एके काळी हवे होते, मजलाच सारे कांही
आज दुजाला मिळताच, आनंद मनास होई
माझ्यातील ” मी ” पणाने, विसरलो सारे जग
तुझ्यामध्येही ” मी ” आहे, जाण येई कशी मग
जेंव्हा उलगडा झाला, साऱ्या मध्ये असतो मी
आदर वाटू लागला, जाणता अहं ब्रह्मास्मि
( कविता )