीना चक्क हात धरुन प्रथम वर्गाच्या डब्यातून खाली उतरुन दिले.

गाधीजीनी Bar-At Law ची पदवी घेतलेली होती. ते साऊथ आफ्रिकेमध्ये २१ वर्षे राहीले. प्रखर देशाभिमान आणि कायद्याचे ज्ञान ह्यामुळे एक वेगळेच व्यक्तीमत्व त्याना प्राप्त झाले होते.


कालाय तस्मै नमः काळाचा महीमा अगाध असतो. ते सत्य आहे. भारतातील अन्याय, वर्णभेद, उच्य-निचता, असत्य, हिंसक वृती, यांच्या विरोधांत गांधीजीनी प्रचंड झगडा दिला. जगभर शक्तीच्या जोरावर राज्य करणाऱ्या इंग्रजाना अहिंसा व सत्य ह्याच्या महामंत्राने भस्मसांत केले. इंग्रजांची जागतिक स्थरावर माघार होत गेली. हाती कोणतेही शस्त्र न घेतांच त्यांनी इंग्रजांचा पराभव केला. गांधीजी महान बनले. त्यांची योग्यता दक्षिण आफ्रिकेतील जनतेने, सरकारने तिव्रतेने जाणली. महात्माजींचा एके काळी त्यांच्याच भूमिवर करण्यांत आलेल्या अपमानाची पश्चातापपूर्ण भरपाई करण्यांत आली. ज्या वयांत गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेंत वर्णभेद व उच्यनीचतेला आवाहन दिले, त्याच वयातील ( तिशीतील ) त्यांचा पुतळा जोहान्सबर्ग आणि दरबन ह्या दोन प्रमुख शहरांत उभारला जाऊन त्या चौकांना गांधी चौक (Gandhi Square.) हे नामकरण करुन सन्मानित केले.
त्यांचा तारुण्यातील , तिशीच्या जवळपासचा पुतळा, तेजःपुंज चेहरा, उंचपुरा मात्र सडसडीत बांधेसुद अंगकाठी व्यक्त होत होता. वकीली पेहेराव घातलेला, दिसत होता. काळा मोठा कोट परिधान केलेला होता. अंगात सुटबुट टाय शर्ट चमकत होते.
आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा तारुण्यातील भव्य ब्रांझचा पुतळा बघून भाराऊन गेलो. आमचे डोळे आनंदाने, प्रेमाने, अभिमानाने, आणि आदराने भरुन आले. अश्रु स्वयंस्फूर्तीनेच आपली वाट काढीत होते. मन गहीवरुन आले होते.
आम्ही भारतामध्यें महात्मा गांधीजींचे अनेक ठिकाणी, अनेक जागी भव्य दिव्य असे पुतळे बघीतले आहेत. त्यांच्या महान कर्तृत्वाचा, सत्य आणि अहिंसा यांचा मंत्र देत हे सारे पुतळे अजरामर झाल्याचा भास होत असतो. ज्येष्ठत्व-श्रेष्ठत्व यांचे भव्य दर्शन देत, वाकून गेलेले शरीर, हाती काठी, चष्मा, तुरळक केस आणि केवळ पंचा व धोतर हा पेहेराव, मनांत इतका बसला आहे की त्यांची महान भव्यता आणि वेगळेपणा केवळ भारतीयांनांच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मा्यता पावलेले ते एक महान मानव समजले जातात.
जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथील शासनाने गांधीजींचा भव्य ब्रॉन्झचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती भागांत स्थापन केला.
चौकाला गांधी चौक (Gandhi Square.) हे नामकरण करुण करुन पुतळ्या खालती एक स्तंभ ( शिलालेख ) कोरला होता. तो असा.

M. K. Gandhi Attorney at law

Mohandas K. Gandhi was a famous figure at Johannesburg’s first law courts located on Government Square, now renamed Gandhi Square. He kept offices near the law courts from 1903 to 1910, at the corner of Rissik and Anderson Streets, and challenged racially discriminatory enactments, both inside and outside of the courts. Gandhi’s legal work soon merged with his
Satyagraha ( ‘Soul Force ‘ ) movement of passive resistance, putting his legal career behind him. Gandhi dedicated himself to a lifetime of public service.
Gandhi returned to India in 1914 after 21 full and fruitful years in South Africa.
Continuing the search for truth which he had begun in South Africa, he plunged in to India’s struggle for freedom and came to be hailed by his people as Mahatma, ‘ Great Soul ‘

Sculptor : Tinka Christopher

Unveiled by His Worship the Executive Mayor Councillor Amos Masondo,
2 October 2003

त्याच पुतळ्याच्या दुसऱ्या बाजूला स्थंभ ( शिलालेख ) कोरलेला असून त्यावरती त्यावेळचे गांधीजींचे विचार व्यक्त केलेले आहेत.

I learn during all those years to love Johannesburg even though ir was a mining camp. It was in Johannesburg that I found my most precious friends. It was in Johannesburg that the foundation for the great struggle of Passive Resistance was
Laid in the September of 1906…
Johannesburg, therefore, had the holiest of all the holy associations that Mrs. Gandhi and I will carry back to India.
M. K. Gandhi, 1914

जगातींल सर्वांत श्रीमंत व बलशाली असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा हे महात्मा गांधीजीना खूप आदरणीय स्थानावर मानतात. त्यांचे तैलचित्र हे आजही त्यांच्या भव्य कार्यालयांत दिमाखाने जगासमोर आहे.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

०० दिवाळीचा फराळ फटाके आणि दिवे.

०० दिवाळीचा फराळ फटाके आणि दिवे.

” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ” ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे
सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात जावो ही नम्र प्रार्थना. माझा ब्लॉग ” जीवनाच्या रगाड्यातून” सुरु करून थोडेच दिवस झाले. दैनंदिन जीवनातील टिपलेले साधे परंतु मार्मिक प्रसंग आणि कविता ह्यांचा आधार घेत माझे लिखाण असते. आजपावतो जवळ जवळ २९,९१८ वाचकांनी त्याचा आनंद घेतल्याचे दिसते. वाचक वर्ग हीच लेखकाची खरी शक्ती असते. सर्वाना त्याबद्दल धन्यवाद देतो. वाचकांची काव्यातील रुची आणि मजकडे असलेला माझ्याच कवितांचा संग्रह ह्याला अनुसरुन फक्त कवितेसाठी ” बागेतील तारका ” हा ब्लॉग नुकताच सादर केला आहे. आधुनिक संगणक तंत्रज्ञानाने ब्लॉग हे दालन उघडले. जो जे लिहू इच्छितो विचार व्यक्त करू इच्छितो त्यांच्यासाठी हे एक व्यासपीठ मिळालेले आहे. व्यासपीठ ही कलाकाराची, लेखकाची प्राथमिक गरज असते. पूर्वी प्रमाणे निर्माता संपादक प्रकाशक इत्यादींच्या छाननी मधून त्याला बाहेर पडण्याची आता गरज नाही. सर्व स्वत:च्या जबाबदारी वरच करा. ब्लॉग ह्या माध्यमाने वेगळीच क्रांती केलेली आहे. लेखक आणि वाचक ह्यांचा त्वरित आणि प्रत्यक्ष संबंध होऊ शकतो. तुमचे विचार, लेखन वाचक स्वीकारतात किंव्हा अव्हेरतात हे तुम्हाला लगेच कळून येते. येथे ना मध्यस्थी, ना प्रकाशक, ना संपादक, ना काह्नी आर्थिक बोजा. येथे हवे असते तुमचे” बागेतील तारका ” विचार, आवड, श्रम, आणि लेखन. ह्यात वेळेचा सदउपयोग केल्याचे तुम्हास मिळेल समाधान. गाणाऱ्या कलाकाराला जसे दूरदर्शनवर सा रे ग म प द . . अथवा Indion Idiol मूळे व्यासपीठ मिळाले तसेच Blog हे लेखकासाठी आहे. जीवन ही एक निसर्गाच देण आहे. ते चक्रमय असते.प्रत्येक क्षण वा दिवस हा वेगळच प्रसंग घेऊन येत असतो. घटनेचा गुंता करणे आणि त्याची कल्पनात्मक उकालन करणे, निसर्ग करीत असतो. बस हेच प्रसंग, ह्याच कथा असतात. तुम्ही सतर्क असाल तर बरेच विषय तुम्हास लेखनासाठी मिळू शकतात. मग ते ललित लेखन असो वा कविता.
बोल सारे अनुभवाचे त्या बोलीची भाषाच न्यारी i
सुख दुःखाच्या गुंत्यामधला अर्थ सांगतो कुणी तरी II
अथवा
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे निसर्ग शिकवी क्षणोक्षणी I
सतर्कतेने वेचून घ्यावे दैनंदिनीच्या घटनामधुनी II
” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ”
ह्या दोन मराठी ब्लॉगमार्फत तुम्हास दिवाळीची भेट देऊ इच्छितो
** सतर्कतेने जीवनातील मार्मिक प्रसंग टीपणी आणि कविता तुमच्यासाठी असेल हा फराळ.
** वाचताना होणारा आवडल्यास आनंद, अथवा न आवडल्यास संताप, हेच असतील फटाके.
** लेखनावरील सुद्ज्ञ वाचकांच्या प्रतिक्रीया, सल्ले,व मार्गदर्शन असेल दिव्याचा प्रकाश
धन्यवाद. पुन्हा दिवाळीच्या शुभेच्छा

मानसिक तणाव

माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.
अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.
शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंड कार्य क्षमताप्राप्त असे असते.
दोन गोष्टींचा शोध आजतागायत देखील लागलेला नाही. त्यांच्या बद्दल खूप माहीती, ज्ञान प्राप्त आहे. परंतु त्यांना कुणीही बघीतल नाही. ते म्हणजे एक परमेश्वर आणि दुसरे माणसाचे मन. मनाचे Physicial Existance अर्थांत शारीरिक अस्तित्व दिसत नसले, तरी त्याचा क्रियात्मक सहभाग Activity in form of Energy दिसून येतो.
मानवाने प्रकाश शक्तीला, उष्णता शक्तीला, विजेच्या शक्तीला, वादळ-वाऱ्याच्या शक्तीला, जवळ जवळ सर्व प्रकारच्या शक्तीना अंकित करण्याची कला बऱ्याच अंशी साध्य केली. मनाच्या शक्तीची कल्पना ही मानवाला युगानुयुगे आलेली आहे, परंतु आजतागायत त्या मनःशक्तीला कुणीही अंकीत करु शकले नाही. अनेक ऋषी, संत महात्मे, विद्वान मंडळी, मोठ मोठे धर्मग्रंथ यांनी मनास शांत करण्याबद्दल अनेक मार्ग सुचविले आहेत. तरी देखील त्या मनावर कुणालाही ताबा मिळवता आलेला नाही. त्या आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीला. विचारांनी प्रचंड बुद्धीमान, जागतीक मान्यतेची असलेले अनेक थोर महात्मे आपल्या चंचल मनासमोर हत्-बल झालेले आम्हाला माहीत आहेत. अध्यात्म शास्त्र, विज्ञान शास्त्र यांनी देखील मनासमोर हात टेकलेले आजतरी दिसते.
चंचलता हा मनाचा गुणधर्म. मन केव्हांच शांत, स्थीर असणार नाही. ह्या चंचल मनाच्या हालचालीमुळे जेव्हां शरिरावर शरिरामधल्या अवयवावर परिणाम होतो, त्यालाच मानसिक तणाव असे सर्वसाधारण म्हणतात. शरिरामध्ये होणऱ्या व्याधीला जेव्हां मन ही संकल्पना जबाबदार असते वा ठरते, तेव्हां आपण हे सारे मानसिक तणावामुळे झाले असे संबोधतो. जर सुक्ष्म पद्धतीने विचार केला तर आजचे शरिर विज्ञान सांगते की जवळ जवळ सर्वच रोगांचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मनाच्या हलचालीमुळे मानसिक तणावामुळे निर्माण झालेले असते.
याचा अर्थ सुदृढ शरिर केवळ सुदृढ मनामुळेच असू शकते. Healthy Mind in Healthy body म्हणतात. ते ह्यालाच.
शरिरावर राज्य करते ते तुमचे मन. तुम्हाला सम्राट बनवते ते मन आणि भिकारी करुन टाकते तेही तुमचे मन. जगाच्या इतिहासांत आजपर्यंत अनेकजणानी जसे ऋषीमुनी, संत महात्मे, विचारवंत, विद्वान, निरनिराळे धर्म व त्यांचे गुरुजन यांनी मनावर ताबा मिळवण्याचे अनेक मार्ग सुचविले. पण खऱ्या अर्थाने कुणासही त्यात आजपर्यंत यश आलेले नाही. मनाच्या चंचल गुणधर्माचे आणि त्याच मनामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचे महत्व येथेच दिसून येते.
ज्या घटना जीवनामध्ये घडत असतात, त्याना तीन कारणे प्रामुख्याने असतात.
१) वातावरण, जे निसर्ग निर्मीत असते.
२) परिस्थिती, जी मानव निर्मीत असते, आणि
३) वैयक्तीक स्वभाव विशेष.
ह्या जणू घटनेच्या त्रिकोणाच्या तिन बाजू ठरून घटना होत जाते. जीवनचक्रामध्ये घडणाऱ्या घटना ह्या निसर्ग निर्मीत वा ईश्वर निर्मीत केव्हांच नसतात. मात्र आपण त्या घटना निर्माण करण्यास कारणीभूत असतो. व्यक्ती तितके स्वभाव. स्वभाव तितक्या घटना. प्रत्येक घटना अनेक अनुभवाना जन्म देत असते. हेच भिन्न भिन्न स्वभाव पुन्हा विविध घटना घडण्यास कारणीभूत होत असतात. असेच जीवनाचे चक्र चालू राहते. घटनांच्या क्रियांचा आपल्या मनावरचा परिणाम म्हणजे सुखदुःखाच्या लाटांची निर्मीती.
घटना व प्रसंग कसे घडतात हे प्रथम जाणले पाहीजे. त्या ईश्वराची वा निसर्गाची एक महान कलाकृती व योजना ही घटनांच्या माध्यमामधून दिसून येत असते. निसर्गाने त्याचे नियम केलेले आसतात.ते सतत, सारखे आणि निश्चीत पद्धतीने चालत असतात. ह्या मध्ये क्रिया वा प्रतिक्रीया घडत असतात. घटना ज्या घडत असतात, त्या फक्त निसर्गाच्या चाकोरीमधूनच. प्रत्येकजण हाच घटनांचा निर्माता असतो. ह्यामध्ये ईश्वराची भूमिका वा प्रत्यक्ष सहभाग केव्हांच नसतो. घटना धडण्याचे स्वातंत्र आणि परिणाम ह्याचा प्रत्यक्ष आपल्याशीच असतो.
घटना ह्या आवडणाऱ्या, भावणाऱ्या असतात तशाच त्या न आवडणाऱ्या देखील असतात. घटना ह्या सुख दुःखाच्या लाटा निर्माण करीत असतात. त्या नेहमी प्रासंगीक असतात. परंतु कोणतीही सुख दुःखाची लाट ही “मानसिक तणाव निर्माण

करते” ह्या सदरांत मोडत नसते. निसर्ग वा काळ अशा घटनाना शारिरीक हानी न पोहंचू देता, सर्व सुसाह्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ह्याच घटनामधून जन्म होतो, निर्मीती होते ती तुमच्या स्वभाव रचनेची. हाच अत्यंत महत्वाचा धागा आहे, पायरी आहे, मानसिक तणावाची. तुमचा निर्माण झालेला स्वभाव, तुमच वागण, हे जेव्हां सभोवतालच्या परिस्थितीवर आघात करतो, त्याचवेळी जन्म होतो मानसिक तणावाचा.
म्हणून अत्यंत महत्वाचे – अत्यंत महत्वाचे – म्हणजे प्रत्येकांचे स्वभाव हेच मानसिक तणाव याची चौकट निर्माण करीत असतात. कोणतीही आवती भोवतीची परिस्थिती नव्हे. हे निसर्गाचे वरदान समजा.

दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी जेथे सततचे घर्षण होत राहते. भाग कठीण होतो. जाडसा होतो अथवा त्याचे पापूद्रे निघून – Pilling Off होत जाते. ह्याचा एकच अर्थ, जेव्हा त्या भागावर सतत त्याच प्रकारचा आघात होत राहतो, परिणाम दिसून येतो.
मेंदूचे कार्य अर्थात विचार करण्याचे. आणि हे कार्य सतत होत असते. विचारांची उत्पती हे जिवंतपणाचे लक्षण असून, त्यामुळे मेंदूला सतत चेतना मिळत राहते. मेंदूचे हे एक प्रकारे खाद्यच आहे. असे म्हटले तर वावगे ठरु नये. विचारांचे मार्ग एका दिशेने जाणे चागंले. त्याला लय असते. विचार भरकटत राहणे चांगले नव्हे. मनन, चिंतन, ध्यान creative विचार शोधबुद्धीचे विचार आध्यात्मिक विचार हे मेंदूला एकप्रकारे शांतता देते. त्याला कारण विचारांना एक दिशा, लय असते. विचार जेव्हा विखूरलेले असतात धावपळ करतात असंबध असता आणि सर्वांत निर्माण होणे हे धोक्याचे ठरते. अशी वैचारिक ठेवण शरिराला म्हणजे इतर अवयवांना धोका वा आघात निर्माण करु शकतात. ह्यालाच आपण तणाव म्हणतो. विचार करणे हेच तर मेंदूचे कार्य परंतू जेव्हा तोच तोच विचार सतत घोळत राहतो तणाव निर्माण करतो.
माणसाला विवेक शक्ती दिलेली आहे. घटनांचे विश्लेषण करणे, त्यामधली सत्यता, नैसर्गिक परिणाम, जीवन चाकोरीवरील त्याचा आघात हे सारे आपण विवेकी विचारांनी ठरवू शकतो.
होणाऱ्या घटनेत तुमच्या विचार करण्याने काही बदल होऊ शकतो. आणि जेव्हा हे आपल्या मनाला चांगले मान्य होते, तेव्हा तो विचार बाद करणे काढून टाकणे,त्याला प्रयत्नपूर्वक मनात येवू न देणे चांगले. जर तुमची विवेकबुद्धी, समजदारी सुस्थिर असेल तर तुमचे गैरविचार उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेला तुम्ही रोखू शकता. अशा विचारांना चालना न देणे, त्याच्या लयीमध्ये न जाणे हे तुमच्या हाती असू शकते. तुमच्या स्वभावाची ठेवण ह्यास कारणीभूत असते. जो स्वभाव तुम्ही तुमच्या वागण्याच्या पद्धतीने निर्माण केलेला असतो. कित्येकजण प्रत्येक घटनाच्या प्रसंगाच्या मागे जावून त्यांत गुंतून राहण्यात समाधानी होतात. मग त्याचा संबंध नजदीकचा असो वा नसो. त्याच वृत्तीमधून त्या त्या घटनेबद्दल सतत विचार करण्याची सवय जडते. हेच विचारांचे चर्वण शरिराला धोकादायक ठरु शकते. ह्याचा परिणाम म्हणजेच मानसिक तणाव .
२ एक उदाहरण देतो. कुणाचे १०० रुपये हरवतात तर कुणाचे १००० रुपये हरवतात. हे दोन्ही निश्चित की दोन्ही घटनांनी दुख होईल आणि विचारांच्या लगभगीमुळे तुमचे मन विचलीत होईल. कदाचित, ह्यालाच क्षणिक मानसिक तणाव संबोधता येईल. अशा मानसिक तणावांचा शरीरावर परिणाम होण्यासाठी असा तणाव सतत उत्पन्न झालेला असावा केवळ निर्माण झालेला विचार घातक नसतो तर तोच तोच विचार घोळत राहणे हे त्रासदायक असू शकते. येथे तुमचा स्वभाव विशेष असे होण्यास भाग पाडतात, पैसे हरवले ह्या बद्दल थोडीशी खंत करुन आपल्या विश्लेषणात्मक विचारांनी स्वत:ची समज घालतात आणि तो विचार मनांतून काढून टाकतात. ह्या उलट काही पैसे कसे हरवले ह्या बद्दल सतत सर्वांना वाच्यता करुन तोच तोच विषय घोळत राहतात. तणाव म्हणतात तो हाच. पैसे किती हरवले, नुकसान किती झाले ह्यावर मानसिक तणाव अवलंबून नसतो.
निसर्गाने त्याच्या चक्रात अनेक लहान मोठे आणि काही तर भयावह प्रसंग निर्माण केलेले असतात. परंतू त्याचवेळी स्व सान्तवन, समजदारी प्रसंगामधून पुन्हा उभारी येण्याची कला माणसाला दिली आहे. अशी कला ही उन्नत


करावी लागते. त्याच वेळीप्रसंगाची धार बोथट होऊ शकते. सुसह्य होवू शकते. अशाच वृत्तीची माणसे मानसिक तणावापासून आपला बचाव करु शकतात.
१०० रु याच्यापेक्षा १००० रु हरवणे म्हणजे जास्त मानसिक तणाव हे वैद्यकिय शास्त्रामध्ये साधे अंकगणित नव्हे. किती रुपयाच्या हानीचा विचार कितीवेळा हेच गणिताचे उत्तर ठरवितो.
थोडेसे वैद्यकिय विश्लेषनाकडे जावू या. मेंदूमध्ये विचार करण्याचे एक अवयव असते. ते सतत चेतना मिळून कार्यरत असते. म्हणून विचार धारा सतत वाहत असते. जसे ह्रदयाचे ठोके, श्वासोच्छवास, तसेच मेंदूचे विचार कार्य सतत Non-Stop चालू असते. अगदी झोपेमध्ये -विचार उत्पन्न होतो, पसरतो आणि नाहीसा होतो. ही समजण्यास सोपी चक्र- रचना. विचारांची साठवण होत जाते. काळाप्रमाणे व प्रसंगाच्या तिव्रतेनुसार आठवणी लोप पाऊ लागतात.
जर विचार मंथनाचा आलेख काढला, तर हे एक सत्य आहे की विचार उत्पन्न होताच, तो पूर्णतेने आघात करतो. मग त्याला उत्पन्न करणारी चेतना कितीही छोटी असो. ग्राफ काढला तर काटा प्रत्येक विचार चेतनेला प्रथम सर्वोच्य जागी नेतो. व नंतर पायापाशी येत असतो. लहान चेतनेचा विचार आलेख चटकन पायाजवळ जाईल व जर चेतना फार प्रभावी असेल तर तीला पायाजवळ येण्यास वेळ लागेल. अर्थ असा की १०० रु. हरवले हे दोन दिवसांत विसरले जातील. वा १००० रु हरवलो हे चार दिवसात (समजण्यासाठी)
३ मात्र दोन्ही चेतना उत्पन्न होताना, विचारातील सर्वोच्य जागी गेल्याचे दर्शविले. जेव्हा विचार उत्पन्न होतो, तेव्हा तो प्रथम सर्वोच्य बिंदू गाठतो. असेच विचार सतत उत्पन्न होत राहतील तर प्रत्येक वेळी ते सर्वोच्य बिंदू गाठत राहतील. येथे मानसिक तणावाचा संबंध येतो. सतत तोच तोच विचार करण्यामुळे, विचार चेतना सतत जागृत राहते. हेच धोक्याचे ठरु शकते. त्यालाच मानसिक तणाव निर्मिती म्हणतात. तुमची वैचारिक ठेवण कशी असते, तुमच्या स्वभावाची ठेवण कशी तयार झालेली असते हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वैचारिक घटनांची सतत उजळणी करण्याचे त्या घटनांचे विश्लेषण करीत राहण्याचे काहींचे स्वभाव बनलेले असतात. अशी माणसे विचारांच्या विश्लेशनात्मक बाबींना फारसे महत्त्व देत नसतात. ते भावनिक बाबींना सतत समोर आणून भावनिक विश्लेषण करीत राहतात. त्यामुळे अशी माणसे तो विशिष्ट विचार मनातून दूर शकत नाहीत. स्वत:ला असमर्थ ठरवितात. विचार केला तर अशा भावनिक बाबींवर विचारला व्यवहारिक दबावाने, सत्य परिस्थितीचे अवलोकन करुन छेद देणे अशक्य नसते. ते अशी माणसे करीत नाहीत. अशानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
मी माझे एक मित्र बघितले मी. वैद्य ते आणि मी गेली पाच वर्षे सततच्या सहवासात आहोत. दररोज संध्याकाळी भेटतो. बागेत फिरण्यास जातो. गप्पा-टप्पा होतात. सामाजिक विषय, राजकारण, देवधर्म बदलत जाणारा समाज, भूतकाळातील नोकरी व्यवसाय ह्यामधल्या रोमांचित प्रसंग इत्यादी विषयावर सततच्या गप्पा गोष्टी होत असतात. कुटूंब वा वैयक्तीक जीवनावर केव्हाच भाष्य होत नाही. संध्याकाळची निरामय वेळ कशी घालवावी व आनंद घ्यावा ही सर्वसाधारण धारणा.
एका प्रसंगामध्ये मी सहज विचारणा केली, वैद्य साहेब आपण कुठे राहता? त्यांनी सोसायटीचे नाव सांगितले. घरी कोण कोण असते? आम्ही दोघेच. मी व माझी पत्नी. तुम्हाला काही मुले? मी चौकशी केली. वैद्य एकदम गप्प झाले. “नशीब आमचे, २७ वर्षांचा मुलगा होता. तरूण मुलगा, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला.
आमच्याकडे राहयचा. दुर्दैवाने अपघात झाला व त्यातच तो खलास झाला.” वैद्यांचे डोळे पाणावले होते. आज त्याला जाऊन तीन वर्षे झाली. ते खिन्न मनाने सांगत होते.
स्वत:चा एकूलता एक मुलगा, तरूण जीवनाच्या चक्राला हातभार लावणार आणि काळाच्या आघातामध्ये एकदम पडद्याआड होणे ही किती भयावह व दुख:द घटना आहे. मला नाही वाटत ह्या घटनेपेक्षा कोणत्याही घटनेची तिव्रता जास्त भयावह व परिणामर करणारी असू शकेल. परंतू एक गोष्ट मला जाणवली की माझा व वैद्यांचा सहवास पाच वर्षांपासून सततचा होता. परंतू तरीही मला ह्या घटनेची केव्हाच चाहूल लागली नाही. त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. न कोणता प्रसंग निर्माण झाला की ह्यांनी ती मला इतरांना सांगावी.

ह्यालाच स्वभाव विशेष म्हणतात. घटना घडली, तुफान निर्माण झाले, ते वादळच होते. थोड्याशा वेळेनंतर स्थिरस्थावर झाले. वैद्य रडले असतील, ओरडले असतील, त्यांची झोप, भुक काही दिवस त्यांना साथ सोडून गेली असेल. दुख:च्या त्या कोसळलेल्या डोंगरानी कोपाता आघात केला नसेल. परंतू ते दुखः ही पचविले होते. काळ प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवणी विसरण्यास सतत मदत करीत असतो. निसर्गाचे हे चक्र आहे. ही इश्वरी इच्छा म्हणून त्याला आपण मान्यता द्यावी ही समजदारी. जी माणसे त्याला वैचारीक विश्लेशन करुन विसरत नाहीत, प्रसंगाना बाजूस सारत नाहीत, भावनीक चक्रातच अडकून राहतात,त्यानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
एखादी भयानक, दुर्भाग्यपूर्ण, सहनशक्तीचा अंत बघणारी घटना घडते – जसे सख्यातल्याचा अनैसर्गिक मृत्यू, जन्मभर साठवलेली पूंजी नष्ट होणे, इत्यादी – एकदम प्रचंड आघात होतो, दुःखाचा डोंगर कोसळतो, हे नैसर्गिक आहे. परंतु ह्यातून स्वतःला सावरणे है काहीजण करतात. जीवनाच्या सुख दुःखाच्या चक्राचा विचार करतात. दुनियामे आये है तो जीनाही पडेगा । जीवन हे जहर तो पिनाही पडेगा । हे तत्वज्ञान ही मानसे बाळगतात. अशीच माणसे तणावमुक्त जीवन जगू शकतात.
एखादा पाच किलो वजन घेवून काही अंतर चालतो. त्याचे हात दुखू लागतात. त्याला दम लागतो. थकवा वाटू लागतो. कारण तो त्या त्या अवयवावर तान देत असतो.आणि ती अवयवे तसे दर्शवितात.मात्र मेंदूमध्ये प्रचंड वैचारीक क्षमता असते. त्यामुळे तुमच्या मेंदूला क्षिणता आली हे लगेच होत नसते. मात्र क्षिण झालेला मेंदू
( Fatigued Brain) त्याचे परिणाम इतरत्र पसरवून इतर अवयवावर परिणाम करतो. त्यालाच ‘ मानसिक तणाव ‘ म्हणता येईल.
आजकालचे वैद्यकिय शास्त्र तर असे म्हणते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मूळ हे मानसिक तणावातून उत्पन्न होते. ज्या वेळी त्याच्या म्हणजे उत्पन्न झालेल्या विचार लहरी जशा जशा त्या त्या अवयवावर आघात करतात, ते ते अवयव त्या त्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दाखवतात. मग ह्रदय विकार, रक्तदाब डायबेटीस, किडनीचे विकार, डोळ्या, कानाचे विकार वा आतड्यांचे विकार असोत, सर्वांचा केंद्रबिंदू शेवटी वैचारीक जडन-घडनापर्यंत जावून पोहचतो. अर्थात मेंदूचे आपले विकार ह्यातून सूटलेले नाहीत. म्हणून मानसिक तणावाला फार महत्व आसते.

मन हे शरीराच्या निरनीरीळ्या अवयांवर कशाप्रकारे परिणाम करते व त्या अवयवाला व्याधीगृस्त बनविते हे आपण आता बघणार आहोत.
भरकटणारे आणि अशांत विचारांचे वादळ मेंदूला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्यास भाग पाडते. मेंदू थकून जातो. क्षिणता भासते. Fatigue Sense येतो. बेचैनी अवस्था वाढते. आपण त्याला कस् कस् वाटते असे म्हणतो. कुणी त्याला कंटाळा आला म्हणतात. कुणाला ताप आला वाटते. पण ताप मोजता ताप Normal असतो. दिवस कसा सुना सुना निरुच्छाही वाटतो. हे सारे मनाचे मेंदूवर होणारे आघांत. कोणतेही देहकार्य चालते ते उर्जा शक्तिवर. मेंदूवर पडत असलेला मनाचा वाढता तणाव हा देखील मेंदूसाठी जादा उर्जाशक्तीची मागणी करतो. उर्जेचा स्रोत हवा, पाणी, व अन्न ह्या नैसर्गिक घटक पदार्थामध्ये असतो. हे सारे बाहेरुन मिळणारे पदार्थ निरनीराळ्या अवयवामार्फत रक्तात जमा होतात. रक्ताच्या माध्यमातून शरीराला त्याचा पुरवठा होत असतो. मागणी त्याप्रमाणे पुरवठा हे तत्व शरीराला देखील लागू पडते. मेंदूच्या वाढत्या उर्जा मागणीमुळे ह्रदय, फुफूस, आतडी, किडणी, ह्या सर्व अवयवावर ताण पडू लागतो. अर्थात कालांतरानंतर त्या त्या प्रकारचे परिणाम व्यक्त होऊ लागतात. रक्त दाब, डायबेटीस, डोळ्याचे विकार, किडणीचा त्रास, अशी अनेक व्याधी मानसिक तणावामुळे उत्पन्न होतात. वैद्यकिय शास्त्र तर सांगते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मुळ हे


मानसिक तणावांत असते. तणावामुळे अवयव अशक्त बनत जातात. बाहेरुन होणारे आजार हे देखील अशा पिढागृस्त अवयवावरच आघांत करतात. सर्वांचे मुळ असते मानसिक तणाव.
काही दिवसापूर्वी फिरण्यास गेलो असताना बस स्टँड जवळून जात होतो. माझे एक मित्र एकनाथराव ह्यांची भेट झाली. ते आपली छोटी ब्रिफकेस कुठेतरी गावाला जाण्याच्या गडबडीमध्ये होते.
” काय गडबडीत आहात? ”
”हो मी जरा नाशिकला जावून येतो. संध्याकाळीच परत येईन. एका यात्रेसाठी देव दर्शनाला जावून येतो ”
बस स्टँडवर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होती. अनेक बसेसची ये-जा चालू होती. मी तसा रीकामाच होतो.त्यांना साथ देत त्यांची गाडी येई पर्यंत गप्पा मारीत उभा होतो. गाडी आली, स्टँडवर लागली. सर्व प्रवासी गर्दी करुन गाडीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करु लागली. तुफान गर्दी. सर्वांची धावपळ जागा पकडण्यासाठी व दारामधून आत शिरण्यासाठी. माझे मित्र एकनाथराव देखील धावून त्या गर्दीत सामील झाले. लोक एकमेकावर तुटून पडले होते. आत शिरण्याची सर्वांची एकच गर्दी. एकनाथराव दारापर्यंत गेले, दारात कन्डक्टर (वाहक) होता. धक्का बुक्कीला तोंड देत ते तिथ पर्यंत गेले. तेथूनच ते ओरडले, ” कन्डक्टर माझे रिझरव्हेशन आहे. ११ नंबरची माझी जागा आहे. मला आत येवू द्या. ”
मी सर्व गडबड, प्रवाश्यांची गर्दी धावपळ बघत होतो. एकनाथरावांचे मी देखील ऐकले. मी लगेच पूढे गेलो व त्यांचा हात पकडून मागे येण्याची सूचना केली.
ते ” का? ” म्हणून म्हणाले. परंतू मी त्यांना त्या प्रचंड गर्दीतून बाहेर काढले. ” अहो येवढी प्रचंड गर्दी, गोंधळ आहे, तुम्ही इजा करुन बसाल. तुमच्या जवळ रिझरव्हेशन आहे ना? मग तुम्हीपण त्या गर्दीत का जात आहात. ”
बघा हा मानवी स्वभावाचा एक नमुना . एकनाथरावांचे रिझरव्हेशन आहे. त्यांना बसण्यासाठी जागा निश्चीतच दिली जाणार. परंतु कित्येकजण धावपळ करीत, गडबड करीत आपल्या ठरलेल्या जागेपर्यंत जाणार, सिटवर बसणार किंवा सामान पिशवी ठेवणार, मगच त्याना समाधान वाटते, शांतता वाटते. एकदा जागा मिळवली की बस ठिक झाले, ही त्यांची धारणा.
जागा आरक्षीत केलेली असताना हे महत्वाचे. इतर प्रसंगी असे असू शकेल. मानसीक तणावाखाली राहणारी ही माणस एखादी गोष्ट मिळवणे, मिळणे त्यासाठीचे प्रयत्न समजने योग्य. परंतू ती गोष्ट जर तुम्हाला निश्चीतच मिळत असेल तर मग धडपड कशासाठी.
एक दुसरे उदाहरण देतो, माझा मित्र डॉक्टर सदानंद लिमये. आम्ही १२ वीत म्हणजे Premedical च्या वेळी तो संपूर्ण राज्यात प्रथम आला होता. कौतुक, बक्षीसे झाली. कॉलेजसाठीच्या प्रवेश पत्रीका भरल्या. सर्वांत प्रथम येणारा म्हणजे वैद्यकीय विद्यालयात जागा मिळणार, ह्यात थोडी देखील शंका नव्हती. ते त्याने केले परंतू त्याच बरोबर साधा B.SC ह्या विषयाचा फॉम भरुन एका सायन्स कॉलेज मध्ये देखील फॉम भरला. आपली प्रवेशाची निश्चीती माहीत असून देखील.
अशाच पध्दती प्रमाणे अनेक विद्यार्थी निरनिराळ्या शाखामध्ये प्रवेश घेवून ठेवतात. प्रसंगी फी भरुन देखील. विशेष गंमत म्हणजे त्या वेळच्या पध्दतीनुसार जे १० विद्यार्थी प्रथम क्रमांकात उत्तीर्ण होत असत, त्यांना काही वैद्यकीय वा इंजिनीयरींग कॉलेज शुभेच्छा देवून त्या हूशार विद्यार्थांनी त्यांच्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा हे कळवीले


जात असे. सदानंद यालापण हे भाग्य लाभले. म्हणजे इतकी निश्चिती असून देखील त्याने साध्या सायन्स मार्गासाठीदेखील अर्ज भरला होता.
संशय,भिती, अनिश्चीतता हे भावनीक गुणधर्म मानसिक तणाव निर्माण करतात. जे स्वभावाने प्रत्येक गोष्टीत सांशक असतात त्यांना आत्मविश्वास कमी वाटतो. अशाच स्वभावाच माणसे मानसिक तणावाचे बळी पडतात.

मी एका बँकेमध्ये गेलो होतो. पैसे काढायचे होते. इतर बरेच जण रांगेत होते. मी कॅशरकडे बघत होतो. पैसे घेणे, पैसे देणे, नोटा भराभर मोजणे, त्या एकत्र बांधणे, बांधलेल्या गड्यामधून नोटा घेणे, मोजता मोजता गिऱ्हाईकांशी मध्येच बोलणे, फोन मोबाईल घेणे, बोलणे, कुणीतरी कर्मचारी मागून आला तर त्याच्याशी बोलणे. अशी अनेक छोटी छोटी व त्याच्या प्रमुख कामाना व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी तो सहज करीत होता. हजारो नव्हे लाखोच्या नोटा तो हाताळत होता. कल्पना येते की थोडीशी चुक त्याच्या हिशोबांत प्रचंड तफावत निर्माण करु शकते. पण ते तो सार सहजतेने करीत होता.
डॉक्टर सुध्दा मोठे मोठे ऑपरेशन करताना देहामधल्या अवयवांची काटछाट, रक्तस्त्राव, तो टिपणे, रक्त नलीका बांधने, रक्तस्त्राव थांबवणे, अवयवांची जुळवा-जुळव असे एक नव्हे अनेक थरारक गोष्टी सहजतेने करताना दिसतात. गंमत म्हणजे हे सारे ते करीत असताना, इतर सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारीत असतात. चालू खेळ, चालू राजकारण वा सिनेमे इत्यादी अनेक विषयांवर ती बोलतात. मात्र ऑपरेशनमध्ये बाधा न येता, सारे कसे सहज केल्या प्रमाणे वाटते.
अशाच प्रकारे अनेक व्यवसाय असतात, ज्यांच्या कामामध्ये जेवढे लक्ष केंद्रीत करण्याची गरज असते, त्याचवेळी धोका होण्याचा, नुकसान होण्याची खूपच शक्यता वाटते. अशी माणसे मानसिक तणावामध्ये सतत असतील असा ग्रह इतरांचा असतो. परंतु असे मुळीच नसते. व्यवसाय आणि मानसिक तणाव ह्या भिन्न गोष्टी आहेत.
एक तत्व असे आहे. प्रत्येक व्यक्ती त्याची जेवढी बुध्दी असेल, त्याच्या फक्त १५ ते २० टक्केच तो ती वापरत असतो. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो. ह्याचाच दुसरा अर्थ प्रत्येक व्यक्ती कार्य कुशल झाल्यानंतर जी बुध्दीची क्षमता वापरतो ती एखाद्या यंत्राप्रमाणे होवून जाते. वैचारिक बुध्दीचा,भावनेचा तेथे सहभाग नसतो. ते त्याचे काम मेकॅनीकल होवून जाते.
थोडेसे सतर्क राहून तो ज्या ज्या गोष्टी करतो त्या केवळ रोबोट अर्थात मानव यंत्राप्रमाणेच असतात. आधी फिड केलेलेच नंतर आपोआप बाहेर येवू लागते. जर नवीन क्रियेशन वा नुतन निर्मीती असेल, तरच जादा बुध्दीची अवशक्ता असते. दैनंदीन कार्याला अत्यल्प बुध्दीचा वापर होतो हे जर लक्षात आले, तर “तुमचे कार्य तणाव निर्माण करणारे आहे ” हा विचार शिथील होईल. कोणत्याही क्षेत्रात जा डॉक्टर, इंजिनीयर, वकील, सी.ए वा कलाकार, नट त्यांचे कार्य फक्त चाकेरी बध्द असते.इतरांना कदाचित्, महान अप्रतीम असे वाटेल, परंतु ते त्या व्यक्तीच्या अंगवळणी पडते व त्यात सहजता येते. दैनंदीन कार्यात मेंदूचा वापर कमी असल्यामुळे तणाव नसतो.अभ्यासानंतर कोणत्याही दैनंदीन कार्यात बुध्दी क्षमतेचा सहभाग फारच अल्प असतो.येथे ती व्यक्ती तणावमुक्त असते.मानसिक तणाव अशा वेळी कल्पनेने निर्माण केले जातात.चाकोरीबध्द कामे करताना बुध्दीवर ताण पडत नसतो.
परंतु विचारांचा मार्ग थोडासा वेगळा झाला की तो तणाव निर्माण करु शकतो.


०० जीवनाचे एक महान सत्य असते. जे भगवत् गीतेमध्ये देखील सांगितलेले आहे.
जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.
जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये कोणत्या ना कोणत्या रीतीने तुम्हास फायदा होतो. पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या फायद्याबाबत नेहमी विचार करु नका.
आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ आहात. ६०-७० वा अधिक वर्षे आपण जीवनाची खर्च केलीत. जर मागे वळून बघितल, तर तुम्हास दिसून येईल की तुम्ही लहान असताना ज्या जीवनाच्या मार्गाचा विचार केलांत, घटना कश्या व्हाव्यांत ही स्वप्ने रंगविलीत, तसे मुळीच झालेले नाही. सर्वच मार्ग एकदम भिन्न होत गेले. घटनाही वेगळ्या होत गेल्या. तरी देखील प्रत्येकजण म्हणेल
“भले कष्टमय जीवन का असेना, पण मी चांगल जगलो. मला माझ्या क्षमते नुसार, योग्यतेनुसार मिळत गेले.”
निसर्ग हा शेवटच्या अंकात तुम्हाला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
“जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.”
हे जर जीवनाचे तत्वज्ञान असेल, तर ते तुमच्या अन्तरमनातून मान्य करीत जा. तशी स्वभावाची ठेवण निर्माण करा. अशा माणसाला सुख वा दुःख दोन्हीही सहज पचवण्याची शक्ती मिळत असते. मानसिक तणाव येथे कमी जाणवतो.

००० केवळ वर्तमानकाळातच जगा

भूतकाळातील चुकांबाबत पश्चाताप करु नका. भविष्याची चिंता करु नका. वर्तमान फक्त सफल करण्याकरीता संपूर्ण लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस आपल्या हातात आहे. आज आपण रचनात्मक कार्य कराल तर कालच्या चुका सुधारतील आणि भविष्यांत निश्चितच फायदा होईल.
जीवन हे चक्रमय असते. काल्पनिक शक्तीनुसार तीन काळांत त्याचे विभाजन केले गेले. गेलेला तो भूतकाळ, येणारा तो भविष्यकाळ, आणि चालू सद्यःस्थितीतला तो वर्तमानकाळ. जरी हे तीन काळ वाटत असले तरी खऱ्या अर्थाने, फक्त दोन काळाचेच अस्तित्व माणसासाठी असते. भविष्य काळ येतो, वर्तमान काळाच्या सीमारेषेवरून छलांग मारीत भूतकाळांत अदृष्य होतो. भले काल्पनिक असो, वा असत्य असो, जगायचं असतं आम्हाला ते फक्त वर्तमान काळांत. तणावरहीत जगायचं असेल तर केवळ वर्तमान- काळाचा सहारा घेऊनच जगावं लागेल.भूतकाळातील अनुभव, कर्तृत्व यांची आठवण येणे चांगले, परंतु ते वर्तमान काळाचा आधार होऊ शकत नाही. भूतकाळातील गणितांची सांगड वर्तमानकाळाशी घालू नका. भविष्यकाळ तर अनिश्चित असल्यामुळे कल्पनेच्या झेपांना जागृत राहून आकार देत चला. फक्त वर्तमान काळांत जगण्याची संवय अंगीं ठेवा.
मानवी १०० वर्षाच्या मर्यादेत, तूम्ही सतत फक्त १० वर्षे जगण्याची वृत्ती मनाशी बाळगा. भूतकाळातली ५ वर्षे ही अनुभव व मार्गदर्शनासाठी आणि भविष्य काळातली फक्त ५ वर्षे जीवनाच्या योजने प्रित्यर्थ. पंचवार्षिक योजने प्रमाणे. ही योजना व्यवहारीक जीवनाची सांगड घालेल. वैचारीक झेप आणि कल्पना विलास यांना पायबंध घालेल. अशी आखणी तणावशीथिलता जीवनांत आणेल.

०० यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा.

जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात. तो तुमच्या आवडी निवडीवर, स्वभावावर ठेच पोहोंचवतो. कित्तेकदा तुम्हाला अपमानीत झाल्याचा अनुभव येतो. तुमचा अहंकार डिवचला जातो. येथेच तुमच्या शांत स्वभावाची परिक्षा होत असते. मला माहीत आहे की आपण कोणी संत महात्मे वा साधूपुरुष नव्हेत. परंतु तुम्ही जर समजदारीची भूमिका घेतली तर येवू घातलेल्या मानसिक तणावाच्या चक्रातून जाण्याचे टाळू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे संघर्ष हे उत्तर नसत. कोणत्या घटनेला किती प्राधान्य द्यायच, त्यांत किती तिवृतेने स्वतःला गुंतवून ठेवायच ह्याचा तुम्ही शांततेने विचार करु शकतां. काहीं व्यक्तीतर वर्षानुवर्षे सुडाच्या वातावरणात, अहंकाराच्या चकरामध्ये आपले आयुष्य घालवितात. ही आमच्या घराण्याची दुष्मनी आहे, अशी दर्पोक्ती करण्यात त्याना धन्यता


वाटते. आयुष्य कशासाठी व किती असते हाच मुळ प्रश्न ते जाणत नाही. व्यवहारिक दृष्टीने असल्या संघर्षामधून काहींही उत्पन्न होत नसते. फक्त
Ego, मीपणा, अहंभाव, याना खतपाणी देण्यातच त्यांच जीवन खर्च होत. ही एक वृत्ती बनते. हा स्वभाव घातक तर ठरतोच पण मानसिक तणावाला कारणीभूत ठरतो. काय करावे ह्या यातना देणारय़ा संबंधी. चिंतन करा, विचार करा, कांही मार्ग सुचतो कां हे बघा. वेगळ्या वातावरणाची निर्मिती करा. क्षमा याचनेचा विचार करा आणि जर अत्यंत कठीण व अशक्य वाटत असेल तर अशांच्या सहवासातून स्वतःबाजूस व्हा. संपर्क टाळा. अशा व्यक्तीना विसरुन जाण्याचा प्रयत्न करा.
हे मी फक्त ठोकताळे सांगतो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना, आणि सहवासामधली जवळीक ही भिन्न असू शकते. परिस्थितीजन्य उपाय योजना ह्या तुम्हालाच घ्यावयाच्या असतात. जे कराल ते शांततेने व शांततेसाठीच असावे. मानसिक तणावाला प्राधान्य देत.

००० सृष्टी एकविशाल नाटक- एक रंगभूमी

अस म्हणतात की हे जग, ही सृष्टी, एकविशाल नाटक आहे. एक रंगभूमी आहे.आणि आपण सर्वजण कलाकार आहोत. प्रत्येकाची भूमिका वेगळी व स्वतंत्र असते. कुणाचीही भूमिका एक सारखी नसते. भिन्नता आणि तरीही त्या त्या भूमिकेतील वैशिष्ठपूर्णता, हाच निसर्गाचा चमत्कार असतो.
एखाद्या नाटकांत कुणी राजाची भूमिका करतो तर कुणी भिकारय़ाची.त्या भूमिका ते कशी वठवतात, ह्यावरच त्या कलाकाराचे यश असते. जीवनाच्या ह्या रंगभूमिवर देखील प्रत्येकाने ज्याच्या नशिबी जी भूमिका आलेली असेल ती तशीच हूबेहूब करणे, हे अपेक्षित असते.


नाटकांत देखील भिकारी आपल्या कर्तृत्वाने, हिमतीने राजा बनू शकतो. तसाच राजा आपल्याच दुर्गुणाने, मुर्खपणाने राज्यपद गमावतो.
भिकारी बनतो. हे सत्य आपण बघतो. जीवनाच्या लढ्यात, संघर्षात देखील क्षमता, योग्यता, कर्तृत्व, हिम्मत याना मोठे स्थान असते.
मानसिक तणाव येतो कोठे ?
ज्यावेळी अशी माणसे स्वतःमधील क्षमता, योग्यता विसरतात. कसलेही प्रयत्न करीत नसतात. केवळ इच्छेने, विचाराने इतरांच्या यशाबद्दल कल्पना करतात. मला हे ईश्वराने कां दिले नाही ? याची तक्रार करतात. परिस्थितीला, वातावरणाला बोल लावतात. अशांचे जसे स्वभाव गुणधर्म तयार होतात, त्याला मानसिक तणावामध्ये ढकलतात. दुसरय़ाचे शेत अशाना नेहमी हिरवेगार वाटत असते. आपल शेत देखील कसे हिरवेगार करता येइल, ह्याचा ते प्रयत्न ते करीत नसतात.
अशांच्या स्वभावात निर्माण झालेली वैचारीक ठेवण, त्याना सतत विचारांमध्ये लोटते. तेच मानसिक तणावगृस्त होतात.
जीवनाच्या ह्या रंगभूमिवर, इतर भूमिकांचा अवास्तव विचार न करता, जो आपली स्वतःची अपेक्षीत भूमिका चांगली वठवतो, तोच जीवनात यशस्वी होतो. हीच मानसे तणावरहीत जीवन जगू शकतात.
एक मित्र आहे. त्याच दुकान आहे. खूप मेहनत करतो. व्यवसायांत चांगली कमाई करतो. परंतु जे त्याला मिळत, त्यात सदैव निराश असतो.
तो बघ कंपनीत नोकर आहे, बस महीना संपला की हाती पगार.
तो Contractor आहे. एखादे काम केले की भरपूर पैसे. माझ्या कामासारखी रोजची आणि सतत किच किच नाही. प्रत्येक अभिनेता आपला श्रेष्ठ अभिनय सादर करीत असतो. म्हणून कोणाच्याही अभिनयाला पाहून चिंतीत होऊ नका.

००० सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.
एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे ( Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोऱ्यानी बांधलेला.

दोऱ्यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते. त्यामुळे तो खांब केव्हांही स्थिर नसतो. मात्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विचारांचे तुफान, परिस्थितीचा मारा, घटनांची वर्दळ ही सारी त्या जीवनतंबूंच्या खांबाचे दोर असतात. ते जीवनाच्या खांबाला अस्थिर वा स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या ह्या हालचालीच मानसिक तणाव निर्माण करतात. संसारिक प्रश्नांचा तुमच्या जीवनावर पडणारा भडिमार आणि तुम्हाला त्याची करावी लागणारी सोडवणूक, हेच तर तुमच्या जीवनाच्या यशाचे कौशल्य असते. ह्याचे ठोकताळे नाहीत. परंतु एक मार्गदर्शन असते. नेहमी निर्माण झालेल्या प्रश्नांमधून त्वरित एका प्रश्नाची निवड करा. त्याचे उत्तर शोधा. कोणत्या प्रश्नाला प्राधान्य द्यावयाचे, हे ती त्यावेळची परिस्थितीच तुमचे मार्गदर्शन करेल. तुम्ही फक्त मन शांत ठेवून, सारासार विचाराला प्राधान्य देत चला. एका नंतरच दुसरा प्रश्न समोर घ्या. त्याची उकल करा. संभ्रमित होऊ नका. तुमचा आत्मविश्वास, संकल्पना, व धडाडी सारे प्रश्न सुलभ करतील. त्यावेळी तेथे मानसिक तणाव येणार नाही.
एक सुंदर उदाहरण देतो. माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. लग्न समारंभ खूपच चांगला, आनंद व उत्साहाने चालू होता. बराच मित्रपरिवार जमला होता. माझी भेट माझे मित्र श्री एकनाथराव यांच्याशी झाली. गप्पा टप्पा, अभिनंदन झाले. मी सभामंडपांत बसलो होतो. लग्न सोहळा सुरु झाला.
अचानक माझे लक्ष गेले की तेथे एकनाथराव दिसत नव्हते. लग्नाची वेळ आणि मुलीचे वडील कोठे गेले. मी चौकशी केली. मला उत्तर मिळाले नाही. असतील इकडे तिकडे असे मोघम उत्तर मिळत गेले. जशी जशी वेळ जाऊ लागली, मी बेचैन झालो. सारे त्या तगमगीत बघत बसलो. लग्न लागले. अभिनंदन झाले. सर्वांच्या जेवण्याच्या पंगती बसल्या. जेवणे झाली, परंतु एकनाथराव मात्र दिसले नाही. मन शंकाकुशंका करु लागले. लग्नात, वऱ्हाडी माणसांत काहींतरी बिनसले असेल, हा विचार येवू लागला. परंतु ना माहिती ना उपाय. शांत बसून मी लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांना हजेरी देत गेलो.चार तास झाले. श्री एकनाथराव आल्याचे कळले. ते खोलीत बसले होते. मी लगेच त्याना भेटण्यास गेलो.
मजकडे बघून ते किंचीत् हसले. ” Any Problem ? ” मी त्याना उत्सुकतेने विचारले. त्यानी शेजारी झोपलेल्या त्यांच्या नातवाकडे बोट दाखविले. त्याच्या पायाचे हाड मोडले होते. Fracture झाले होते. नुकतेच प्लास्टर करुन आणले होते. हा खेळत असताना पडला. त्याचा पाय मोडला.
मुलीचा लग्न समारंभ होता. त्यामध्ये विघ्न निर्माण होऊ लागले होते. एका महत्वाच्या प्रश्नांची ते सोडवणूक करीत होते. प्रासंगीक निर्माण झालेल्या प्रश्नाची तिवृता ही त्या क्षणी जास्त महत्वाची वाटली. प्रसंग आणि निर्णय हेच जीवनांचे अत्यंत महत्वाचे टप्पे असतात.

तुमच्या यशाचे गमक तुमच्या निजी प्रश्नांची सोडवणूक आणि प्राध्यान्य (Solution and Priority ) यांत असते. योग्य वेळी योग्य विचार हे मानसिक तणावापासून संरक्षण करतात.

०० जेवढे होईल तेवढे दुसऱ्यास सहकार्य करण्याचा प्रयत्न करुन दुसऱ्यास सहायक झाल्यास आपण आपली चिंता विसरुन जाल.
स्वभावामध्ये काहीं चांगले गुणधर्म जोपासावे लागतात. ते तुमच्या मनाला आनंदी व समाधानी ठेवण्यास हातभार लावतात. जसे इतरांना सहकार्य करणे. हे प्रासंगिक न बनता, म्हणजे एखाद्या प्रसंगी तुम्ही कुणाची मदत केली असे न होता, मदत करण्याची वृत्ती अंगी बाळगावी. सहाय्य सर्वतोपरी क्षमतेनुसार असावे. तुमची मदत तुमच्या अहंकाराला खतपाणी देणारी न बनता ती तुमच्या समाधान वृत्तीला चेतना देणारी असावी. ह्यासाठी मदत करा व विसरुन जा. वाच्यता नको. ह्यानी तुमची आत्मिक शांतता मात्र सदैव तेवत राहील. कारण हा सहाय्य करणे ईश्वरी गुणधर्म असतो. मानसिक तणाव रहीस हे जगणे असेल.

कित्येक घटनासाठी तुम्ही प्रचंड प्रमाणात प्रयत्न करीत असतात. तुम्हाला यश येत नाही. निराशा मानसिक तणाव निर्माण करते. त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. तुमच साध्य कदाचित् योग्य असू शकेल, परंतु मार्ग चुकीचे निवडले गेले असतील. त्यावर चिंतन करा. सल्ला घ्या. तुमच्या विचारांना गरज वाटल्यास बदला. मीपणा, Ego अहंकार हे विचाराना नेहमी हानीकारक ठरतात. तुमच्यामध्ये विचारांची क्षमता असते. शांत राहून करीत असलेल्या मार्गाना,

१०
विचारांना बदला. बदललेला दृष्टीकोन कदाचित् तुमच्या दुःखाचे सुखांत परिवर्तन करु शकेल. ह्यात मानसिक तणाव कमी होइल.

०० अस म्हणतात की कमळाच्या फुलाभोवती बागडणारा भवरा हा आपल्या आनंदात इतका मग्न होऊन जातो की त्याला रात्र होऊ लागलेली कळत नाही. फुलांच्या पाकळ्या सांजसमयी मिटून जात असतात. भवरा त्यातच अडकून जातो. गुदमरुन प्राण गमवतो. आनंदी वातावरण आणि सभोवताल हे जेव्हां विसरले जाते, जीवनाला ते घातक ठरु शकते. कित्येक चांगली माणसे, थोर समाजसेवक, निस्वार्थी भावनेने इतरांना प्रेम, आनंद, सहकार्य, अशा महान मानवी गुणधर्मांत व्यग्र असतात. सारे सद् हेतूने होत असते. पण मनाला काय चांगल वा काय वाईट. कोणत्याही विचारांचा अतिरेक होऊ लागला की मन तणाव निर्माण करते. आपण देखील अशा थोर व्यक्तीना म्हणतोच प्रकृतीचा काळजी घेत चला. धवपळीत व्याधी सुरु होतील. व्याधी ह्या विचारांच्या मारय़ामुळे उत्पन्न होत असतात. मग विचार कसेही असोत. स्वभाव अशा विचारांच्या उत्पन्नाला खतपाणी घालत असतात.
००० एक महान तत्वज्ञान आहे की जी गोष्ट तुम्ही बदलू शकत नाही ती मान्य करा. त्याबद्दल विचार करीत राहून आपला मानसिक तणाव वाढू नका. प्रत्येक घटनावर वेळ हे अप्रतिम श्रेष्ठ औषध असते. प्रचंड दुःखाचे, निराशेचे प्रसंग देखील काळाच्या ओघांत शिथील होऊन विसरले जातात. निसर्गाचे हे वरदान असते. ज्या व्यक्ती ही समज

मनाशी बाळगतात, ते मानसिक तणावापासून बचाव करण्यात यशस्वी होतात. त्यांची समजदार वृत्तीच त्याना सदैव समाधानी ठेवण्यास मदत करते.

००० कित्येक वेळा आपण काहीं स्वभाव दुर्गुण विनाकारण मनाशी बाळगतो. ती नंतर नैसर्गीक वृत्ती बनते. ज्यांत जरी क्षणिक मानसिक समाधान दिसून आले, तरी ते तुम्हास मानसिक तणावाखाली नेवून ठेवते. तुम्ही ती गोष्ट मुदाम करीत नसतात. पण केवळ वैचारीक ठेवन म्हणून तुम्ही अशा विचारांकडे ओढले जातात. जसे इर्षा, बदला घेण्याची भावना, गैरसमज, तुलनात्मक स्पर्धा करण्याची वृत्ती (Un-healthy Competition) इत्यादी. कित्येकदा हे आपण विनाकारण अंगी बाळगतो. क्षणिक मोठेपणा मिरवण्यासाठी हे कदाचित् होत असेल. ती वेळ निघून जाते, परंतु तुम्हाला अशांत मन करते. तुमच मन खात राहते. तुमचा स्वभाव Guilty Consciousness बनतो. अशा वृत्तीची माणसे सतत निराशेचे एक वलय बाळगुन असतात. असेच मानसिक तणावाला बळी पडतात. वाईट प्रवृत्ती बाळगण्याला कष्ट लागत नसतात. ते सहजतेने होते म्हणून सामान्य त्याकडे झुकतात. चांगले गुणधर्म बाळगणे याला श्रम लागतात. परंतु तेच तुमच्या मनाला शांततेकडे घेवून जातात. मानसिक तणावरहीत तुमचे जीवन बनते.

००० जे होत आहे वा होणार आहे- ते चांगल्यासाठीच.
महान शक्ती ईश्वरा समोर नतमस्तक, अभिवादन, चिंतन करा.

तुम्ही आस्तिक असाल वा नास्तिक. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वभाव. परंतु एक सत्य सारे जग मान्य करते. ते हे की ह्या जगामधल्या वा विश्वामधल्या सर्व घडामोडी कोणत्या तरी शक्तीमुळे वा उर्जेमुळे होत असतात. त्या शक्तीला मान द्या. मग तो कुणी ईश्र्वर समजून वा निसर्ग संबोधित. कोणत्याही महान शक्तीसमोर तुमचे नतमस्तक, अभिवादन, हे तुमच्या अभिमानी, अहंकारी, मनावर सतत पांघरुण घालेल. तुमच्यात राहिलेला सुक्ष्म अहंकार मानसिक जो असंतुलन निर्माण करतो, त्यावर तुमची सद्सद्- विवेक बुद्धी सतेज ठेवील. तुम्ही चांगले, समजदार, प्रेमळ बनण्यास मदत करेल. सर्वात महत्वाचे म्हणजे मनाच्या चंचलतेवर अंकूश ठेवण्यासाठी हा प्रभावी उपाय असेल. आपल्या सर्व चिंता त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करा. दररोज थोडा वेळ ईश्वर चिंतन करा. प्रणायाम करा. योगासने करा. व्यायाम घेत जा. त्यामुळे मानसिक व शारीरिक परिवर्तन होते. तसेच मानसिक तणाव कमी होऊन स्वास्थ्य लाभते.

मानसिक तणाव हा लेख येथे पूर्ण.
धन्यवाद
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मानसिक तणाव

मानसिक तणाव

माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.
अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.
शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंड कार्य क्षमताप्राप्त असे असते.
दोन गोष्टींचा शोध आजतागायत देखील लागलेला नाही. त्यांच्या बद्दल खूप माहीती, ज्ञान प्राप्त आहे. परंतु त्यांना कुणीही बघीतल नाही. ते म्हणजे एक परमेश्वर आणि दुसरे माणसाचे मन. मनाचे Physicial Existance अर्थांत शारीरिक अस्तित्व दिसत नसले, तरी त्याचा क्रियात्मक सहभाग Activity in form of Energy दिसून येतो.
मानवाने प्रकाश शक्तीला, उष्णता शक्तीला, विजेच्या शक्तीला, वादळ-वाऱ्याच्या शक्तीला, जवळ जवळ सर्व प्रकारच्या शक्तीना अंकित करण्याची कला बऱ्याच अंशी साध्य केली. मनाच्या शक्तीची कल्पना ही मानवाला युगानुयुगे आलेली आहे, परंतु आजतागायत त्या मनःशक्तीला कुणीही अंकीत करु शकले नाही. अनेक ऋषी, संत महात्मे, विद्वान मंडळी, मोठ मोठे धर्मग्रंथ यांनी मनास शांत करण्याबद्दल अनेक मार्ग सुचविले आहेत. तरी देखील त्या मनावर कुणालाही ताबा मिळवता आलेला नाही. त्या आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीला. विचारांनी प्रचंड बुद्धीमान, जागतीक मान्यतेची असलेले अनेक थोर महात्मे आपल्या चंचल मनासमोर हत्-बल झालेले आम्हाला माहीत आहेत. अध्यात्म शास्त्र, विज्ञान शास्त्र यांनी देखील मनासमोर हात टेकलेले आजतरी दिसते.
चंचलता हा मनाचा गुणधर्म. मन केव्हांच शांत, स्थीर असणार नाही. ह्या चंचल मनाच्या हालचालीमुळे जेव्हां शरिरावर शरिरामधल्या अवयवावर परिणाम होतो, त्यालाच मानसिक तणाव असे सर्वसाधारण म्हणतात. शरिरामध्ये होणऱ्या व्याधीला जेव्हां मन ही संकल्पना जबाबदार असते वा ठरते, तेव्हां आपण हे सारे मानसिक तणावामुळे झाले असे संबोधतो. जर सुक्ष्म पद्धतीने विचार केला तर आजचे शरिर विज्ञान सांगते की जवळ जवळ सर्वच रोगांचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मनाच्या हलचालीमुळे मानसिक तणावामुळे निर्माण झालेले असते.
याचा अर्थ सुदृढ शरिर केवळ सुदृढ मनामुळेच असू शकते. Healthy Mind in Healthy body म्हणतात. ते ह्यालाच.
शरिरावर राज्य करते ते तुमचे मन. तुम्हाला सम्राट बनवते ते मन आणि भिकारी करुन टाकते तेही तुमचे मन. जगाच्या इतिहासांत आजपर्यंत अनेकजणानी जसे ऋषीमुनी, संत महात्मे, विचारवंत, विद्वान, निरनिराळे धर्म व त्यांचे गुरुजन यांनी मनावर ताबा मिळवण्याचे अनेक मार्ग सुचविले. पण खऱ्या अर्थाने कुणासही त्यात आजपर्यंत यश आलेले नाही. मनाच्या चंचल गुणधर्माचे आणि त्याच मनामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचे महत्व येथेच दिसून येते.
ज्या घटना जीवनामध्ये घडत असतात, त्याना तीन कारणे प्रामुख्याने असतात.
१) वातावरण, जे निसर्ग निर्मीत असते.
२) परिस्थिती, जी मानव निर्मीत असते, आणि
३) वैयक्तीक स्वभाव विशेष.
ह्या जणू घटनेच्या त्रिकोणाच्या तिन बाजू ठरून घटना होत जाते. जीवनचक्रामध्ये घडणाऱ्या घटना ह्या निसर्ग निर्मीत वा ईश्वर निर्मीत केव्हांच नसतात. मात्र आपण त्या घटना निर्माण करण्यास कारणीभूत असतो. व्यक्ती तितके स्वभाव. स्वभाव तितक्या घटना. प्रत्येक घटना अनेक अनुभवाना जन्म देत असते. हेच भिन्न भिन्न स्वभाव पुन्हा विविध घटना घडण्यास कारणीभूत होत असतात. असेच जीवनाचे चक्र चालू राहते. घटनांच्या क्रियांचा आपल्या मनावरचा परिणाम म्हणजे सुखदुःखाच्या लाटांची निर्मीती.
घटना व प्रसंग कसे घडतात हे प्रथम जाणले पाहीजे. त्या ईश्वराची वा निसर्गाची एक महान कलाकृती व योजना ही घटनांच्या माध्यमामधून दिसून येत असते. निसर्गाने त्याचे नियम केलेले आसतात.ते सतत, सारखे आणि निश्चीत पद्धतीने चालत असतात. ह्या मध्ये क्रिया वा प्रतिक्रीया घडत असतात. घटना ज्या घडत असतात, त्या फक्त निसर्गाच्या चाकोरीमधूनच. प्रत्येकजण हाच घटनांचा निर्माता असतो. ह्यामध्ये ईश्वराची भूमिका वा प्रत्यक्ष सहभाग केव्हांच नसतो. घटना धडण्याचे स्वातंत्र आणि परिणाम ह्याचा प्रत्यक्ष आपल्याशीच असतो.
घटना ह्या आवडणाऱ्या, भावणाऱ्या असतात तशाच त्या न आवडणाऱ्या देखील असतात. घटना ह्या सुख दुःखाच्या लाटा निर्माण करीत असतात. त्या नेहमी प्रासंगीक असतात. परंतु कोणतीही सुख दुःखाची लाट ही “मानसिक तणाव निर्माण

करते” ह्या सदरांत मोडत नसते. निसर्ग वा काळ अशा घटनाना शारिरीक हानी न पोहंचू देता, सर्व सुसाह्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ह्याच घटनामधून जन्म होतो, निर्मीती होते ती तुमच्या स्वभाव रचनेची. हाच अत्यंत महत्वाचा धागा आहे, पायरी आहे, मानसिक तणावाची. तुमचा निर्माण झालेला स्वभाव, तुमच वागण, हे जेव्हां सभोवतालच्या परिस्थितीवर आघात करतो, त्याचवेळी जन्म होतो मानसिक तणावाचा.
म्हणून अत्यंत महत्वाचे – अत्यंत महत्वाचे – म्हणजे प्रत्येकांचे स्वभाव हेच मानसिक तणाव याची चौकट निर्माण करीत असतात. कोणतीही आवती भोवतीची परिस्थिती नव्हे. हे निसर्गाचे वरदान समजा.

दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी जेथे सततचे घर्षण होत राहते. भाग कठीण होतो. जाडसा होतो अथवा त्याचे पापूद्रे निघून – Pilling Off होत जाते. ह्याचा एकच अर्थ, जेव्हा त्या भागावर सतत त्याच प्रकारचा आघात होत राहतो, परिणाम दिसून येतो.
मेंदूचे कार्य अर्थात विचार करण्याचे. आणि हे कार्य सतत होत असते. विचारांची उत्पती हे जिवंतपणाचे लक्षण असून, त्यामुळे मेंदूला सतत चेतना मिळत राहते. मेंदूचे हे एक प्रकारे खाद्यच आहे. असे म्हटले तर वावगे ठरु नये. विचारांचे मार्ग एका दिशेने जाणे चागंले. त्याला लय असते. विचार भरकटत राहणे चांगले नव्हे. मनन, चिंतन, ध्यान creative विचार शोधबुद्धीचे विचार आध्यात्मिक विचार हे मेंदूला एकप्रकारे शांतता देते. त्याला कारण विचारांना एक दिशा, लय असते. विचार जेव्हा विखूरलेले असतात धावपळ करतात असंबध असता आणि सर्वांत निर्माण होणे हे धोक्याचे ठरते. अशी वैचारिक ठेवण शरिराला म्हणजे इतर अवयवांना धोका वा आघात निर्माण करु शकतात. ह्यालाच आपण तणाव म्हणतो. विचार करणे हेच तर मेंदूचे कार्य परंतू जेव्हा तोच तोच विचार सतत घोळत राहतो तणाव निर्माण करतो.
माणसाला विवेक शक्ती दिलेली आहे. घटनांचे विश्लेषण करणे, त्यामधली सत्यता, नैसर्गिक परिणाम, जीवन चाकोरीवरील त्याचा आघात हे सारे आपण विवेकी विचारांनी ठरवू शकतो.
होणाऱ्या घटनेत तुमच्या विचार करण्याने काही बदल होऊ शकतो. आणि जेव्हा हे आपल्या मनाला चांगले मान्य होते, तेव्हा तो विचार बाद करणे काढून टाकणे,त्याला प्रयत्नपूर्वक मनात येवू न देणे चांगले. जर तुमची विवेकबुद्धी, समजदारी सुस्थिर असेल तर तुमचे गैरविचार उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेला तुम्ही रोखू शकता. अशा विचारांना चालना न देणे, त्याच्या लयीमध्ये न जाणे हे तुमच्या हाती असू शकते. तुमच्या स्वभावाची ठेवण ह्यास कारणीभूत असते. जो स्वभाव तुम्ही तुमच्या वागण्याच्या पद्धतीने निर्माण केलेला असतो. कित्येकजण प्रत्येक घटनाच्या प्रसंगाच्या मागे जावून त्यांत गुंतून राहण्यात समाधानी होतात. मग त्याचा संबंध नजदीकचा असो वा नसो. त्याच वृत्तीमधून त्या त्या घटनेबद्दल सतत विचार करण्याची सवय जडते. हेच विचारांचे चर्वण शरिराला धोकादायक ठरु शकते. ह्याचा परिणाम म्हणजेच मानसिक तणाव .
२ एक उदाहरण देतो. कुणाचे १०० रुपये हरवतात तर कुणाचे १००० रुपये हरवतात. हे दोन्ही निश्चित की दोन्ही घटनांनी दुख होईल आणि विचारांच्या लगभगीमुळे तुमचे मन विचलीत होईल. कदाचित, ह्यालाच क्षणिक मानसिक तणाव संबोधता येईल. अशा मानसिक तणावांचा शरीरावर परिणाम होण्यासाठी असा तणाव सतत उत्पन्न झालेला असावा केवळ निर्माण झालेला विचार घातक नसतो तर तोच तोच विचार घोळत राहणे हे त्रासदायक असू शकते. येथे तुमचा स्वभाव विशेष असे होण्यास भाग पाडतात, पैसे हरवले ह्या बद्दल थोडीशी खंत करुन आपल्या विश्लेषणात्मक विचारांनी स्वत:ची समज घालतात आणि तो विचार मनांतून काढून टाकतात. ह्या उलट काही पैसे कसे हरवले ह्या बद्दल सतत सर्वांना वाच्यता करुन तोच तोच विषय घोळत राहतात. तणाव म्हणतात तो हाच. पैसे किती हरवले, नुकसान किती झाले ह्यावर मानसिक तणाव अवलंबून नसतो.
निसर्गाने त्याच्या चक्रात अनेक लहान मोठे आणि काही तर भयावह प्रसंग निर्माण केलेले असतात. परंतू त्याचवेळी स्व सान्तवन, समजदारी प्रसंगामधून पुन्हा उभारी येण्याची कला माणसाला दिली आहे. अशी कला ही उन्नत


करावी लागते. त्याच वेळीप्रसंगाची धार बोथट होऊ शकते. सुसह्य होवू शकते. अशाच वृत्तीची माणसे मानसिक तणावापासून आपला बचाव करु शकतात.
१०० रु याच्यापेक्षा १००० रु हरवणे म्हणजे जास्त मानसिक तणाव हे वैद्यकिय शास्त्रामध्ये साधे अंकगणित नव्हे. किती रुपयाच्या हानीचा विचार कितीवेळा हेच गणिताचे उत्तर ठरवितो.
थोडेसे वैद्यकिय विश्लेषनाकडे जावू या. मेंदूमध्ये विचार करण्याचे एक अवयव असते. ते सतत चेतना मिळून कार्यरत असते. म्हणून विचार धारा सतत वाहत असते. जसे ह्रदयाचे ठोके, श्वासोच्छवास, तसेच मेंदूचे विचार कार्य सतत Non-Stop चालू असते. अगदी झोपेमध्ये -विचार उत्पन्न होतो, पसरतो आणि नाहीसा होतो. ही समजण्यास सोपी चक्र- रचना. विचारांची साठवण होत जाते. काळाप्रमाणे व प्रसंगाच्या तिव्रतेनुसार आठवणी लोप पाऊ लागतात.
जर विचार मंथनाचा आलेख काढला, तर हे एक सत्य आहे की विचार उत्पन्न होताच, तो पूर्णतेने आघात करतो. मग त्याला उत्पन्न करणारी चेतना कितीही छोटी असो. ग्राफ काढला तर काटा प्रत्येक विचार चेतनेला प्रथम सर्वोच्य जागी नेतो. व नंतर पायापाशी येत असतो. लहान चेतनेचा विचार आलेख चटकन पायाजवळ जाईल व जर चेतना फार प्रभावी असेल तर तीला पायाजवळ येण्यास वेळ लागेल. अर्थ असा की १०० रु. हरवले हे दोन दिवसांत विसरले जातील. वा १००० रु हरवलो हे चार दिवसात (समजण्यासाठी)
३ मात्र दोन्ही चेतना उत्पन्न होताना, विचारातील सर्वोच्य जागी गेल्याचे दर्शविले. जेव्हा विचार उत्पन्न होतो, तेव्हा तो प्रथम सर्वोच्य बिंदू गाठतो. असेच विचार सतत उत्पन्न होत राहतील तर प्रत्येक वेळी ते सर्वोच्य बिंदू गाठत राहतील. येथे मानसिक तणावाचा संबंध येतो. सतत तोच तोच विचार करण्यामुळे, विचार चेतना सतत जागृत राहते. हेच धोक्याचे ठरु शकते. त्यालाच मानसिक तणाव निर्मिती म्हणतात. तुमची वैचारिक ठेवण कशी असते, तुमच्या स्वभावाची ठेवण कशी तयार झालेली असते हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वैचारिक घटनांची सतत उजळणी करण्याचे त्या घटनांचे विश्लेषण करीत राहण्याचे काहींचे स्वभाव बनलेले असतात. अशी माणसे विचारांच्या विश्लेशनात्मक बाबींना फारसे महत्त्व देत नसतात. ते भावनिक बाबींना सतत समोर आणून भावनिक विश्लेषण करीत राहतात. त्यामुळे अशी माणसे तो विशिष्ट विचार मनातून दूर शकत नाहीत. स्वत:ला असमर्थ ठरवितात. विचार केला तर अशा भावनिक बाबींवर विचारला व्यवहारिक दबावाने, सत्य परिस्थितीचे अवलोकन करुन छेद देणे अशक्य नसते. ते अशी माणसे करीत नाहीत. अशानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
मी माझे एक मित्र बघितले मी. वैद्य ते आणि मी गेली पाच वर्षे सततच्या सहवासात आहोत. दररोज संध्याकाळी भेटतो. बागेत फिरण्यास जातो. गप्पा-टप्पा होतात. सामाजिक विषय, राजकारण, देवधर्म बदलत जाणारा समाज, भूतकाळातील नोकरी व्यवसाय ह्यामधल्या रोमांचित प्रसंग इत्यादी विषयावर सततच्या गप्पा गोष्टी होत असतात. कुटूंब वा वैयक्तीक जीवनावर केव्हाच भाष्य होत नाही. संध्याकाळची निरामय वेळ कशी घालवावी व आनंद घ्यावा ही सर्वसाधारण धारणा.
एका प्रसंगामध्ये मी सहज विचारणा केली, वैद्य साहेब आपण कुठे राहता? त्यांनी सोसायटीचे नाव सांगितले. घरी कोण कोण असते? आम्ही दोघेच. मी व माझी पत्नी. तुम्हाला काही मुले? मी चौकशी केली. वैद्य एकदम गप्प झाले. “नशीब आमचे, २७ वर्षांचा मुलगा होता. तरूण मुलगा, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला.
आमच्याकडे राहयचा. दुर्दैवाने अपघात झाला व त्यातच तो खलास झाला.” वैद्यांचे डोळे पाणावले होते. आज त्याला जाऊन तीन वर्षे झाली. ते खिन्न मनाने सांगत होते.
स्वत:चा एकूलता एक मुलगा, तरूण जीवनाच्या चक्राला हातभार लावणार आणि काळाच्या आघातामध्ये एकदम पडद्याआड होणे ही किती भयावह व दुख:द घटना आहे. मला नाही वाटत ह्या घटनेपेक्षा कोणत्याही घटनेची तिव्रता जास्त भयावह व परिणामर करणारी असू शकेल. परंतू एक गोष्ट मला जाणवली की माझा व वैद्यांचा सहवास पाच वर्षांपासून सततचा होता. परंतू तरीही मला ह्या घटनेची केव्हाच चाहूल लागली नाही. त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. न कोणता प्रसंग निर्माण झाला की ह्यांनी ती मला इतरांना सांगावी.

ह्यालाच स्वभाव विशेष म्हणतात. घटना घडली, तुफान निर्माण झाले, ते वादळच होते. थोड्याशा वेळेनंतर स्थिरस्थावर झाले. वैद्य रडले असतील, ओरडले असतील, त्यांची झोप, भुक काही दिवस त्यांना साथ सोडून गेली असेल. दुख:च्या त्या कोसळलेल्या डोंगरानी कोपाता आघात केला नसेल. परंतू ते दुखः ही पचविले होते. काळ प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवणी विसरण्यास सतत मदत करीत असतो. निसर्गाचे हे चक्र आहे. ही इश्वरी इच्छा म्हणून त्याला आपण मान्यता द्यावी ही समजदारी. जी माणसे त्याला वैचारीक विश्लेशन करुन विसरत नाहीत, प्रसंगाना बाजूस सारत नाहीत, भावनीक चक्रातच अडकून राहतात,त्यानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
एखादी भयानक, दुर्भाग्यपूर्ण, सहनशक्तीचा अंत बघणारी घटना घडते – जसे सख्यातल्याचा अनैसर्गिक मृत्यू, जन्मभर साठवलेली पूंजी नष्ट होणे, इत्यादी – एकदम प्रचंड आघात होतो, दुःखाचा डोंगर कोसळतो, हे नैसर्गिक आहे. परंतु ह्यातून स्वतःला सावरणे है काहीजण करतात. जीवनाच्या सुख दुःखाच्या चक्राचा विचार करतात. दुनियामे आये है तो जीनाही पडेगा । जीवन हे जहर तो पिनाही पडेगा । हे तत्वज्ञान ही मानसे बाळगतात. अशीच माणसे तणावमुक्त जीवन जगू शकतात.
एखादा पाच किलो वजन घेवून काही अंतर चालतो. त्याचे हात दुखू लागतात. त्याला दम लागतो. थकवा वाटू लागतो. कारण तो त्या त्या अवयवावर तान देत असतो.आणि ती अवयवे तसे दर्शवितात.मात्र मेंदूमध्ये प्रचंड वैचारीक क्षमता असते. त्यामुळे तुमच्या मेंदूला क्षिणता आली हे लगेच होत नसते. मात्र क्षिण झालेला मेंदू
( Fatigued Brain) त्याचे परिणाम इतरत्र पसरवून इतर अवयवावर परिणाम करतो. त्यालाच ‘ मानसिक तणाव ‘ म्हणता येईल.
आजकालचे वैद्यकिय शास्त्र तर असे म्हणते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मूळ हे मानसिक तणावातून उत्पन्न होते. ज्या वेळी त्याच्या म्हणजे उत्पन्न झालेल्या विचार लहरी जशा जशा त्या त्या अवयवावर आघात करतात, ते ते अवयव त्या त्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दाखवतात. मग ह्रदय विकार, रक्तदाब डायबेटीस, किडनीचे विकार, डोळ्या, कानाचे विकार वा आतड्यांचे विकार असोत, सर्वांचा केंद्रबिंदू शेवटी वैचारीक जडन-घडनापर्यंत जावून पोहचतो. अर्थात मेंदूचे आपले विकार ह्यातून सूटलेले नाहीत. म्हणून मानसिक तणावाला फार महत्व आसते.

मन हे शरीराच्या निरनीरीळ्या अवयांवर कशाप्रकारे परिणाम करते व त्या अवयवाला व्याधीगृस्त बनविते हे आपण आता बघणार आहोत.
भरकटणारे आणि अशांत विचारांचे वादळ मेंदूला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्यास भाग पाडते. मेंदू थकून जातो. क्षिणता भासते. Fatigue Sense येतो. बेचैनी अवस्था वाढते. आपण त्याला कस् कस् वाटते असे म्हणतो. कुणी त्याला कंटाळा आला म्हणतात. कुणाला ताप आला वाटते. पण ताप मोजता ताप Normal असतो. दिवस कसा सुना सुना निरुच्छाही वाटतो. हे सारे मनाचे मेंदूवर होणारे आघांत. कोणतेही देहकार्य चालते ते उर्जा शक्तिवर. मेंदूवर पडत असलेला मनाचा वाढता तणाव हा देखील मेंदूसाठी जादा उर्जाशक्तीची मागणी करतो. उर्जेचा स्रोत हवा, पाणी, व अन्न ह्या नैसर्गिक घटक पदार्थामध्ये असतो. हे सारे बाहेरुन मिळणारे पदार्थ निरनीराळ्या अवयवामार्फत रक्तात जमा होतात. रक्ताच्या माध्यमातून शरीराला त्याचा पुरवठा होत असतो. मागणी त्याप्रमाणे पुरवठा हे तत्व शरीराला देखील लागू पडते. मेंदूच्या वाढत्या उर्जा मागणीमुळे ह्रदय, फुफूस, आतडी, किडणी, ह्या सर्व अवयवावर ताण पडू लागतो. अर्थात कालांतरानंतर त्या त्या प्रकारचे परिणाम व्यक्त होऊ लागतात. रक्त दाब, डायबेटीस, डोळ्याचे विकार, किडणीचा त्रास, अशी अनेक व्याधी मानसिक तणावामुळे उत्पन्न होतात. वैद्यकिय शास्त्र तर सांगते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मुळ हे


मानसिक तणावांत असते. तणावामुळे अवयव अशक्त बनत जातात. बाहेरुन होणारे आजार हे देखील अशा पिढागृस्त अवयवावरच आघांत करतात. सर्वांचे मुळ असते मानसिक तणाव.
काही दिवसापूर्वी फिरण्यास गेलो असताना बस स्टँड जवळून जात होतो. माझे एक मित्र एकनाथराव ह्यांची भेट झाली. ते आपली छोटी ब्रिफकेस कुठेतरी गावाला जाण्याच्या गडबडीमध्ये होते.
” काय गडबडीत आहात? ”
”हो मी जरा नाशिकला जावून येतो. संध्याकाळीच परत येईन. एका यात्रेसाठी देव दर्शनाला जावून येतो ”
बस स्टँडवर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होती. अनेक बसेसची ये-जा चालू होती. मी तसा रीकामाच होतो.त्यांना साथ देत त्यांची गाडी येई पर्यंत गप्पा मारीत उभा होतो. गाडी आली, स्टँडवर लागली. सर्व प्रवासी गर्दी करुन गाडीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करु लागली. तुफान गर्दी. सर्वांची धावपळ जागा पकडण्यासाठी व दारामधून आत शिरण्यासाठी. माझे मित्र एकनाथराव देखील धावून त्या गर्दीत सामील झाले. लोक एकमेकावर तुटून पडले होते. आत शिरण्याची सर्वांची एकच गर्दी. एकनाथराव दारापर्यंत गेले, दारात कन्डक्टर (वाहक) होता. धक्का बुक्कीला तोंड देत ते तिथ पर्यंत गेले. तेथूनच ते ओरडले, ” कन्डक्टर माझे रिझरव्हेशन आहे. ११ नंबरची माझी जागा आहे. मला आत येवू द्या. ”
मी सर्व गडबड, प्रवाश्यांची गर्दी धावपळ बघत होतो. एकनाथरावांचे मी देखील ऐकले. मी लगेच पूढे गेलो व त्यांचा हात पकडून मागे येण्याची सूचना केली.
ते ” का? ” म्हणून म्हणाले. परंतू मी त्यांना त्या प्रचंड गर्दीतून बाहेर काढले. ” अहो येवढी प्रचंड गर्दी, गोंधळ आहे, तुम्ही इजा करुन बसाल. तुमच्या जवळ रिझरव्हेशन आहे ना? मग तुम्हीपण त्या गर्दीत का जात आहात. ”
बघा हा मानवी स्वभावाचा एक नमुना . एकनाथरावांचे रिझरव्हेशन आहे. त्यांना बसण्यासाठी जागा निश्चीतच दिली जाणार. परंतु कित्येकजण धावपळ करीत, गडबड करीत आपल्या ठरलेल्या जागेपर्यंत जाणार, सिटवर बसणार किंवा सामान पिशवी ठेवणार, मगच त्याना समाधान वाटते, शांतता वाटते. एकदा जागा मिळवली की बस ठिक झाले, ही त्यांची धारणा.
जागा आरक्षीत केलेली असताना हे महत्वाचे. इतर प्रसंगी असे असू शकेल. मानसीक तणावाखाली राहणारी ही माणस एखादी गोष्ट मिळवणे, मिळणे त्यासाठीचे प्रयत्न समजने योग्य. परंतू ती गोष्ट जर तुम्हाला निश्चीतच मिळत असेल तर मग धडपड कशासाठी.
एक दुसरे उदाहरण देतो, माझा मित्र डॉक्टर सदानंद लिमये. आम्ही १२ वीत म्हणजे Premedical च्या वेळी तो संपूर्ण राज्यात प्रथम आला होता. कौतुक, बक्षीसे झाली. कॉलेजसाठीच्या प्रवेश पत्रीका भरल्या. सर्वांत प्रथम येणारा म्हणजे वैद्यकीय विद्यालयात जागा मिळणार, ह्यात थोडी देखील शंका नव्हती. ते त्याने केले परंतू त्याच बरोबर साधा B.SC ह्या विषयाचा फॉम भरुन एका सायन्स कॉलेज मध्ये देखील फॉम भरला. आपली प्रवेशाची निश्चीती माहीत असून देखील.
अशाच पध्दती प्रमाणे अनेक विद्यार्थी निरनिराळ्या शाखामध्ये प्रवेश घेवून ठेवतात. प्रसंगी फी भरुन देखील. विशेष गंमत म्हणजे त्या वेळच्या पध्दतीनुसार जे १० विद्यार्थी प्रथम क्रमांकात उत्तीर्ण होत असत, त्यांना काही वैद्यकीय वा इंजिनीयरींग कॉलेज शुभेच्छा देवून त्या हूशार विद्यार्थांनी त्यांच्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा हे कळवीले


जात असे. सदानंद यालापण हे भाग्य लाभले. म्हणजे इतकी निश्चिती असून देखील त्याने साध्या सायन्स मार्गासाठीदेखील अर्ज भरला होता.
संशय,भिती, अनिश्चीतता हे भावनीक गुणधर्म मानसिक तणाव निर्माण करतात. जे स्वभावाने प्रत्येक गोष्टीत सांशक असतात त्यांना आत्मविश्वास कमी वाटतो. अशाच स्वभावाच माणसे मानसिक तणावाचे बळी पडतात.

मी एका बँकेमध्ये गेलो होतो. पैसे काढायचे होते. इतर बरेच जण रांगेत होते. मी कॅशरकडे बघत होतो. पैसे घेणे, पैसे देणे, नोटा भराभर मोजणे, त्या एकत्र बांधणे, बांधलेल्या गड्यामधून नोटा घेणे, मोजता मोजता गिऱ्हाईकांशी मध्येच बोलणे, फोन मोबाईल घेणे, बोलणे, कुणीतरी कर्मचारी मागून आला तर त्याच्याशी बोलणे. अशी अनेक छोटी छोटी व त्याच्या प्रमुख कामाना व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी तो सहज करीत होता. हजारो नव्हे लाखोच्या नोटा तो हाताळत होता. कल्पना येते की थोडीशी चुक त्याच्या हिशोबांत प्रचंड तफावत निर्माण करु शकते. पण ते तो सार सहजतेने करीत होता.
डॉक्टर सुध्दा मोठे मोठे ऑपरेशन करताना देहामधल्या अवयवांची काटछाट, रक्तस्त्राव, तो टिपणे, रक्त नलीका बांधने, रक्तस्त्राव थांबवणे, अवयवांची जुळवा-जुळव असे एक नव्हे अनेक थरारक गोष्टी सहजतेने करताना दिसतात. गंमत म्हणजे हे सारे ते करीत असताना, इतर सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारीत असतात. चालू खेळ, चालू राजकारण वा सिनेमे इत्यादी अनेक विषयांवर ती बोलतात. मात्र ऑपरेशनमध्ये बाधा न येता, सारे कसे सहज केल्या प्रमाणे वाटते.
अशाच प्रकारे अनेक व्यवसाय असतात, ज्यांच्या कामामध्ये जेवढे लक्ष केंद्रीत करण्याची गरज असते, त्याचवेळी धोका होण्याचा, नुकसान होण्याची खूपच शक्यता वाटते. अशी माणसे मानसिक तणावामध्ये सतत असतील असा ग्रह इतरांचा असतो. परंतु असे मुळीच नसते. व्यवसाय आणि मानसिक तणाव ह्या भिन्न गोष्टी आहेत.
एक तत्व असे आहे. प्रत्येक व्यक्ती त्याची जेवढी बुध्दी असेल, त्याच्या फक्त १५ ते २० टक्केच तो ती वापरत असतो. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो. ह्याचाच दुसरा अर्थ प्रत्येक व्यक्ती कार्य कुशल झाल्यानंतर जी बुध्दीची क्षमता वापरतो ती एखाद्या यंत्राप्रमाणे होवून जाते. वैचारिक बुध्दीचा,भावनेचा तेथे सहभाग नसतो. ते त्याचे काम मेकॅनीकल होवून जाते.
थोडेसे सतर्क राहून तो ज्या ज्या गोष्टी करतो त्या केवळ रोबोट अर्थात मानव यंत्राप्रमाणेच असतात. आधी फिड केलेलेच नंतर आपोआप बाहेर येवू लागते. जर नवीन क्रियेशन वा नुतन निर्मीती असेल, तरच जादा बुध्दीची अवशक्ता असते. दैनंदीन कार्याला अत्यल्प बुध्दीचा वापर होतो हे जर लक्षात आले, तर “तुमचे कार्य तणाव निर्माण करणारे आहे ” हा विचार शिथील होईल. कोणत्याही क्षेत्रात जा डॉक्टर, इंजिनीयर, वकील, सी.ए वा कलाकार, नट त्यांचे कार्य फक्त चाकेरी बध्द असते.इतरांना कदाचित्, महान अप्रतीम असे वाटेल, परंतु ते त्या व्यक्तीच्या अंगवळणी पडते व त्यात सहजता येते. दैनंदीन कार्यात मेंदूचा वापर कमी असल्यामुळे तणाव नसतो.अभ्यासानंतर कोणत्याही दैनंदीन कार्यात बुध्दी क्षमतेचा सहभाग फारच अल्प असतो.येथे ती व्यक्ती तणावमुक्त असते.मानसिक तणाव अशा वेळी कल्पनेने निर्माण केले जातात.चाकोरीबध्द कामे करताना बुध्दीवर ताण पडत नसतो.
परंतु विचारांचा मार्ग थोडासा वेगळा झाला की तो तणाव निर्माण करु शकतो.


०० जीवनाचे एक महान सत्य असते. जे भगवत् गीतेमध्ये देखील सांगितलेले आहे.
जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.
जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये कोणत्या ना कोणत्या रीतीने तुम्हास फायदा होतो. पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या फायद्याबाबत नेहमी विचार करु नका.
आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ आहात. ६०-७० वा अधिक वर्षे आपण जीवनाची खर्च केलीत. जर मागे वळून बघितल, तर तुम्हास दिसून येईल की तुम्ही लहान असताना ज्या जीवनाच्या मार्गाचा विचार केलांत, घटना कश्या व्हाव्यांत ही स्वप्ने रंगविलीत, तसे मुळीच झालेले नाही. सर्वच मार्ग एकदम भिन्न होत गेले. घटनाही वेगळ्या होत गेल्या. तरी देखील प्रत्येकजण म्हणेल
“भले कष्टमय जीवन का असेना, पण मी चांगल जगलो. मला माझ्या क्षमते नुसार, योग्यतेनुसार मिळत गेले.”
निसर्ग हा शेवटच्या अंकात तुम्हाला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
“जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.”
हे जर जीवनाचे तत्वज्ञान असेल, तर ते तुमच्या अन्तरमनातून मान्य करीत जा. तशी स्वभावाची ठेवण निर्माण करा. अशा माणसाला सुख वा दुःख दोन्हीही सहज पचवण्याची शक्ती मिळत असते. मानसिक तणाव येथे कमी जाणवतो.

००० केवळ वर्तमानकाळातच जगा

भूतकाळातील चुकांबाबत पश्चाताप करु नका. भविष्याची चिंता करु नका. वर्तमान फक्त सफल करण्याकरीता संपूर्ण लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस आपल्या हातात आहे. आज आपण रचनात्मक कार्य कराल तर कालच्या चुका सुधारतील आणि भविष्यांत निश्चितच फायदा होईल.
जीवन हे चक्रमय असते. काल्पनिक शक्तीनुसार तीन काळांत त्याचे विभाजन केले गेले. गेलेला तो भूतकाळ, येणारा तो भविष्यकाळ, आणि चालू सद्यःस्थितीतला तो वर्तमानकाळ. जरी हे तीन काळ वाटत असले तरी खऱ्या अर्थाने, फक्त दोन काळाचेच अस्तित्व माणसासाठी असते. भविष्य काळ येतो, वर्तमान काळाच्या सीमारेषेवरून छलांग मारीत भूतकाळांत अदृष्य होतो. भले काल्पनिक असो, वा असत्य असो, जगायचं असतं आम्हाला ते फक्त वर्तमान काळांत. तणावरहीत जगायचं असेल तर केवळ वर्तमान- काळाचा सहारा घेऊनच जगावं लागेल.भूतकाळातील अनुभव, कर्तृत्व यांची आठवण येणे चांगले, परंतु ते वर्तमान काळाचा आधार होऊ शकत नाही. भूतकाळातील गणितांची सांगड वर्तमानकाळाशी घालू नका. भविष्यकाळ तर अनिश्चित असल्यामुळे कल्पनेच्या झेपांना जागृत राहून आकार देत चला. फक्त वर्तमान काळांत जगण्याची संवय अंगीं ठेवा.
मानवी १०० वर्षाच्या मर्यादेत, तूम्ही सतत फक्त १० वर्षे जगण्याची वृत्ती मनाशी बाळगा. भूतकाळातली ५ वर्षे ही अनुभव व मार्गदर्शनासाठी आणि भविष्य काळातली फक्त ५ वर्षे जीवनाच्या योजने प्रित्यर्थ. पंचवार्षिक योजने प्रमाणे. ही योजना व्यवहारीक जीवनाची सांगड घालेल. वैचारीक झेप आणि कल्पना विलास यांना पायबंध घालेल. अशी आखणी तणावशीथिलता जीवनांत आणेल.

०० यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा.

जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात. तो तुमच्या आवडी निवडीवर, स्वभावावर ठेच पोहोंचवतो. कित्तेकदा तुम्हाला अपमानीत झाल्याचा अनुभव येतो. तुमचा अहंकार डिवचला जातो. येथेच तुमच्या शांत स्वभावाची परिक्षा होत असते. मला माहीत आहे की आपण कोणी संत महात्मे वा साधूपुरुष नव्हेत. परंतु तुम्ही जर समजदारीची भूमिका घेतली तर येवू घातलेल्या मानसिक तणावाच्या चक्रातून जाण्याचे टाळू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे संघर्ष हे उत्तर नसत. कोणत्या घटनेला किती प्राधान्य द्यायच, त्यांत किती तिवृतेने स्वतःला गुंतवून ठेवायच ह्याचा तुम्ही शांततेने विचार करु शकतां. काहीं व्यक्तीतर वर्षानुवर्षे सुडाच्या वातावरणात, अहंकाराच्या चकरामध्ये आपले आयुष्य घालवितात. ही आमच्या घराण्याची दुष्मनी आहे, अशी दर्पोक्ती करण्यात त्याना धन्यता


वाटते. आयुष्य कशासाठी व किती असते हाच मुळ प्रश्न ते जाणत नाही. व्यवहारिक दृष्टीने असल्या संघर्षामधून काहींही उत्पन्न होत नसते. फक्त
Ego, मीपणा, अहंभाव, याना खतपाणी देण्यातच त्यांच जीवन खर्च होत. ही एक वृत्ती बनते. हा स्वभाव घातक तर ठरतोच पण मानसिक तणावाला कारणीभूत ठरतो. काय करावे ह्या यातना देणारय़ा संबंधी. चिंतन करा, विचार करा, कांही मार्ग सुचतो कां हे बघा. वेगळ्या वातावरणाची निर्मिती करा. क्षमा याचनेचा विचार करा आणि जर अत्यंत कठीण व अशक्य वाटत असेल तर अशांच्या सहवासातून स्वतःबाजूस व्हा. संपर्क टाळा. अशा व्यक्तीना विसरुन जाण्याचा प्रयत्न करा.
हे मी फक्त ठोकताळे सांगतो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना, आणि सहवासामधली जवळीक ही भिन्न असू शकते. परिस्थितीजन्य उपाय योजना ह्या तुम्हालाच घ्यावयाच्या असतात. जे कराल ते शांततेने व शांततेसाठीच असावे. मानसिक तणावाला प्राधान्य देत.

००० सृष्टी एकविशाल नाटक- एक रंगभूमी

अस म्हणतात की हे जग, ही सृष्टी, एकविशाल नाटक आहे. एक रंगभूमी आहे.आणि आपण सर्वजण कलाकार आहोत. प्रत्येकाची भूमिका वेगळी व स्वतंत्र असते. कुणाचीही भूमिका एक सारखी नसते. भिन्नता आणि तरीही त्या त्या भूमिकेतील वैशिष्ठपूर्णता, हाच निसर्गाचा चमत्कार असतो.
एखाद्या नाटकांत कुणी राजाची भूमिका करतो तर कुणी भिकारय़ाची.त्या भूमिका ते कशी वठवतात, ह्यावरच त्या कलाकाराचे यश असते. जीवनाच्या ह्या रंगभूमिवर देखील प्रत्येकाने ज्याच्या नशिबी जी भूमिका आलेली असेल ती तशीच हूबेहूब करणे, हे अपेक्षित असते.


नाटकांत देखील भिकारी आपल्या कर्तृत्वाने, हिमतीने राजा बनू शकतो. तसाच राजा आपल्याच दुर्गुणाने, मुर्खपणाने राज्यपद गमावतो.
भिकारी बनतो. हे सत्य आपण बघतो. जीवनाच्या लढ्यात, संघर्षात देखील क्षमता, योग्यता, कर्तृत्व, हिम्मत याना मोठे स्थान असते.
मानसिक तणाव येतो कोठे ?
ज्यावेळी अशी माणसे स्वतःमधील क्षमता, योग्यता विसरतात. कसलेही प्रयत्न करीत नसतात. केवळ इच्छेने, विचाराने इतरांच्या यशाबद्दल कल्पना करतात. मला हे ईश्वराने कां दिले नाही ? याची तक्रार करतात. परिस्थितीला, वातावरणाला बोल लावतात. अशांचे जसे स्वभाव गुणधर्म तयार होतात, त्याला मानसिक तणावामध्ये ढकलतात. दुसरय़ाचे शेत अशाना नेहमी हिरवेगार वाटत असते. आपल शेत देखील कसे हिरवेगार करता येइल, ह्याचा ते प्रयत्न ते करीत नसतात.
अशांच्या स्वभावात निर्माण झालेली वैचारीक ठेवण, त्याना सतत विचारांमध्ये लोटते. तेच मानसिक तणावगृस्त होतात.
जीवनाच्या ह्या रंगभूमिवर, इतर भूमिकांचा अवास्तव विचार न करता, जो आपली स्वतःची अपेक्षीत भूमिका चांगली वठवतो, तोच जीवनात यशस्वी होतो. हीच मानसे तणावरहीत जीवन जगू शकतात.
एक मित्र आहे. त्याच दुकान आहे. खूप मेहनत करतो. व्यवसायांत चांगली कमाई करतो. परंतु जे त्याला मिळत, त्यात सदैव निराश असतो.
तो बघ कंपनीत नोकर आहे, बस महीना संपला की हाती पगार.
तो Contractor आहे. एखादे काम केले की भरपूर पैसे. माझ्या कामासारखी रोजची आणि सतत किच किच नाही. प्रत्येक अभिनेता आपला श्रेष्ठ अभिनय सादर करीत असतो. म्हणून कोणाच्याही अभिनयाला पाहून चिंतीत होऊ नका.

००० सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.
एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे ( Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोऱ्यानी बांधलेला.

दोऱ्यांची ढील वा आवळले जाणे सतत चालते. त्यामुळे तो खांब केव्हांही स्थिर नसतो. मात्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विचारांचे तुफान, परिस्थितीचा मारा, घटनांची वर्दळ ही सारी त्या जीवनतंबूंच्या खांबाचे दोर असतात. ते जीवनाच्या खांबाला अस्थिर वा स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या ह्या हालचालीच मानसिक तणाव निर्माण करतात. संसारिक प्रश्नांचा तुमच्या जीवनावर पडणारा भडिमार आणि तुम्हाला त्याची करावी लागणारी सोडवणूक, हेच तर तुमच्या जीवनाच्या यशाचे कौशल्य असते. ह्याचे ठोकताळे नाहीत. परंतु एक मार्गदर्शन असते. नेहमी निर्माण झालेल्या प्रश्नांमधून त्वरित एका प्रश्नाची निवड करा. त्याचे उत्तर शोधा. कोणत्या प्रश्नाला प्राधान्य द्यावयाचे, हे ती त्यावेळची परिस्थितीच तुमचे मार्गदर्शन करेल. तुम्ही फक्त मन शांत ठेवून, सारासार विचाराला प्राधान्य देत चला. एका नंतरच दुसरा प्रश्न समोर घ्या. त्याची उकल करा. संभ्रमित होऊ नका. तुमचा आत्मविश्वास, संकल्पना, व धडाडी सारे प्रश्न सुलभ करतील. त्यावेळी तेथे मानसिक तणाव येणार नाही.
एक सुंदर उदाहरण देतो. माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. लग्न समारंभ खूपच चांगला, आनंद व उत्साहाने चालू होता. बराच मित्रपरिवार जमला होता. माझी भेट माझे मित्र श्री एकनाथराव यांच्याशी झाली. गप्पा टप्पा, अभिनंदन झाले. मी सभामंडपांत बसलो होतो. लग्न सोहळा सुरु झाला.
अचानक माझे लक्ष गेले की तेथे एकनाथराव दिसत नव्हते. लग्नाची वेळ आणि मुलीचे वडील कोठे गेले. मी चौकशी केली. मला उत्तर मिळाले नाही. असतील इकडे तिकडे असे मोघम उत्तर मिळत गेले. जशी जशी वेळ जाऊ लागली, मी बेचैन झालो. सारे त्या तगमगीत बघत बसलो. लग्न लागले. अभिनंदन झाले. सर्वांच्या जेवण्याच्या पंगती बसल्या. जेवणे झाली, परंतु एकनाथराव मात्र दिसले नाही. मन शंकाकुशंका करु लागले. लग्नात, वऱ्हाडी माणसांत काहींतरी बिनसले असेल, हा विचार येवू लागला. परंतु ना माहिती ना उपाय. शांत बसून मी लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांना हजेरी देत गेलो.चार तास झाले. श्री एकनाथराव आल्याचे कळले. ते खोलीत बसले होते. मी लगेच त्याना भेटण्यास गेलो.
मजकडे बघून ते किंचीत् हसले. ” Any Problem ? ” मी त्याना उत्सुकतेने विचारले. त्यानी शेजारी झोपलेल्या त्यांच्या नातवाकडे बोट दाखविले. त्याच्या पायाचे हाड मोडले होते. Fracture झाले होते. नुकतेच प्लास्टर करुन आणले होते. हा खेळत असताना पडला. त्याचा पाय मोडला.
मुलीचा लग्न समारंभ होता. त्यामध्ये विघ्न निर्माण होऊ लागले होते. एका महत्वाच्या प्रश्नांची ते सोडवणूक करीत होते. प्रासंगीक निर्माण झालेल्या प्रश्नाची तिवृता ही त्या क्षणी जास्त महत्वाची वाटली. प्रसंग आणि निर्णय हेच जीवनांचे अत्यंत महत्वाचे टप्पे असतात.

तुमच्या यशाचे गमक तुमच्या निजी प्रश्नांची सोडवणूक आणि प्राध्यान्य (Solution and Priority ) यांत असते. योग्य वेळी योग्य विचार हे मानसिक तणावापासून संरक्षण करतात.

०० जेवढे होईल तेवढे दुसऱ्यास सहकार्य करण्याचा प्रयत्न करुन दुसऱ्यास सहायक झाल्यास आपण आपली चिंता विसरुन जाल.
स्वभावामध्ये काहीं चांगले गुणधर्म जोपासावे लागतात. ते तुमच्या मनाला आनंदी व समाधानी ठेवण्यास हातभार लावतात. जसे इतरांना सहकार्य करणे. हे प्रासंगिक न बनता, म्हणजे एखाद्या प्रसंगी तुम्ही कुणाची मदत केली असे न होता, मदत करण्याची वृत्ती अंगी बाळगावी. सहाय्य सर्वतोपरी क्षमतेनुसार असावे. तुमची मदत तुमच्या अहंकाराला खतपाणी देणारी न बनता ती तुमच्या समाधान वृत्तीला चेतना देणारी असावी. ह्यासाठी मदत करा व विसरुन जा. वाच्यता नको. ह्यानी तुमची आत्मिक शांतता मात्र सदैव तेवत राहील. कारण हा सहाय्य करणे ईश्वरी गुणधर्म असतो. मानसिक तणाव रहीस हे जगणे असेल.

कित्येक घटनासाठी तुम्ही प्रचंड प्रमाणात प्रयत्न करीत असतात. तुम्हाला यश येत नाही. निराशा मानसिक तणाव निर्माण करते. त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. तुमच साध्य कदाचित् योग्य असू शकेल, परंतु मार्ग चुकीचे निवडले गेले असतील. त्यावर चिंतन करा. सल्ला घ्या. तुमच्या विचारांना गरज वाटल्यास बदला. मीपणा, Ego अहंकार हे विचाराना नेहमी हानीकारक ठरतात. तुमच्यामध्ये विचारांची क्षमता असते. शांत राहून करीत असलेल्या मार्गाना,

१०
विचारांना बदला. बदललेला दृष्टीकोन कदाचित् तुमच्या दुःखाचे सुखांत परिवर्तन करु शकेल. ह्यात मानसिक तणाव कमी होइल.

०० अस म्हणतात की कमळाच्या फुलाभोवती बागडणारा भवरा हा आपल्या आनंदात इतका मग्न होऊन जातो की त्याला रात्र होऊ लागलेली कळत नाही. फुलांच्या पाकळ्या सांजसमयी मिटून जात असतात. भवरा त्यातच अडकून जातो. गुदमरुन प्राण गमवतो. आनंदी वातावरण आणि सभोवताल हे जेव्हां विसरले जाते, जीवनाला ते घातक ठरु शकते. कित्येक चांगली माणसे, थोर समाजसेवक, निस्वार्थी भावनेने इतरांना प्रेम, आनंद, सहकार्य, अशा महान मानवी गुणधर्मांत व्यग्र असतात. सारे सद् हेतूने होत असते. पण मनाला काय चांगल वा काय वाईट. कोणत्याही विचारांचा अतिरेक होऊ लागला की मन तणाव निर्माण करते. आपण देखील अशा थोर व्यक्तीना म्हणतोच प्रकृतीचा काळजी घेत चला. धवपळीत व्याधी सुरु होतील. व्याधी ह्या विचारांच्या मारय़ामुळे उत्पन्न होत असतात. मग विचार कसेही असोत. स्वभाव अशा विचारांच्या उत्पन्नाला खतपाणी घालत असतात.
००० एक महान तत्वज्ञान आहे की जी गोष्ट तुम्ही बदलू शकत नाही ती मान्य करा. त्याबद्दल विचार करीत राहून आपला मानसिक तणाव वाढू नका. प्रत्येक घटनावर वेळ हे अप्रतिम श्रेष्ठ औषध असते. प्रचंड दुःखाचे, निराशेचे प्रसंग देखील काळाच्या ओघांत शिथील होऊन विसरले जातात. निसर्गाचे हे वरदान असते. ज्या व्यक्ती ही समज

मनाशी बाळगतात, ते मानसिक तणावापासून बचाव करण्यात यशस्वी होतात. त्यांची समजदार वृत्तीच त्याना सदैव समाधानी ठेवण्यास मदत करते.

००० कित्येक वेळा आपण काहीं स्वभाव दुर्गुण विनाकारण मनाशी बाळगतो. ती नंतर नैसर्गीक वृत्ती बनते. ज्यांत जरी क्षणिक मानसिक समाधान दिसून आले, तरी ते तुम्हास मानसिक तणावाखाली नेवून ठेवते. तुम्ही ती गोष्ट मुदाम करीत नसतात. पण केवळ वैचारीक ठेवन म्हणून तुम्ही अशा विचारांकडे ओढले जातात. जसे इर्षा, बदला घेण्याची भावना, गैरसमज, तुलनात्मक स्पर्धा करण्याची वृत्ती (Un-healthy Competition) इत्यादी. कित्येकदा हे आपण विनाकारण अंगी बाळगतो. क्षणिक मोठेपणा मिरवण्यासाठी हे कदाचित् होत असेल. ती वेळ निघून जाते, परंतु तुम्हाला अशांत मन करते. तुमच मन खात राहते. तुमचा स्वभाव Guilty Consciousness बनतो. अशा वृत्तीची माणसे सतत निराशेचे एक वलय बाळगुन असतात. असेच मानसिक तणावाला बळी पडतात. वाईट प्रवृत्ती बाळगण्याला कष्ट लागत नसतात. ते सहजतेने होते म्हणून सामान्य त्याकडे झुकतात. चांगले गुणधर्म बाळगणे याला श्रम लागतात. परंतु तेच तुमच्या मनाला शांततेकडे घेवून जातात. मानसिक तणावरहीत तुमचे जीवन बनते.

००० जे होत आहे वा होणार आहे- ते चांगल्यासाठीच.
महान शक्ती ईश्वरा समोर नतमस्तक, अभिवादन, चिंतन करा.

तुम्ही आस्तिक असाल वा नास्तिक. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वभाव. परंतु एक सत्य सारे जग मान्य करते. ते हे की ह्या जगामधल्या वा विश्वामधल्या सर्व घडामोडी कोणत्या तरी शक्तीमुळे वा उर्जेमुळे होत असतात. त्या शक्तीला मान द्या. मग तो कुणी ईश्र्वर समजून वा निसर्ग संबोधित. कोणत्याही महान शक्तीसमोर तुमचे नतमस्तक, अभिवादन, हे तुमच्या अभिमानी, अहंकारी, मनावर सतत पांघरुण घालेल. तुमच्यात राहिलेला सुक्ष्म अहंकार मानसिक जो असंतुलन निर्माण करतो, त्यावर तुमची सद्सद्- विवेक बुद्धी सतेज ठेवील. तुम्ही चांगले, समजदार, प्रेमळ बनण्यास मदत करेल. सर्वात महत्वाचे म्हणजे मनाच्या चंचलतेवर अंकूश ठेवण्यासाठी हा प्रभावी उपाय असेल. आपल्या सर्व चिंता त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करा. दररोज थोडा वेळ ईश्वर चिंतन करा. प्रणायाम करा. योगासने करा. व्यायाम घेत जा. त्यामुळे मानसिक व शारीरिक परिवर्तन होते. तसेच मानसिक तणाव कमी होऊन स्वास्थ्य लाभते.

मानसिक तणाव हा लेख येथे पूर्ण.
धन्यवाद
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com