जीवनाच्या रगाड्यातून-
‘आनंद’ हाच भगवंत
गेले सारे आयुष्य
परि न कळला ईश
इच्छा राहिली अंतर्मनीं
प्रभू भेटावा एके दिनीं ।।
बालपणाचा काळ
करुनी अभ्यास नि खेळ
मनाची एकाग्रता
केली शरीरा करीता ।।
तरुणपणाची उमेद
जिंकू वा मरुं ही जिद्द
करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा
बनवी जीवनमार्ग निष्ठा ।।
संसारातील पदार्पण
इतरासाठी समर्पण
वाढविता आपसातील भाव
जाणले इतर मनाचे ठाव ।।
काळ येता वृद्धत्वाचा
दाखवी मार्ग अनुभवाचा
भजन पूजेत जाई वेळ
ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।
आता झालो देह दुर्बल
प्रभू चिंतनांत जाई वेळ
वाट बघतो निरोपाची
ओढ फक्त जगदंबेची ।।
आयुष्य संपता सारे
खंत येवून मन विचारे
कां न प्रभू भेटला ?
ह्याची रुख रुख मनाला ।।
२
आत्मचिंतन करिता
जाणले मी भगवंता
ईश्वर निर्गुण निराकार
कर्म करी त्यास साकार ।।
सत्य दया क्षमा शांती
ह्याच ईश्वराच्या शक्ती
आयुष्यातील आनंदी क्षण
हीच ईश्वरी खूण ।।
जीवनातील समाधान
ईश्वरप्राप्तीचे लक्षण
नसावी मनी खंत
‘ आनंद ‘ हाच भगवंत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
e-mail- bknagapurkar@gmail.com
१-२८२१८३
विवीध-अंगी ***२८ |
एकदा माझ्या तोंडून शिवी बाहेर पडली, तेंव्हा मुलांने टोकलं.
शिकवल्यापैकीं फक्त चागलंच त्यानी घेतलं, हे मला जाणवलं